शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

सावित्रीच्या नाती

By admin | Updated: January 2, 2016 14:45 IST

या पोरींच्या आईबापांनी, आज्या-पणज्यांनी जंगलाबाहेरचं जग बघितलेलं नाही. त्यांच्याही पायाखालचा रस्ता धुळीचा आणि मोठय़ा कष्टांचा! पण त्यांनी पाय उचलला आहे, शाळेच्या दिशेने.. काय आहे त्यांच्या मनात आणि आयुष्यात?

सावित्रीबाई फुले. देहाने हयात असत्या तर 185 वर्षाच्या असत्या. नाही ती त्यांची कुडी. पण शाळेकडे जाणा:या  मुलींच्या प्रत्येक पावलात आजही त्या आहेतच. आज त्यांचा जन्मदिवस. 1848 मध्ये पुण्याच्या ज्या भिडे वाडय़ात त्यांनी सहा पटसंख्येसह मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, त्यालाही आता 168 वर्षे उलटली आहेत.
..पण अजूनही शाळेच्या दिशेने वळणारी मुलींची पहिलीवहिली पावलं महाराष्ट्राच्या मातीत उमटणं थांबलेलं नाही.
मेळघाटात जाऊन पाहा. संशोधक असोत, अभ्यासक वा पत्रकार, मेळघाटात लोक जातात, ते कुपोषणाचा ‘घास’ ठरणा:या दुर्दैवी मुलांची खबर घेण्यासाठी.
पण इथल्या वाडी-वस्त्यांमधून जाणा:या पायवाटा आश्रमशाळांच्या दिशेनेही जातात आणि त्यावरून चालणा:या कच्च्याबच्च्यांमध्ये मुलींची संख्या सगळ्यात जास्त असते.
या मुलींची नावंही जुनी, कोरकू भाषेतली नाहीत. इथे भेटतात त्या रविना, अनिता नाहीतर पल्लवी. या मुलींनी काहीशे किलोमीटर अंतरावर असलेलं जिल्ह्याचं ठिकाण - अमरावती पाहिलेलं नाही. त्यांनीच काय त्यांचे आई-बाप, आजे-पणजे कुणीच पाहिलेलं नाही.
- पण म्हणून काय झालं?
जग त्यांच्यार्पयत पोचलं नसलं, तरी इथली अनिता किरण बेदींना ओळखते आणि तिला शिकून पोलीस व्हायचंय.
सावित्रीबाईंना भेटती अनिता, तर धन्य वाटलं असतं त्यांना. 
- पण आपण तरी भेटूया या मुलींना.
म्हणूनच आम्ही थोडी पायपीट केली आहे. मेळघाट आधीच दुर्गम. आम्ही निवडली या दुर्गम भागातली काही दुर्गम आणि अतिदुर्गम गावं. बोरी, केकर्दा, मोगर्दा, हरिसाल. अशी दोन टोकाची. अमरावती जिल्ह्याच्या धारणी तालुक्यातली. यातलं बोरी गाव कदाचित येत्या काही महिन्यांत भारताच्या नकाशावरूनच अस्तंगत झालेलं असेल. हे गाव अतिदुर्गम असून, जंगलाच्या बफर झोनमध्ये आहे. त्यामुळे हे संपूर्ण गाव जंगलातून उठवून त्याचं पुनर्वसन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे हरिसाल! हे त्यातल्या त्यात मोठं, हमरस्त्यावरचं आणि बॅँकेपासून वन विभागार्पयत सरकारी कार्यालयं असलेलं, बाहेरच्या लोकांशी ‘जानपहेचान’ असलेलं संमिश्र लोकवस्तीचं मेळघाटातलं मध्यवर्ती गाव. मायक्रोसॉफ्टच्या मदतीनं देशातलं पहिलं ‘आदर्श डिजिटल व्हिलेज’ होण्याच्या दिशेनं या गावानं पावलं टाकायला सुरुवात केलीय.
तिथे भेटल्या सावित्री कुरारटे.
म्हणजे कोरकू भाषेत ‘सावित्रीच्या नाती’.