शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

जैन तत्त्वज्ञानाचे संस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 01:14 IST

पाश्चिमात्यांना भारतीय तत्त्वज्ञानाचे आकर्षण नेहमीच राहिले आहे. यातूनच भारतीय जैन तत्त्वज्ञानाची ओढ असणाऱ्या ग्रेटर अटलांटा, (यू.एस.ए.) येथील जैन सोसायटीने मला व्याख्यानासाठी निमंत्रित केले होते. णमोकार मंत्र महात्म्य, श्रमण (जैन) धर्माचा उद्भव आणि विकास, कर्मसिद्धांताची जैन अवधारणा,

ठळक मुद्देमनुष्याचा स्वार्थ व कामवासना हे आजच्या जीवन संघर्षाचे मूळ कारण आहेसामाजिक विचारांचे प्रत्यक्षात आचरण केल्यास व्यक्ती, समाज, राष्ट व विश्वमात्राला सुख-शांती व लाभू शकेल.

- डॉ. सुषमा रोटेपाश्चिमात्यांना भारतीय तत्त्वज्ञानाचे आकर्षण नेहमीच राहिले आहे. यातूनच भारतीय जैन तत्त्वज्ञानाची ओढ असणाऱ्या ग्रेटर अटलांटा, (यू.एस.ए.) येथील जैन सोसायटीने मला व्याख्यानासाठी निमंत्रित केले होते. णमोकार मंत्र महात्म्य, श्रमण (जैन) धर्माचा उद्भव आणि विकास, कर्मसिद्धांताची जैन अवधारणा, वर्धमान महावीरांच्या विचारांची वर्तमानातील प्रासंगिकता, जैन आगम साहित्य, अहिंसक जीवनशैली, श्रावकाचार - बारा व्रत यावर तेथे व्याख्यान दिले.लौकिक शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपल्या नव्या पिढीला जैन तत्त्वज्ञान, त्यातील वैज्ञानिकता आणि धर्मसंस्कार यांचा परिचय करून देण्याच्या उद्देशाने अटलांटा येथील जैन समुदायाने मला आमंत्रित केले होते. मी केलेल्या जैन विद्या शोध संस्थानच्या माध्यमातून जैनागम, प्राकृत भाषा आणि जैन साहित्याचे तुलनात्मक अध्ययन, अध्यापन, तसेच संशोधन क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन ‘जैन सिद्धांताची वर्तमान संदर्भातील प्रासंगिकता’ या विषयांतर्गत जैन धर्म व तत्त्वज्ञानातील अनेक पैलूंवर व्याख्यानासाठी मला निमंत्रित करण्यात आले होते.

‘णाण णरस्स सारं’ अशी महावीर वाणी आहे. मानवी जीवनाचे साफल्य व खरा पुरुषार्थ ज्ञानी होण्यामध्ये आहे. ज्ञानानेच सर्व दु:खांपासून मुक्ती मिळते. भगवान महावीर यांच्या चिंतनातील आत्मकल्याणकारी अध्यात्मपक्ष या साधना पद्धतीत ईश्वराचे कर्तृत्व नाकारले आहे. जो तो आपापल्या सुखदु:खाचा कर्ता व भोक्ता आहे, अशी धारणा आहे. प्रत्येक आत्म्याचे अस्तित्व स्वतंत्र असून, प्रत्येकाला परमात्मपद प्राप्त करून घेता येते.

भगवान महावीर यांच्या चिंतनाचा दुसरा महत्त्वपूर्ण पैलू सामाजिक चिंतनाचा आहे. जैन धर्म हा वैज्ञानिक स्वरूपाचा आहे. जैन धर्म व्यक्तीची पूजा करीत नसून, व्यक्तित्वाची पूजा करण्याची प्रेरणा देतो. अहिंसेचा, शुद्ध सात्विक निर्मळ जीवनाचा, अनेकांताचा विचार आजही जगात स्वीकृत होत आहे, याचे कारण जैन तत्त्वज्ञान व धर्म मानवाच्या मूलभूत आत्मतत्त्वाशी सुसंगत आहे. महावीरांनी स्वत: आचरणाने लोकांसमोर जीवन जगण्याच्या कलेचा आदर्श ठेवला.

महावीरांचा मार्ग हा त्यागाचा, अनासक्तीचा मार्ग आहे. आजही जैन धर्माचे सिद्धांत प्रासंगिक आहेत, जेवढे यापूर्वी होते किंबहुना त्याहीपेक्षा जास्त आजच्या दु:खी मानवाने जर महावीरप्रणित अहिंसा, अनेकांत, अपरिग्रह या सिद्धांताचे निष्ठापूर्वक पालन केले, तर चोहोबाजूंना व्याप्त वर्तमानातील अशांती दूर होण्यास वेळ लागणार नाही. मानवी जीवनात अहिंसेला अत्यंत महत्त्व आहे. मनुष्याच्या जीवनातील आचार, विचार, मनातील भाव अहिंसेवर आधारित असतील तरच तो जीवनामध्ये साम्यभाव ठेऊ शकतो.आज समाजामध्ये धार्मिक संघर्ष, जीवनमूल्यांचा वैचारिक संघर्ष, राजकीय पक्षांचा संघर्ष उच्च कोटीवर पोहोचला आहे. महावीर याला एकांतवादी दुराग्रही वृत्ती मानतात. इतर धर्म व तत्त्वज्ञानाचाही विचार करून समन्वय साधून व्यवहार करणे याला अनेकांतदृष्टी म्हणतात. महावीरांच्या विचारातील अनेकांताच्या पालनाचा उद्देश विभिन्न जाती, धर्म, वर्ग, राष्टÑ, भाषा, संस्कृती यांच्यामध्ये समन्वय व सद्भावना स्थापित करणे हा आहे.

मनुष्याचा स्वार्थ व कामवासना हे आजच्या जीवन संघर्षाचे मूळ कारण आहे. महावीरांनी या विषमतेचे समाधान अपरिग्रहाचे पालन सांगितले. मनुष्याने संचयी वृत्तीवर संयम ठेवल्यास अपरिग्रहाचे पालन होईल व समाजातील संघर्ष कमी होऊन मनुष्य सुखी होईल. धर्म आणि अध्यात्म जीवनाला सावरतात. जीवनात भरकलेल्या व्यक्तीला परत स्थिर करणारी अध्यात्म ही कला आहे. आजच्या काळातील मानवी जीवनातील सामाजिक व राष्टय समस्यांची समाधानकारक उत्तरे भगवान महावीर यांच्या सामाजिक चिंतनात आढळतात. त्यांच्या सामाजिक विचारांचे प्रत्यक्षात आचरण केल्यास व्यक्ती, समाज, राष्ट व विश्वमात्राला सुख-शांती व लाभू शकेल.