शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
2
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
3
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात 8 वेळा चर्चा', अमेरिकन मंत्र्याचा 'तो' दावा भारताने फेटाळला...
4
"Bombay is not Maharashtra City..."; भाजपा नेत्याच्या विधानानं नवा वाद; उद्धवसेनेने सुनावले
5
महिला सक्षमीकरणाचे नवे मॉडेल! सोमनाथ मंदिरामुळे शेकडो महिलांना मिळाली रोजगाराची सुवर्णसंधी
6
Gautami Kapoor : राम कपूरकडे नव्हतं काम, पत्नी गौतमीने सांभाळलं घर; सांगितला लग्नानंतरचा अत्यंत कठीण काळ
7
२८ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; १ फेब्रुवारीला बजेट; सामान्यांची 'अच्छे दिन'ची प्रतीक्षा संपणार?
8
उमेदवारांची माहिती अद्याप 'अंधारात', निवडणुकीतील ४६९ उमेदवारांची शपथपत्रे अपलोडच केली नाहीत!
9
"झुकणार नाही..., शत्रूला परिणाम भोगावे लागतील!"; इराणमध्ये जनता रस्त्यावर उतरली असताना नेमकं काय म्हणाले खामेनेई?
10
"एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल, पण कदाचित मी जिवंत नसेन", सोलापुरात ओवैसींचा अजित पवारांवर हल्ला
11
हिमाचल प्रदेशच्या सिरमौरमध्ये भीषण अपघात; दरीत कोसळली बस, ८ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
12
'अजित पवार म्हणाले, भाजपाने अडीच-अडीच हजार मते आधीच ईव्हीएमध्ये भरली आहेत'; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा
13
Video: मुंबईत महायुतीत तणाव! "५० खोके एकदम ओके..." भाजपा कार्यकर्त्यांनीच शिंदेसेनेला डिवचले
14
Bigg Boss Marathi 6: कातिलों की कातिल राधा पाटील ते सोनावणे वहिनी; 'बिग बॉस मराठी ६'मधल्या कन्फर्म स्पर्धकांची लिस्ट समोर
15
नवी मुंबई: वाशीत कारमध्ये १६ लाख रुपयांची रोकड सापडली, आचारसंहिता पथकाची कारवाई
16
५ कारणांमुळे बाजार हादरला! सेन्सेक्स २१०० अंकांनी कोसळला; परदेशी गुंतवणूकदारांनी मोडले कंबरडे
17
कुजबूज: शिंदे साहेब, खरंच दखल घेतील! त्याग कितपत फळणार?
18
प्रत्येक नागरिकाला 90 लाख रुपये देऊ; ग्रीनलँड मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची नवी खेळी
19
अमरावतीतील गावात सायंकाळी भोंगा वाजला की बंद होतात मोबाइल, टीव्ही; राज्यभर 'या' गावाची का आहे चर्चा ?
20
‘युती तोडून उद्धव ठाकरेंना मविआत बसवण्याची किती दलाली घेतली?’, प्रकाश महाजनांचा संजय राऊतांना सवाल
Daily Top 2Weekly Top 5

Rethinking the Regional

By admin | Updated: August 8, 2015 14:57 IST

जवाहरलाल दर्डा कला अकादमीचे ‘श्लोक’ हे व्यासपीठ आणि भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रलय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्स येथे ‘रिथिंकिंग द रिजनल’ या चित्र-शिल्पप्रदर्शनाचे गेल्या शुक्रवारी उद्घाटन झाले. दि. 20 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणा:या प्रदर्शनाच्या निमित्ताने..

- शीतल दर्डा
 
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या आधुनिक कलेचा भारतीय इतिहास गावखेडय़ांतून आलेल्या कलावंतांनी संपन्न केला. खेडय़ापाडय़ांतून उच्चशिक्षणासाठी महानगरांकडे गेलेले, तिथेच स्थिरावलेले कलावंत जागतिक कीर्तीचे धनी झाले. त्यांच्या चित्रंत त्यांच्या प्रादेशिक भूतकाळाचे धागे सदैव गुंफलेले राहिले. काही उमेदीच्या पावलांना महानगरांच्या वाटा गवसल्या नाहीत, काहींना त्या गवसूनही परवडल्या नाहीत. काही अवलियांनी महानगरांकडे फिरकणोही नाकारले. या अशा हरवल्या, सापडल्या नव्या-जुन्या वाटांचा माग काढण्याचा हा एक समृद्ध प्रयत्न आहे!
 
 
समृद्धीच्या गर्वाने माना उंचावून उभी असलेली, गावकुसातल्या प्रत्येकाला आपल्या दिशेने खेचून घेणा:या चुंबकासारखी उन्मत्त शहरे.. आणि सगळ्याच शर्यतीत मागे पडलेली, धूळभरली, उदास, एकेकटी खेडी.. हे एकेकाळच्या भारताचे चित्र होते, हे खरे.
पण तो झाला इतिहास!
जागतिकीकरणाच्या आव्हानाला पुरून उरलेल्या आणि अधिक सशक्त झालेल्या समकालीन भारताची वीण वेगळी घडते आहे. अवाजवी भाराने जडावलेल्या शहरांच्या व्यवस्था घायकुतीला येत असताना, जगाच्या स्पर्धेत टक्कर घेत उभे राहण्याचे रांगडे सामथ्र्य घेऊन गावकुसातली माणसे धडाडीने पुढे येत आहेत. या माणसांना त्यांच्या ‘खेडय़ा’चा संकोच नाही, उलट खेडय़ापाडय़ांतल्या असुविधांचे अडथळे ओलांडणो भाग पडल्याने तासले गेलेले त्यांचे  ‘हुनर’ हेच त्यांचे खरे सामथ्र्य आहे.. आणि शहरातल्या एकरंगी गर्दीत उठून दिसणारे त्यांचे वेगळेपणही!
काहीच उपलब्ध नसण्याच्या ‘संकटा’चे  ‘संधी’त रूपांतर करून ग्रामीण भागातून भरारी घेणा:या पहिल्या पिढीच्या उद्योजकांच्या  ‘स्टार्ट-अप’ कहाण्या घ्या, किंवा गावच्या मातीतून थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन धडकलेले खणखणत्या क्षमतेचे खेळाडू; एकेकाळी ‘स्मॉल टाऊन’ म्हणून इंग्रजीतून हिणवल्या गेलेल्या प्रादेशिक भारताची ही नवी समृद्ध ओळखच जागतिकीकरणाच्या लाटेला तोंड देतानाचे आपल्या देशाचे सामथ्र्य बनली आहे.
जे व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रत, खेळाच्या मैदानात, मनोरंजनाच्या पडद्यावर आणि शेतीच्या प्रयोगशील जमिनीत, तेच कलेच्या क्षेत्रतही तितकेच खरे आहे.
कलेची साधना, त्यातील तंत्र-विकास आणि कलावंत म्हणून बहरण्याला पोषक असलेली महानगरीय पाश्र्वभूमी न लाभलेले अगणित कलावंत चित्र-शिल्पकलेचे अवकाश समृद्ध करून गेले आहेत. महानगरीय गजबजाटापासून दूर प्रादेशिक मातीत रुजलेल्या, कधी जगण्याभोवतीच्या हतबल गुंतागुंतीने भोवंडलेल्या, तर कधी स्पर्धेपासून मुक्त अशा ताणरहित अनुभवांनी बहरलेल्या त्यांच्या कलाजाणिवा हे अशा ‘प्रादेशिक’ कलावंतांचा वेगळेपणा अधोरेखित करणारे सामथ्र्य ठरलेले आहे.
केवळ भौगोलिक संदर्भात ‘प्रादेशिक’ ठरवले गेलेले हे कलाविश्व महानगरीय जाणिवांच्या समस्तरावर ठळकपणो उमटवण्याचा एक प्रयत्न म्हणजेच  ‘रिथिंकिंग द रिजनल’.
- जे जे म्हणून प्रादेशिक, त्याच्या मूल्यमापनाची नवी दृष्टी, नवा विचार!
नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्सच्या सहयोगाने ‘श्लोक’ या कलाचळवळीचे 
 
राष्ट्रीय स्तरावरचे हे पहिले कला-प्रदर्शन!
जवाहरलाल दर्डा कला अकादमीच्या पंखांखाली सहा वर्षापूर्वी ‘श्लोक’ हे नवे व्यासपीठ जन्माला आले, तेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोप:यात विखुरलेल्या चित्र-शिल्पकारांना एक हक्काचे ठिकाण मिळावे, अशी अपेक्षा होती.
- महानगरात कलावंतांना उपलब्ध असलेल्या परस्पर-संपर्काच्या सुविधा आणि प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या चित्रकारांच्या शोधात ‘श्लोक’बरोबर माझाही प्रवास सुरू झाला.
पहिले प्रदर्शन झाले मार्च 2क्क्8 मध्ये. औरंगाबादच्या या चित्रप्रदर्शनाला मिळालेला प्रतिसाद हुरूप वाढवणारा होता आणि ग्रामीण भागात काम करणा:या तरुण चित्रकारांबरोबर ‘श्लोक’च्या नात्याचा प्रारंभही!
आधुनिक कलाविष्काराचे माहेरघर असलेल्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्सच्या कलादालनात सजलेले ‘रिथिंकिंग द रिजनल’ हे कलाप्रदर्शन म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रादेशिक कलाविष्काराच्या जुन्या-नव्या श्रीमंतीचा उत्सवच आहे. गेल्या सुमारे शंभर वर्षातली महाराष्ट्राची समृद्ध कलापरंपरा एकाच छताखाली आणणारा हा प्रयोग अनेक अर्थानी महत्त्वपूर्ण आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या गेल्या सहा दशकांमधला आधुनिक कलेचा भारतीय इतिहास गावखेडय़ांतून आलेल्या कलावंतांनीच संपन्न केलेला दिसेल. अनेकांची सुरुवात कोणा कानाकोप:यातल्या छोटय़ा खेडय़ात झाली. तिथले संस्कार घेऊन उच्चशिक्षणासाठी महानगरांकडे वळण्याची संधी मिळालेले आणि उत्तरायुष्यात तिथेच स्थिरावलेले कितीतरी नामवंत कलावंत पुढे जागतिक कीर्तीचे धनी झाले. या ज्येष्ठ नामवंतांच्या चित्रतले त्यांच्या प्रादेशिक भूतकाळाचे धागे सदैव गुंफलेले राहिले. 
काही उत्सुक, उमेदीच्या चित्रकारांच्या पावलांना महानगरांच्या वाटा गवसल्या नाहीत, काहींना त्या गवसूनही परवडल्या नाहीत. 
काही अवलिये असेही होते, ज्यांनी महानगरांकडे फिरकणोही नाकारले.
- या अशा हरवल्या, सापडल्या, नाकारलेल्या वाटांचा माग घेतघेतच ‘रिथिंकिंग द रिजनल’ हे कलाप्रदर्शन आकाराला आले आहे. 
पश्चिम भारताच्या - प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गोव्याच्या - चित्रपरंपरेबरोबरच या भागातले तरुण वर्तमानही या कलाप्रदर्शनात एकवटलेले दिसेल. काही नावे जागतिक स्तरावर गाजलेली. कित्येक गुणवंत काळाच्या उदरात अनामिकपणोच विसावलेले. 
अशा अनामिकांना ‘हात’ देत असल्याची भावना ‘श्लोक’च्या मनाशी नाही. केवळ महानगरांच्या संपर्क-जाळ्यात नाही म्हणून महाराष्ट्राच्या ज्या कलासामथ्र्याकडे आजवर काहीसे दुर्लक्ष झाले, केले गेले; त्या सामूहिक चुकांच्या परिमाजर्नाचाच हा एक छोटा प्रयत्न आहे.
देशाच्या हृदयात धडकणा:या आणि सशक्त धमन्यांमधून सळसळणा:या ‘प्रादेशिक’ सामथ्र्याची शुभ्र कॅनव्हासवरची ही देखणी मांडणी आहे!
 
(लेखिका जवाहरलाल दर्डा कला अकादमीच्या 
‘श्लोक’ या व्यासपीठाच्या मुख्य प्रवर्तक आहेत.)