शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

सज्ज; पण काळजी घ्या - राजेश टोपे (आरोग्यमंत्री, महाराष्ट्र)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:05 IST

कोरोना व्हायरस आटोक्यात ठेवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रय} करीत आहे. संभाव्य परिस्थिती ओळखून आजच अनेक गोष्टींची तयारी करून ठेवली आहे; पण नागरिकांच्या सहकार्याचीही अपेक्षा आहे. अन्यथा, परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. 

- राजेश टोपे (आरोग्यमंत्री, महाराष्ट्र)

* कोरोना व्हायरसच्या संदर्भात सध्याची परिस्थिती कशी आहे?- परिस्थिती नियंत्रणात आहे, संभाव्य स्थितीचा अंदाज घेऊन आधीच तयारी करून ठेवली आहे; पण नागरिकांकडूनही सहकार्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी कारणाशिवाय घराबाहेर पडणे थांबवले नाही तर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाईल. जगातील काही देशांत अचानक रुग्णांची संख्या वाढली. इतक्या रुग्णांवर उपचार करणे अवघड झाले. आपल्याकडे तशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून सगळ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.  * कोरोना व्हायरसच्या नियंत्रणासाठी सरकारने काय काय केले?- आमच्यासमोर चित्र स्पष्ट होत होते. जनतेत जागरुकता निर्माण करणे गरजेचे होते. ‘इन्फॉर्मेशन, एज्युकेशन आणि कम्युनिकेशन’ या सूत्रावर भर देणे आवश्यक होते. आमच्याकडे 2019-20 चे बजेट अखर्चित होते. ते आमच्या मदतीला आले. त्यामुळे राज्यभर होर्डिंग्ज लावले गेले, शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अधिकार्‍यांच्या सतत बैठका सुरू होत्या. ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, त्या खरेदी करण्याचे आदेश दिले. खासगी कार्यालयांना 50 टक्के उपस्थिती बंधनकारक केले गेले. जिल्ह्या-जिल्ह्यात आयसोलेशन वॉर्ड तयार केले गेले. पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर त्याचे पुढे काय करायचे, संशयित असेल तर त्याचा फॉलोअप कसा करायचा याची यंत्रणा कामाला लावली गेली. * पण आपल्याकडे एवढे रुग्ण अचानक कुठून वाढले?- ज्या सात देशांची यादी आपल्याला केंद्राने दिली होती, त्या ठिकाणांहून येणारे पेशंट तपासले जात होते. मात्र दुबईहून अचानक 40 लोकांचा एक ग्रुप आला. आपल्याकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज 50च्या आसपास आहे, त्यातील 20 रुग्ण एकट्या दुबईतून आलेले होते. त्यांच्यामुळे बाधित झालेले 5 ते 8 रुग्ण निघाले. * कोरोनाच्या तिसर्‍या टप्प्यात आपण जाऊ अशी भीती कशामुळे वाटते?- मी स्वत:, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे मंत्रिमंडळ जनतेला हात जोडून विनंती करत आहोत की त्यांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये; पण लोकांनी ऐकले नाही तर नाईलाजाने सगळे बंद करावे लागेल. या काळात हा आजार तिसर्‍या टप्प्यात गेला तर परिस्थिती गंभीर होईल. त्यामुळे सगळ्यांनी जबाबदारी ओळखणे महत्त्वाचे आहे. * रुग्ण तपसणीसाठी लॅबचा तुटवडा आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणी करता येईल?- या लॅब भारत सरकारच्या नियमानुसार उभ्या करायच्या असतात. आम्ही आणखी आठ लॅब सुरू करत आहोत. मात्र त्यासोबतच काही खासगी हॉस्पिटल्सनाही परवानगी देण्याची शिफारस केंद्राला केली आहे. तीदेखील लवकरच कार्यान्वित होतील.(शब्दांकन : अतुल कुलकर्णी)