शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

सज्ज; पण काळजी घ्या - राजेश टोपे (आरोग्यमंत्री, महाराष्ट्र)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:05 IST

कोरोना व्हायरस आटोक्यात ठेवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रय} करीत आहे. संभाव्य परिस्थिती ओळखून आजच अनेक गोष्टींची तयारी करून ठेवली आहे; पण नागरिकांच्या सहकार्याचीही अपेक्षा आहे. अन्यथा, परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. 

- राजेश टोपे (आरोग्यमंत्री, महाराष्ट्र)

* कोरोना व्हायरसच्या संदर्भात सध्याची परिस्थिती कशी आहे?- परिस्थिती नियंत्रणात आहे, संभाव्य स्थितीचा अंदाज घेऊन आधीच तयारी करून ठेवली आहे; पण नागरिकांकडूनही सहकार्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी कारणाशिवाय घराबाहेर पडणे थांबवले नाही तर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाईल. जगातील काही देशांत अचानक रुग्णांची संख्या वाढली. इतक्या रुग्णांवर उपचार करणे अवघड झाले. आपल्याकडे तशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून सगळ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.  * कोरोना व्हायरसच्या नियंत्रणासाठी सरकारने काय काय केले?- आमच्यासमोर चित्र स्पष्ट होत होते. जनतेत जागरुकता निर्माण करणे गरजेचे होते. ‘इन्फॉर्मेशन, एज्युकेशन आणि कम्युनिकेशन’ या सूत्रावर भर देणे आवश्यक होते. आमच्याकडे 2019-20 चे बजेट अखर्चित होते. ते आमच्या मदतीला आले. त्यामुळे राज्यभर होर्डिंग्ज लावले गेले, शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अधिकार्‍यांच्या सतत बैठका सुरू होत्या. ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, त्या खरेदी करण्याचे आदेश दिले. खासगी कार्यालयांना 50 टक्के उपस्थिती बंधनकारक केले गेले. जिल्ह्या-जिल्ह्यात आयसोलेशन वॉर्ड तयार केले गेले. पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर त्याचे पुढे काय करायचे, संशयित असेल तर त्याचा फॉलोअप कसा करायचा याची यंत्रणा कामाला लावली गेली. * पण आपल्याकडे एवढे रुग्ण अचानक कुठून वाढले?- ज्या सात देशांची यादी आपल्याला केंद्राने दिली होती, त्या ठिकाणांहून येणारे पेशंट तपासले जात होते. मात्र दुबईहून अचानक 40 लोकांचा एक ग्रुप आला. आपल्याकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज 50च्या आसपास आहे, त्यातील 20 रुग्ण एकट्या दुबईतून आलेले होते. त्यांच्यामुळे बाधित झालेले 5 ते 8 रुग्ण निघाले. * कोरोनाच्या तिसर्‍या टप्प्यात आपण जाऊ अशी भीती कशामुळे वाटते?- मी स्वत:, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे मंत्रिमंडळ जनतेला हात जोडून विनंती करत आहोत की त्यांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये; पण लोकांनी ऐकले नाही तर नाईलाजाने सगळे बंद करावे लागेल. या काळात हा आजार तिसर्‍या टप्प्यात गेला तर परिस्थिती गंभीर होईल. त्यामुळे सगळ्यांनी जबाबदारी ओळखणे महत्त्वाचे आहे. * रुग्ण तपसणीसाठी लॅबचा तुटवडा आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणी करता येईल?- या लॅब भारत सरकारच्या नियमानुसार उभ्या करायच्या असतात. आम्ही आणखी आठ लॅब सुरू करत आहोत. मात्र त्यासोबतच काही खासगी हॉस्पिटल्सनाही परवानगी देण्याची शिफारस केंद्राला केली आहे. तीदेखील लवकरच कार्यान्वित होतील.(शब्दांकन : अतुल कुलकर्णी)