शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

सज्ज; पण काळजी घ्या - राजेश टोपे (आरोग्यमंत्री, महाराष्ट्र)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:05 IST

कोरोना व्हायरस आटोक्यात ठेवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रय} करीत आहे. संभाव्य परिस्थिती ओळखून आजच अनेक गोष्टींची तयारी करून ठेवली आहे; पण नागरिकांच्या सहकार्याचीही अपेक्षा आहे. अन्यथा, परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. 

- राजेश टोपे (आरोग्यमंत्री, महाराष्ट्र)

* कोरोना व्हायरसच्या संदर्भात सध्याची परिस्थिती कशी आहे?- परिस्थिती नियंत्रणात आहे, संभाव्य स्थितीचा अंदाज घेऊन आधीच तयारी करून ठेवली आहे; पण नागरिकांकडूनही सहकार्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी कारणाशिवाय घराबाहेर पडणे थांबवले नाही तर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाईल. जगातील काही देशांत अचानक रुग्णांची संख्या वाढली. इतक्या रुग्णांवर उपचार करणे अवघड झाले. आपल्याकडे तशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून सगळ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.  * कोरोना व्हायरसच्या नियंत्रणासाठी सरकारने काय काय केले?- आमच्यासमोर चित्र स्पष्ट होत होते. जनतेत जागरुकता निर्माण करणे गरजेचे होते. ‘इन्फॉर्मेशन, एज्युकेशन आणि कम्युनिकेशन’ या सूत्रावर भर देणे आवश्यक होते. आमच्याकडे 2019-20 चे बजेट अखर्चित होते. ते आमच्या मदतीला आले. त्यामुळे राज्यभर होर्डिंग्ज लावले गेले, शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अधिकार्‍यांच्या सतत बैठका सुरू होत्या. ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, त्या खरेदी करण्याचे आदेश दिले. खासगी कार्यालयांना 50 टक्के उपस्थिती बंधनकारक केले गेले. जिल्ह्या-जिल्ह्यात आयसोलेशन वॉर्ड तयार केले गेले. पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर त्याचे पुढे काय करायचे, संशयित असेल तर त्याचा फॉलोअप कसा करायचा याची यंत्रणा कामाला लावली गेली. * पण आपल्याकडे एवढे रुग्ण अचानक कुठून वाढले?- ज्या सात देशांची यादी आपल्याला केंद्राने दिली होती, त्या ठिकाणांहून येणारे पेशंट तपासले जात होते. मात्र दुबईहून अचानक 40 लोकांचा एक ग्रुप आला. आपल्याकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज 50च्या आसपास आहे, त्यातील 20 रुग्ण एकट्या दुबईतून आलेले होते. त्यांच्यामुळे बाधित झालेले 5 ते 8 रुग्ण निघाले. * कोरोनाच्या तिसर्‍या टप्प्यात आपण जाऊ अशी भीती कशामुळे वाटते?- मी स्वत:, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे मंत्रिमंडळ जनतेला हात जोडून विनंती करत आहोत की त्यांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये; पण लोकांनी ऐकले नाही तर नाईलाजाने सगळे बंद करावे लागेल. या काळात हा आजार तिसर्‍या टप्प्यात गेला तर परिस्थिती गंभीर होईल. त्यामुळे सगळ्यांनी जबाबदारी ओळखणे महत्त्वाचे आहे. * रुग्ण तपसणीसाठी लॅबचा तुटवडा आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणी करता येईल?- या लॅब भारत सरकारच्या नियमानुसार उभ्या करायच्या असतात. आम्ही आणखी आठ लॅब सुरू करत आहोत. मात्र त्यासोबतच काही खासगी हॉस्पिटल्सनाही परवानगी देण्याची शिफारस केंद्राला केली आहे. तीदेखील लवकरच कार्यान्वित होतील.(शब्दांकन : अतुल कुलकर्णी)