शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या इतिहासाला वळण देणारे ‘रावपर्व’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 06:00 IST

भारताच्या आर्थिक सुधारणांच्या पर्वात डॉ. मनमोहन सिंगांवर प्रसिद्धीचा झोत राहिला; पण नरसिंह राव यांचे योगदान नजरेआड का गेले? - या मागची कारणे शोधण्याचा ताजा प्रयत्न

ठळक मुद्देआर्थिक सुधारणा धडाडीने अंमलात आणूनही राव त्याचे पालक बनले नाहीत. रावांची जडणघडण, सोनिया गांधींशी झालेला विसंवाद, वैचारिक धारणांचा प्रभाव, भारतीय जनतेची मानसिकता अशा अनेक प्रभावांमुळे आर्थिक सुधारणांचे पालकत्व रावांनी स्वीकारले नाही.

- प्रशांत दीक्षित

(संपादक, लोकमत, पुणे, ‘रावपर्व’चे लेखक)

देशातल्या अर्थसुधारणांचे जनकत्व तत्कालीन अर्थमंत्री म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांचे असले, तरी आर्थिक सुधारणांना भक्कम राजकीय आधार व दिशा देण्याचे काम नरसिंह राव यांनी पंतप्रधान म्हणून केले. स्वतः मनमोहन सिंग ही गोष्ट मोकळेपणे मान्य करतात. मात्र राव यांच्या स्वभावामुळे म्हणा वा रावांच्या डावपेचांचा एक भाग म्हणून म्हणा, मनमोहन सिंगांवर प्रसिद्धीचा झोत राहिला व रावांचे योगदान दुर्लक्षित राहिले. ज्येष्ठ पत्रकार संजया बारू यांनी ‘१९९१’ या पुस्तकातून सर्वप्रथम रावांच्या कामाला न्याय दिला. त्याच पुस्तकातून मला प्रेरणा मिळाली आणि त्यानंतर इंग्रजीतील महत्त्वाच्या पुस्तकांचा संदर्भ घेऊन मी ‘रावपर्व’ लिहिले.

नरसिंह रावांच्या कामगिरीमुळे देशाचा चेहरा बदलून गेला. आर्थिक क्षेत्रातील यशामुळे देशात आत्मविश्वास आला. आज जगाच्या व्यासपीठावर भारत अभिमानाने बसू शकतो त्यामागे रावांच्या आर्थिक व परराष्ट्रीय नीतीचा मोठा आधार आहे. मात्र रावांना त्यांचे उचित श्रेय काँग्रेस पक्षाने दिले नाही, याची कारणे पक्षाच्या जडणघडणीत आहेत, सोनिया गांधींच्या स्वभावात आहेत, तशी देशावर प्रभाव टाकणाऱ्या वैचारिक धारणांमध्येही आहेत.

आर्थिक सुधारणा करताना राव आणि मनमोहन सिंग यांना जबर वैचारिक विरोधाला तोंड द्यावे लागले. हा विरोध डाव्या पक्षांकडून होता तसाच काँग्रेसमधूनही होता. भाजपसह उद्योगक्षेत्रही या अर्थसुधारणांच्या विरोधात होते. रशियातून आयात झालेल्या वैचारिक धारणांचा प्रभाव माध्यमांपासून प्रशासनापर्यंत सर्वत्र होता. स्वतः राव डाव्या विचारधारेकडे झुकलेले होते; पण व्यावहारिक शहाणपण जबर असल्यामुळे त्यांना परिस्थितीचे योग्य आकलन झाले. देशाला आर्थिक अरिष्टातून झपाट्याने बाहेर काढायचे असेल तर आर्थिक धोरण हे राजकारण व वैचारिक हट्टाग्रह यापासून दूर ठेवून शुद्ध आर्थिक पायावर आखले पाहिजे हे रावांनी जाणले. मनमोहन सिंगांच्या रूपात त्यांनी आर्थिक धोरणात व्यावसायिकता आणली. परिणामी १९९१ मध्ये सोने गहाण ठेवण्याची वेळ आलेल्या देशाने अवघ्या सहा वर्षांत इतकी प्रगती केली की, एका भारतीय कंपनीच्या १०० कोटी डॉलरच्या बॉण्ड्सना आंतरराष्ट्रीय बाजारात उत्तम प्रतिसाद मिळाला. ‘भारताला मदत’ ही वाक्यरचना बदलून ‘भारताबरोबर व्यापारी विकास’ अशी वाक्यरचना जगाकडून मान्य करण्यात राव यशस्वी झाले. व्यापारातून समृद्धी हे रावांचे सूत्र होते.

- भारताच्या आर्थिक यशात सनदी अधिकाऱ्यांचे योगदान खूप महत्त्वाचे होते. इंग्रजी ग्रंथकारांनी त्याची योग्य दखल घेतली आहे. कारगिलमध्ये जसा भारत लष्करीदृष्ट्या पेचात पकडला गेला तशीच स्थिती १९९१मध्ये आर्थिक आघाडीवर होती. या काळात राव व मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सनदी अधिकाऱ्यांच्या एका फळीने लढाईत लष्कर बजावते तशी कामगिरी बजावली. अनेक आघाड्यांवर योग्य निर्णय योग्य पद्धतीने घेतले म्हणून आर्थिक सुधारणांना स्थिरता आली. पुढील पंधरा वर्षांत १३ कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले आणि १५ कोटी लोकसंख्येचा मध्यमवर्ग निर्माण झाला. या यशाचे बरेच श्रेय सनदी अधिकाऱ्यांना जाते. योग्य जागी, योग्य अधिकारी नेमणे व त्यांना अचूक दिशा देणे हे रावांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य होते.

आर्थिक सुधारणा धडाडीने अंमलात आणूनही राव त्याचे पालक बनले नाहीत. याचे कारण राव ‘काँग्रेसमन’ होते यामध्ये आहे. रावांची जडणघडण, या जडणघडणीतून सोनिया गांधींशी झालेला विसंवाद, वैचारिक धारणांचा प्रभाव, भारतीय जनतेची मानसिकता अशा अनेक प्रभावांमुळे आर्थिक सुधारणांचे पालकत्व रावांनी स्वीकारले नाही. याचा मोठा दुष्परिणाम असा झाला की देशातील पुढील कोणत्याच नेत्याने आर्थिक सुधारणांचा जोरदार राजकीय पाठपुरावा केला नाही. आर्थिक सुधारणांचा उघड पुरस्कार करून मते देणारी मतपेढी तयार झाली नाही. यामुळे भारत चीनप्रमाणे मोठी झेप घेऊ शकला नाही. मोदींच्या अलीकडील भाषणात कॉर्पोरेट सेक्टरची प्रथमच उघड पाठराखण करण्यात आली असली तरी अजूनही ‘कॉर्पोरेट विरुद्ध किसान’ अशीच मांडणी भारतात होते, ‘काॅर्पोरेट अधिक किसान’ अशी होत नाही. आर्थिक सुधारणांची चांगली फळे मिळूनही ३० वर्षांनंतर ही स्थिती आहे. त्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न म्हणजे ‘रावपर्व’ हे राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले नवे पुस्तक!