शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

पुणेरी कट्टा- अग्निशमन दलाचा अभिमान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 06:00 IST

गेल्या आठवड्यात तर गमतीशीर घटना घडली, गॅलरीत कुत्रा ठेवला होता, चुकून त्याच्याकडूनच आतून दरवाजा लॉक झाला...

-अंकुश काकडे- गेल्या आठवड्यात तर गमतीशीर घटना घडली, गॅलरीत कुत्रा ठेवला होता, चुकून आतून त्यांच्याकडूनच दरवाजा लॉक झाला, झालं रात्री १२ पासून कुत्रा मोठमोठ्याने भुंकत राहिला. साहजिकच सोसायटीतील सर्वांच्या झोपा उडाल्या, काय करायचं दरवाजा तर उघडता येईना, शेवटी मदतीला धावून आलं अग्निशमन दल, त्यातच तो कुत्रा चावणारा पण अतिशय शिताफीनं दुसऱ्या गॅलरीतून जाऊन त्या कुत्र्याची सुटका केली, एव्हाना पहाटेचे ३ वाजले होते. या व अशाा अनेक घटना त्यातून मागे अग्निशमन दल काढीत असते. पण आज पुणे शहराची वाढती व्याप्ती मोठमोठ्या इमारती, अरुंद रस्ते, वाढती वाहनांची संख्या आणि त्यातच कामगारांची अपुरी संख्या आजमितीस ९१० कर्मचाऱ्यांची आवश्यकता या दलास आहे, पण प्रत्यक्षात फक्त ४४४ च कर्मचारी आहेत, म्हणजे जवळपास ५०% कर्मचारी कमी आहेत, पण अशाही परिस्थितीत आम्ही काम चालवून घेतो असे अग्निशमन दलप्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले, की त्याचबरोबर आपलं दल सध्या एकदम अद्ययावत असं आहे, हेदेखील सांगण्यास ते विसरले नाहीत, सध्या पुणे शहरात १४ केंदे्र कार्यान्वित असून १ केंद्र पुरेसा स्टाफ नसल्यामुळे सुरू नाही, तर ४ इिकाणी आणखी केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव आहे, २ केंद्रे जागा गैरसोईची असल्यामुळे तूर्त बंद आहेत. जवळपास ७३ अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत, पूर्वीच्या गाडीत साधारणत: ४००० लिटर पाणी क्षमता असे आता तीच जवळपास दुपटीची झाली आहे. प्रत्येक गाडीसोबत मोठे रबरी पाईप, नवीन पद्धतीचे नोजल आहेत, ज्यामुळे पाण्याचा अचूक मारा होऊ शकतो. मुंबईत आगीवर नियंत्रण आणण्यासाठी पाण्याची टंचाई असते, त्यासाठी समुद्रातून पाणी ओढून आणण्याची यंत्रणा नुकतीच सुरू केली गेलीय, पण पुण्यात अशा प्रकारची यंत्रणा यापूर्वीच कार्यान्वित आहे, जवळपास ३ किलोमीटर अंतरावरून पाणी खेचून आणणारी ही यंत्रणा आहे, तिचा उपयोग नुकताच पाटील इस्टेट आगीच्यावेळी मुळा नदीतून पाणी खेचण्याचा विचार चालू होता, पण त्याचवेळी शेजारीच असलेल्या आयटीपार्क इमारतीत जमिनीखालील पाण्याच्या टाकीतून अशा पद्धतीचे पाणी खेचून आणण्यात आले. अशा पद्धतीने पाणी खेचून ते १० वेगवेगळ्या पाईपमधून वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा मारा होऊ शकतो, अशी ही यंत्रणा आहे. अद्ययावत यंत्रणा स्नोक्रेल ही सुसज्ज गाडी आज आपल्या दलाकडे आहे. १९९३ मध्ये ती प्रथम ती घेतली ती ३२ मीटरपर्यंत वर जाऊ शकते, नंतर १९९८ मध्ये ४२ मीटरपर्यंतची, तर २००८ मध्ये घेतलेली गाडी ७० मीटर उंचीपर्यंत जाऊ शकते, अर्थात या मोठ्या गाड्या शहरातील छोटे-छोटे रस्ते यामुळे त्याचा फारसा उपयोग होत नाही, त्यातूनही आगीत वरच्या मजल्यावर अडकलेल्यांना सोडविण्याचे काम ते करू शकतात. मध्यंतरी कोथरुड येथील त्रिमूर्ती हाईट्स या ५ मजली इमारतीत खालचे ४ ही मजले आगीने जळून खाक होत होते. अशाही परिस्थितीत ५ व्या मजल्यावरील लोकांना या शिडीद्वारे सुखरुप बाहेर काढण्यात आले, ज्यात लहान मुलांचा समावेश होता. पूर्वीच्यावेळी आगीचा बंब जाताना देवळात वाजते तशी घंटा वाजवणे, भला मोठा सायरन असे त्यामुळे नाही म्हटले तरी थोडी भीती वाटे, लोक लगेच बाजूला होत, वाट करून देत, आता मात्र अ‍ॅम्ब्युलन्स, पोलीस, मंत्र्यांच्या गाड्यांचे सायरन सारखेच झालेत, त्यामुळे अग्निशमन दलाचं वेगळेपण नष्ट झालंय, अग्निशमन दलाला डोकेदुखीही पूर्वी १ एप्रिल रोजी फार होत असे, सहज गंमत म्हणून एप्रिल फूल करायचं म्हणून काही खोडसाळ १०१ क्रमांक फिरवून खोटी तक्रार करीत असत, बिचारे अग्निशमन दल लगेच तिकडे हजर, तर तिकडे काय आग नाही आणि काही नाही, विनाकारण त्रास देण्याचे प्रकार पुढे पुढे मात्र कमी होत गेले, कारण कुणी फोन केला याची नोंद अग्निशमन दलाकडे होऊ लागली, आता अग्निशमन दलाकडे आगीची वर्दी आली, की लगेच या दलातर्फे १०८ क्रमांकाला त्याची माहिती दिली जाते, त्यामुळे प्रथमोपचाराची गाडीदेखील लगेच तेथे हजर होते, काही मिनिटांतच या सर्व यंत्रणा कार्यान्वित होत असतात, तरी लोकांच्या तक्रारी मात्र येतच असतात, अनेक वेळा आगीवर नियंत्रण आणताना यांना आणखी एका समस्येला तोंड द्यावे लागते ते म्हणजे बघ्यांची गर्दी, त्यांना बाजूला करण्यात त्यांना नाकीनऊ येते. आपल्या अग्निशमन दलाचे आणखी वैशिष्ट्य असे, की अग्निशमन  दलासंदर्भातील पहिलं संग्रहालय पुण्यात सुरू झालंय ज्यामध्ये ५०,१०० वर्षांपूर्वीची आग विझविण्याचे साहित्य, वस्तू, जुन्या गाड्या यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे पहिले अग्निशमन दलाचे प्रमुख ‘केशवराव जगताप’ यांचं नाव या संग्रहालयाला दिलं आहे. दरवर्षी १४ एप्रिल हा दिवस राज्यात ‘अग्निशमन दल’ म्हणून साजरा केला जातो, पण पुणे शहरात संपूर्ण वर्षभर जनजागृती, विशेषत: शाळेतील विद्यार्थी यांना माहिती देण्याचं काम चालू असतं, शिवाय अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या आगमनाच्यावेळी हेलिपॅडवर हजर राहण्याची जबाबदारीही त्यांना पार पाडावी लागते, शिवाय आपली सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून अग्निशमन दलाचे जवान दरवर्षी एकदा रक्तदान करीत असतात. १९६० पासून आजपर्यंत या ५८ व्या वर्षात आगीच्या किंवा इतर कामात अनेक कर्मचारी जखमी झाले, पण सुदैवाने दगावले नाहीत, ही आपल्या दृष्टीने समाधानाची बाब समजायला हवी, अशा या आपल्यासाठी असलेल्या अग्निशमन दलाचा सर्व पुणेकरांनी अभिमान बाळगायला हवा!     (उत्तरार्ध)(लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक  कार्यकर्ते आहेत.)

टॅग्स :Puneपुणेfire brigade puneपुणे अग्निशामक दल