शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

क्रिकेटचा अतिरेक अन् चुकलेले डावपेच, ...म्हणून थंडावला ‘आयपीएल’ज्वर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 12:47 IST

भारतीय खेळाडूंची एवढी दमछाक यापूर्वी कधी झालेली नाही, ती आता होताना दिसतेय. त्याचा फटका आपल्याला आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बसलेला सर्वांनी पाहिलाय. त्यामुळे खेळाडूंचं प्रेम हे राष्ट्राशी नसून फ्रँचायझीवर अधिक आहे, असा एक संदेश चाहत्यांमध्ये गेलाय. तो काहीसा खराही आहे. 

स्वदेश घाणेकर -सीनिअर कंटेंट एक्झिक्युटिव्ह लोकमतकोरोना काळात दोन वर्ष भारताबाहेर झालेली इंडियन प्रीमिअर लीग अखेर यंदा मायदेशात परतली. कोरोनाचं संकट पूर्णपणे ओरसलेलं नसलं तरी आता निर्बंध उठवण्यात आले आहेत आणि त्याचा फायदा उचलण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल २०२२ भारतातच खेळवण्यासाठी कंबर कसली. महाराष्ट्र सरकारच्या मदतीने बीसीसीआय आयपीएलचे सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात खेळवत आहेत. निर्बंध हटले, स्टेडियममध्ये प्रेक्षक परतले पण, २२ सामने होऊनही अद्याप अपेक्षित प्रतिसाद मात्र मिळताना दिसत नाही. टीव्ही रेटिंगमध्ये आयपीएलची प्रेक्षकसंख्या ३३ टक्क्यांनी घसरल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली. त्याचा जाहीरातींवर विपरित परिणाम होण्याची भीती बीसीसीआयला वाटतेय.

प्रेक्षकांच्या लहरीपणाचा अंदाज ओळखण्यात त्यांची चूक झाली असावी अशी शक्यताही यातून दिसतेय. २०२१ला बीसीसीआयने आयपीएल भारतात खेळवण्याचे केलेले धाडस त्यांच्या अंगलट आले आणि परिणामी बायो बबल फुटला व त्यांना गाशा गुंडाळून पुन्हा संयुक्त अरब अमिरातीचा 'सहारा' घ्यावा लागला. यावेळी कडक नियमावली तयार करून बीसीसीआय आयपीएल खेळवत आहेत. इतक्या वर्षांनी भारतात होणाऱ्या आयपीएलला चांगला प्रतिसाद मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. पण, लॉकडाऊन उठले आणि लोक आपापल्या कामाला लागले, याचा विसर बीसीसीआयला पडला. २०२०-२१ मध्ये लोकं घरी असल्यामुळे आयपीएल यूएईत होऊनही त्याला चांगली व्ह्यूअर्सशीप मिळाली होती. लॉकडाऊनमुळे त्यांच्याकडे बराच फावला वेळही होता आणि त्यामुळेच टीव्ही, ओटीटी प्लॅटफॉर्मवर आयपीएलने रिकॉर्डतोड व्ह्यूअर्सशीप मिळवली. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्वतः ही आनंदाची बातमी शेअर केली. सध्या बीसीसीआय आयपीएल २०२२ची दर्शकसंख्या का रोडावली याचा अभ्यास करण्यात मग्न झाली आहे. लॉकडाऊननंतर या दोन वर्षांत लोकांना बरंच काही शिकवलं. फावल्यावेळात त्यांनी क्रिकेटचा आनंद लुटला खरा, पण त्याने पोट भरत नाही, याची जाण याच काळात लोकांना झाली. ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्यासाठी आयपीएल चैनीचे साधन आहे. पण, जे डायहार्ट क्रिकेट चाहते आहेत, परंतु त्यांना खिसा सांभाळून छंद जोपासण्याची शिकवण या लॉकडाऊनमध्ये मिळाली. त्यामुळे  स्टेडियमवरील प्रेक्षकसंख्या ५० टक्क्यांपर्यंत वाढवूनही फॅनबेस फ्रँचायझींचे सामने सोडल्यास प्रत्यक्ष मॅच पाहायला येणारा प्रेक्षकही कमी झालाय.

मंगळवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच महेंद्रसिंग धोनी विरुद्ध विराट कोहली या सामन्याला मोठ्या संख्येने प्रेक्षक आले होते. आतापर्यंत झालेल्या २२ सामन्यांमध्ये टीव्ही रेटिंग आणि हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक प्रेक्षकसंख्या या सामन्याला मिळाली. प्रेक्षकसंख्या कमी होण्याची काही कारणं... पहिलं प्रमुख कारण म्हणजे लॉकडाऊन हटणे... निर्बंध हटल्यानंतर आता सारेच जण त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्याच्या मागे लागले आहेत. ऑफिसेस पुन्हा सुरू झाली आहेत. खरं तर लॉकडाऊन हे बीसीसीआयला आर्थिक कमाई करण्यासाठी फायद्याचे ठरले, परंतु त्याचा आता इतका उलटा परिणाम होईल, याची अपेक्षा बीसीसीआयनेही केली नसावी... आयपीएल हे युवा खेळाडूंना व्यासपीठ देते, हे खरे असले तरी प्रेक्षकांना खेचून आणणारे खेळाडू फार कमी आहेत. यंदाच्या आयपीएलपूर्वी एबी डिव्हिलियर्सने निवृत्ती जाहीर केली. आयपीएलमधील सर्वात मोठा क्राऊडपूलर (प्रेक्षक खेचणारा) खेळाडू हा एबी होता. त्यात युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल हाही खेळत नसल्याने आयपीएलची रयाच गेली आहे. त्यात सुरेश रैना हा मि. आयपीएल म्हणून ओळखला जातो, त्यालाही डच्चू दिला गेला. त्यामुळे फक्त चेन्नई सुपर किंग्सचेच फॅन्स नव्हे, तर त्याच्याशी जोडलेला प्रत्येक चाहता हा दुखावला गेलाय. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सलाही ट्रोल केले गेला आणि त्याचा परिणामही टीआरपीवर झालाय. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे तगडे संघच सुरुवातीला ढेपाळले. या दोन फ्रँचायझींना मोठा फॅनबेस आहे आणि त्यांची कामगिरी निराशाजनक झाल्याने तो दूरावत चाललाय. रोहित शर्मा, लोकेश राहुल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, विराट कोहली आदी स्टारही काही कमाल दाखवू शकलेले नाहीत. दोन नवीन संघ दाखल झाल्यामुळे प्रस्थापित संघांची घडी विस्कटलेली पाहायला मिळाली. त्यामुळे एका विशिष्ट खेळाडूमुळे फ्रँचायझीशी जोडलेला चाहताही दुरावला. चेन्नईच्या बाबतीत जे रैनामुळे घडले, ते मुंबई इंडियन्सच्या बाबतीत पांड्या बंधूमुळे घडताना दिसतेय. बंगळुरूने युझवेंद्र चहलला पुन्हा न घेणे, हेही अनेकांना पटलेले नाही.  

प्रेक्षक पुन्हा येतील?आज युवा खेळाडू भारताकडून खेळण्याआधी आयपीएल खेळण्याचे स्वप्न पाहत आहेत. आयपीएलचा तिसरा आठवडा संपलाय आणि अजून सहा आठवडे ही स्पर्धा रंगणार आहे. त्यामुळे बीसीसीआय चाहत्यांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यात किती यशस्वी होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

टॅग्स :IPLआयपीएल २०२२Indian Cricket Teamभारतीय क्रिकेट संघ