शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
2
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
3
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
4
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
5
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
6
भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
7
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
8
'ईसीजी' काढणारे स्मार्ट वॉच आले! भारतात 'या' किंमतीला कंपनी लाँच करून बसली...
9
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
10
हुंड्याला नकार! वराने थेट २१ लाख रुपये लग्न मंडपातच परत केले; पाहुणे बघतच राहिले, वधू भावूक
11
माझ्या विरोधात काही प्रयत्न केले तर मी भाजपाचा पाया हादरवून टाकेन; ममता बॅनर्जी यांचे आव्हान
12
Solapur Crime: एकाच दिवशी चौघांनी मृत्युला मारली मिठी, कुणी घरात, कुणी बाहेर संपवले आयुष्य
13
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! गुंतवणूकदारांचे ३३,००० कोटी पाण्यात! 'हे' ठरले टॉल लूजर्स
14
मार्च पर्यंत ४००० अब्ज डॉलर्सची होणार देशाची अर्थव्यवस्था; कोणी केला हा दावा, पाहा
15
IND vs SA 2nd Test Day 4 Stumps : दोन्ही सलामीवीर तंबूत! कुलदीपला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याची वेळ!
16
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
17
डेली SIP की मासिक SIP? म्युच्युअल फंडात जास्त फायदा कशात? गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा खास सल्ला
18
उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट, केली तब्येतीची विचारपूस; म्हणाले, “आता लवकरच...” 
19
रिलायन्सचा वर्षात २७ टक्क्यांचा दमदार परतावा! भविष्यात किती वाढ होईल?, ब्रोकरेज फर्मने दिलं टार्गेट
20
आधी पत्नीला संपवलं, नंतर पतीने स्वतःही घेतला जगाचा निरोप; मरणापूर्वी भिंतीवर लिपस्टिकने लिहिली संपूर्ण कहाणी!
Daily Top 2Weekly Top 5

‘आई मला खेळायला जायचं , जाऊ दे न - वं’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 09:20 IST

समाजमन : धावपळीच्या या स्पर्धात्मक जगात कुणाकडेही खेळासाठी वेळ नाही. युवा पिढी व विद्यार्थी वर्ग एकतर अभ्यासात दंग असतो किंवा दूरदर्शन, मोबाईल, संगणक तसेच सायबर कॅफेत मित्रांबरोबर चॅटिंग करीत बसलेला असतो. पालकही फुरसतीच्या काळात मोबाईलवरच असतात . त्यामुळे बऱ्याचदा मुलांना योग्य मार्गदर्शन व प्रबोधन कोणी करावे हा एक प्रश्नच आहे.

- प्रा.सुदर्शन धस 

सध्या मराठी चित्रपट निर्माते नागराज मंजुळे यांच्या ‘नाळ’ चित्रपटातील गीत ‘आई मला खेळायला जायचं, जाऊ दे न - वं’ हे  प्रचंड लोकप्रिय झाले आहे. त्याचं कारण त्यातील सहजसुलभ, अस्सल, ग्रामीण बोलीभाषेतील शब्दांचा गीतामध्ये चपखल वापर, उत्कृष्ट संगीत व ताल, सूर व लयीचा योग्य वापर आहे. त्यामुळे हे गीत आपल्या सगळ्यांच्याच अंत:करणाला साद घालते. या गीतामधील छोटा, गोंडस मुलगा आईकडे खेळायला जाण्यासाठी परवानगी मागतो.

पण वास्तवात आणि त्यातही विशेषत: शहरी जीवनात आपल्याला लहान मुलांचे भावविश्व कसे दिसते ? ती मुले सतत शाळा व क्लासच्या मागे पळत असतात. एखादा आवडता खेळ देहभान विसरुन खेळता येऊ शकतो. त्यातून मनमुराद, निखळ, निर्भेळ आनंद मिळू शकतो, हे त्यांच्या गावीही नसते. पालकही मुलांच्या तथाकथित गुणवत्तेच्या व त्यामुळे मिळणाऱ्या कथित प्रतिष्ठेपायी जिवाचा आटापिटा करीत नुसते धावत असतात.  

साहजिकच धावपळीच्या या स्पर्धात्मक जगात कुणाकडेही खेळासाठी वेळ नाही. युवा पिढी व विद्यार्थी वर्ग एकतर अभ्यासात दंग असतो किंवा दूरदर्शन, मोबाईल, संगणक तसेच सायबर कॅफेत मित्रांबरोबर चॅटिंग करत बसलेला असतो. काही जण तर अभ्यासाच्या फंदात न पडता, निव्वळ मोबाईलच्या आहारी जातात. अर्थात याला काही प्रमाणात अपवाद आहेतच. पालकही फुरसतीच्या काळात मोबाईलवरच असतात . त्यामुळे बऱ्याचदा मुलांना योग्य मार्गदर्शन व प्रबोधन कोणी करावे हा एक प्रश्नच आहे. खरे तर इथे अगोदर पालकांचेच प्रबोधन होणे जरुरीचे आहे. ज्यामुळे, ते स्वत: आपले जीवन आरोग्यपूर्ण जगू शकतील व इतरांसमोर आदर्श ठेवतील.

या बाबतीत मला प्रसिद्ध उद्योगपती अजिम प्रेमजी यांनी विद्यार्थ्यांना दिलेला संदेश आठवतो. ते म्हणतात, बाहेर पाऊस पडत असेल आणि तुम्हाला त्या पावसात भिजण्याची, नाचण्याची किंवा गाण्याची इच्छा झाली तर, अगदी मनमुरादपणे पावसात जाऊन तो आनंद घ्या. मुलांचे बालपण, त्यांचा आनंद हिरावून घेऊ नका, असे ते पालकांना आवाहन करतात. आज शालेय खेळ, विविध क्रीडा स्पर्धा मोठ्या प्रमाणावर घेतल्या जातात. शासन क्रीडा क्षेत्राला भरपूर प्रोत्साहन देत आहे. यामुळे भावी पिढीचा सर्वांगीण विकास व्हावा हा उद्देश आहे. विविध क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंना पुढे अनेक उज्ज्वल संधी मिळतात. आज विविध शहरांमध्ये मॅरेथॉन स्पर्धा घेऊन, धावण्याचे महत्त्व स्पष्ट केले जाते. कबड्डी, खो - खो, कुस्ती, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, जलतरण, शरीरसौष्ठव यांसारख्या स्पर्धा होतात. त्यासाठी प्रशिक्षण शिबिरे होतात. गिर्यारोहण, ट्रेकिंग वगैरेंसारखे धाडसी उपक्रम होतात. आपली शारीरिक, मानसिक कुवत, प्रकृती, आवड व सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वत:ची जिद्द , कष्ट व परिश्रम करण्याची तीव्र इच्छाशक्ती यामुळे आवडीच्या क्षेत्रात आपण यशस्वी होऊ शकतो. यातील एखाद्या खेळाचे रुपांतर, नंतरच्या काळात छंदातही होऊ शकते. यामुळे आपले आरोग्य उत्तम राहू शकते. इतरांसमोर एक आदर्शही निर्माण होईल.

‘आई मला खेळायला जाऊ दे न - वं’ असे म्हणण्याऐवजी आजची मुले म्हणतात, ‘आई मला सायबर कॅफेत जाऊ दे न - वं ’ हे चित्र बदलायला हवे. संगणक व संगणकाच्या सहाय्याने होणारा अभ्यासही महत्वाचा आहे. पण त्याचा वापर योग्य प्रमाणातच झाला पाहिजे . आपली आजची जीवनशैली खरोखर आरोग्यदायी आहे का ? हा खरा प्रश्न आहे.पालकांनी स्वत: व्यायाम, योगासने, सकाळ - संध्याकाळ शक्य असेल तेव्हा पायी चालणे, दूरदर्शन व मोबाईलचा मर्यादित वापर व विविध खेळांप्रती आस्था ठेवून, मुलांना निसर्गाच्या सानिध्यात नेले व खेळ-व्यायामाचे महत्त्व स्वत: कृतीतून दाखवून दिले तर नवीन पिढी नक्कीच शारीरिक , मानसिक व बौद्धिकदृष्ट्या सक्षम बनेल. आवडत्या क्षेत्रातील अभ्यासाबरोबरच मग ही छोटी -छोटी  मुले पुन्हा गुणगुणायला लागतील व आईला म्हणतील, ‘आई मला खेळायला जायचं , जाऊ दे न - वं’     

(लेखक साहित्यिक व रयत शिक्षण संस्थेत अध्यापक आहेत.)

टॅग्स :MobileमोबाइलStudentविद्यार्थीFamilyपरिवारHealthआरोग्य