शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

प्राजक्ताच्या फुलांचे देठ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 06:00 IST

कोल्हापुरात गुरु अल्लादिया खाँसाहेब यांच्याकडे शिक्षण घेत असलेल्या आणि मनापासून त्यांची भक्ती करणाऱ्या तानीबाई. प्राजक्ताच्या हंगामात या फुलांचे देठ गोळा करून, ते सुकवून, कुटून ठेवायच्या. ही पूड उकळून त्यात साफा बुडवून ठेवला की देठांच्या मंद केशरी रंगाची हलकी झाक गुरुजींच्या साफ्यावर चढत असे..!

ठळक मुद्देअल्लादिया खाँसाहेब पुढे मुंबईत आले. कोल्हापुरात असलेले प्राजक्ताच्या फुलांचे वैभव मुंबईत कुठून मिळणार? तेव्हा केशरी रंगाच्या वड्या वापरून वेळ निभवावी लागे! या साफ्यासाठी त्यांना अतितलम मलमल लागे.

- वंदना अत्रे

ताकाहीरो अराई नावाच्या जपानी तरुणाशी गप्पा मारीत होते. विषय अर्थातच भारतीय संगीत. ताकाहीरो जन्माने आणि नावाने जपानी असेल; पण मनाने फक्त भारतीय. छानसे हिंदी बोलणारा. भारतीय संगीत आणि अन्न यावर तुडुंब प्रेम करणारा. तो भारतात आलाच मुळी संतूर आणि पंडित शिवकुमार शर्मा यांचे बोट धरून. अन्य काही करणे त्याला अगदी नामंजूर होते. त्याला विचारले, ‘आपला देश, कुटुंब, शिक्षण सोडून एका नव्या देशाशी आणि वातावरणाशी जमवून घेताना कधी थकवा आला? वैफल्य जाणवले?’

‘वैफल्य?’ एक क्षणभर थांबत तो म्हणाला, ‘ते एकदाच येऊ शकते. माझ्या गुरुंना सोडून जायची वेळ माझ्यावर आली तर..! तशी वेळ आलीच तर माझ्यासमोर फक्त नैराश्याचा अंधार असेल !’

मुंबईत पाय ठेवीपर्यंत गुरु-शिष्य परंपरा हे शब्दसुद्धा ज्याच्या कधीच कानावर पडले नव्हते असा हा तरुण. गुरुंबरोबर प्रवास करताना त्यांच्या बारीक-सारीक गोष्टी आणि गरजा लक्षात घेत गुरु-शिष्य नात्याची घडण आणि वीण अनुभवत गेला. त्याबद्दल आपल्या गुरुकडून ऐकलेल्या कितीतरी गोष्टी मला सांगत राहिला तेव्हा मनात आले या गोष्टी आणि परंपरा माझ्या देशात किती लोकांना ठाऊक असतील? गुरु-शिष्यांचा परस्परांवर असलेला अधिकार आणि तरीही दुसऱ्याच्या आत्मसन्मानाचा सांभाळ हा अवघड तोल जाणला नेमका आम्ही?

गुरु-शिष्य परंपरा म्हटल्यावर नेहेमी आठवतो तो रामकृष्ण बाक्रे यांच्या ‘बुजुर्ग’ पुस्तकात वाचलेला एक तरल अनुभव. गुरुच्या माथ्यावर सदैव असणाऱ्या साफ्याच्या केशरी रंगाचा सौम्य झळाळ सांभाळण्यासाठी प्राजक्ताच्या फुलांच्या देठाचा रंग करणाऱ्या शिष्येचा!

कोल्हापुरात गुरु अल्लादिया खाँसाहेब यांच्याकडे शिक्षण घेत असलेल्या आणि मनापासून त्यांची भक्ती करणाऱ्या तानीबाई यांनी या कामासाठी धोंडीबा अडसुळे नावाच्या माणसाची खास नेमणूक केली होती. प्राजक्ताच्या हंगामात या फुलांचे देठ गोळा करून, ते सुकवून, कुटून ठेवायचे हे त्याचे काम. ही पूड उकळून त्यात साफा बुडवून ठेवला की देठांच्या मंद केशरी रंगाची हलकी झाक गुरुजींच्या साफ्यावर चढत असे..!

पुढे गुरु मुंबईत आले. कोल्हापुरात असलेले हे प्राजक्ताच्या फुलांचे वैभव मुंबईत कुठून मिळणार? तेव्हा केशरी रंगाच्या वड्या वापरून वेळ निभवावी लागे! या साफ्यासाठी त्यांना अतितलम मलमल लागे. ती इतकी पारदर्शक आणि तलम असायची की तळहातावर चौपदरी घडी ठेवली तरी हातावरच्या रेषा स्पष्ट दिसत असत...!

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ही मलमल मिळवण्यासाठी फार धावाधाव करावी लागायची. पण या छोट्या-छोट्या गोष्टी सहज उत्स्फूर्तपणे घडत होत्या. अपेक्षा नसताना केल्याची एक मौज होती त्यात. आणि ही सहजता त्या गुरुमधेही होतीच की, समोर असलेला एखादा पेच शिष्यापुढे सांगायला संकोच वाटू नये, अशीच ही सहजता होती.

अशीच एक घटना बाक्रे यांनी या पुस्तकात लिहिली आहे. ही आठवण जगन्नाथबुवा पुरोहित यांची. एका रात्री अडीच वाजता बुवांच्या शेजारी राहणारे एक गृहस्थ पंडित वसंतराव कुलकर्णी या बुवांच्या शिष्याच्या घरी गेले. वसंतराव दचकले, म्हणाले ‘एवढ्या रात्री आलात?’ ‘असाल तसे या असा निरोप दिलाय बुवांनी’. ‘तब्येत ठीक आहे ना त्यांची?’ ‘हो.. थोडे चिंतित वाटले...’ वसंतराव गुरुकडे पोहोचले तेव्हा डोक्यावरून शाल पांघरून बुवा बसले होते. बुवांनी एक कागद त्यांच्या हातात दिला. अहिर भैरव रागातील एक नवी बंदिश होती ती. शब्द होते

‘अरे तू जागत रहियो, मान लो मेरी बात,

जग झुटा, सब माया झुटी, कोई नाही तेरा गुनिदास’

वाचून वसंतराव गुरुजींना म्हणाले, ‘छानच झालीय..’ कातावून गुरुजी म्हणाले, ‘अहो, समेवर यायला दोन मात्रा कमी पडतायत.. जरा हाताने ताल धून गुणगुणून बघा... कौतुक कसले करताय...’

हातातले कॉफीचे कप खाली ठेवीत दोघेही काही क्षण स्वस्थ बसले. मग वसंतरावांनी पेन उचलला आणि लिहिले, ‘कोई नाही तेरा गुनिदास, इस जगमे...’ सम बरोबर साधत होती! प्रसन्न झालेले गुरुजी त्या उत्तररात्री, शिष्याने दुरुस्त केलेली अहिर भैरवची बंदिश पहाट होईपर्यंत गात राहिले...!

(लेखिका संगीत आस्वादक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

vratre@gmail.com