मांडवा
By Admin | Updated: May 21, 2016 13:58 IST2016-05-21T13:58:39+5:302016-05-21T13:58:39+5:30
इब्न बतुता.. मध्ययुगातला एक महान भटका प्रवासी. वेडावाकडा भरपूर फिरला. तो म्हणतो, ‘प्रवास ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला पूर्णत: नि:शब्द, थक्क करून सोडते. आणि त्याचवेळी तुमचं रूपांतर एखाद्या कथाकारातही करून टाकते.

मांडवा
>
मसाल्यांचे जुने सुगंध सरलेल्या हवेल्यांच्या जगात..
इब्न बतुता.. मध्ययुगातला एक महान भटका प्रवासी. वेडावाकडा भरपूर फिरला. तो म्हणतो, ‘प्रवास ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला पूर्णत: नि:शब्द, थक्क करून सोडते. आणि त्याचवेळी तुमचं रूपांतर एखाद्या कथाकारातही करून टाकते. तुम्ही गोष्टीच सांगत सुटता त्या प्रवासाच्या!’
अशीच एक अत्यंत रोचक, शतकानुशतकं जुनी सुंदर कहाणी मी एका धूळमाखल्या छोटय़ाशा शहरात ऐकली होती. पाचशे वर्षापूर्वी मध्य आशियाई प्रदेशात तांडे प्रवासाला निघत. या तांडय़ांमध्ये उंट, घोडे आणि पायी चालणा:या माणसांचं दळ असायचं. हे तांडे द:याखो:यांमधून, पर्वतरांगांमधून आणि बंजर वाळवंटांमधून प्रवास करत एका ठिकाणाहून दुस:या ठिकाणी जायचे. मोठमोठे व्यापारी त्या तांडय़ांचे मालक असत. चीनमधला सिल्क रूट तर थेट भूमध्य समुद्री भागात जात असे आणि तिकडून सोन्याच्या राशी चीनच्या दिशेनं याच रस्त्यानं येत असत. याच सिल्क रूटवरल्या वाळवंटी भागात प्राचीन भारतातल्या मसाल्याच्या व्यापा:यांची चहलपहल असे आणि हा व्यापार जिथं चाले ते होतं आपलं आजचं राजस्थान! राजस्थानात मी आजवर अनेकदा गेलो आहे. अशाच एक प्रवासात मी जयपूरच्या उत्तरेला असलेल्या मांडवा नावाच्या एका छोटय़ा, टुमदार शहरात जाऊन पोहचलो होतो. राजस्थानातलं कुठलंही शहर असतं तसंच हेही शहर प्रथमदर्शनी दिसतं. कोरडं, रखरखीत, बारीक वाळूनं माखलेलं, रंगीबेरंगी सुंदर साडय़ा, फेटे आणि उंटाच्या पायातल्या घुंगरानं रंगलेलं. पण जरा या शहरात थांबलं, माणसांशी बोललं की कळतं, हे शहर साधंसुधं नाही, या शहराला फार मोठं ऐतिहासिक महत्त्व आहे. या शहरात शतकानुशतकांच्या जुन्या, आताशा म्हाता:या दिसणा:या हवेल्या भेटतात. या हवेल्या एकेकाळच्या प्रवासात अनेकांना आसरा देत असत. चीन आणि युरोप असे दोन्हीकडचे प्रवासी इथं मसाल्यांची खरेदी करत, त्याबदल्यात मोजून सोनं देत.
प्रवासात सोयीचा टप्पा म्हणून व्यापा:यांनी अनेक शकला लढवल्या. या ‘व्यापार मार्गावरचा’ एक उत्तम थांबा म्हणून इथं प्रवाशांसाठी मोठमोठय़ा हवेल्या बांधल्या गेल्या. थकलेभागले, भुकेले व्यापारी इथं येत आणि या हवेल्यांमध्ये आपापल्या ऐपतीप्रमाणं राहत. कुणी हवेलीमधल्या आलिशान प्रासादात निवारा घेत असे, तर काही जण मोठमोठय़ा व्हरांडय़ांमध्ये पथा:या लावत. मग आल्यागेल्या प्रवाशालाही अनेक व्यापारी मसाले विकू लागले. त्यातून सोन्याची कमाई होऊ लागली. सुंदर हवेल्या उभ्या राहू लागल्या. त्यांच्या भिंतीवर रंगीबेरंगी, मोठ्ठाली चित्रं काढली गेली. काही ठिकाणी तर या भिंतींवर हिरेमाणकं चढली.
मांडवा प्रांतावर अनेक वर्षे शेखावतांचं वर्चस्व होतं. त्यांच्याच राजकीय कारकिर्दीत मांडव्यात सोन्याच्या राशी उधळल्या जात होत्या. आणि या शेखावती भागाचे चर्चे अनेक ठिकाणी कुतूहलानं सांगितले जात. अनेक प्रवाशांनी मांडवा आणि इथल्या प्रवासाचं वर्णन आपल्या प्रवासवर्णनात केलेलं दिसतं. एका अर्थानं हे व्यापारीही धडाडीचे, उत्साही आणि हौशी प्रवासीच होते.
पण काळानं कूस बदलली. तो व्यापार मार्गही उरला नाही आणि ते प्रवासीही. जमिनीवर राजकीय रेषा आखल्या गेल्या आणि त्या रेषेच्या अल्याडपल्याड, शेजारीशेजारी राहणारी माणसं एकमेकांचे शतजन्माचे वैरी झाले. मात्र आजही मांडव्यातल्या रेतीभरल्या धूळवा:यात या हवेल्या उभ्या आहेत. त्यांचे रंग उडाले, पोपडे पडले, चित्रतले रंग तर पार फिक्कट झाले. आता या मांडवा शहरात पूर्वीची श्रीमंती नाही, आहे तो फक्त गल्लोगल्ली गाडय़ांच्या भोंग्याचा कर्णकर्कश आवाज. तो मसाल्यांचा मुग्ध करणारा सुगंध चुकून कुठे येत नाही.
सुगंध सरला तरी या मांडव्यातल्या गोष्टी सरणार नाहीत. प्रवाशांनी परस्परांना सांगितलेल्या, लिहून ठेवलेल्या, खासगीत कुजबुजलेल्या गोष्टी या हवेत आहेत. आणि प्रत्येक नव्या प्रवाशासोबत एकेक गोष्ट जोडलीच जाते या गोष्टींच्या वैभवाशी. ही माझीही एक!
(छायाचित्रणाच्या माध्यमातून समाजकार्याबद्दल पद्मश्री पुरस्कारप्राप्त छायाचित्रकार ‘लोकमत’ समूहाचे
फोटो एडिटर आहेत.)