शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

माणूस आधी मनातून मरतो, मग प्रत्यक्षात मरतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 06:05 IST

आपल्या सर्वांना अजून खूप जगायचे असेल, तर कोविडमुळे मरणाचा विचार करून उपयोग नाही.

ठळक मुद्देत्या म्हाताऱ्या बाबांनी मला विचारले, "बेटा, तू माझ्यावर विश्वास का ठेवला नाहीस?" मी म्हणालो, "कारण दादाजी मी माझ्या आयुष्यात १०८ वर्षांच्या व्यक्तीला कधीच भेटलेलो नाही."

- डॉ. नीलेशमोहिते

(लेखक कम्युनिटी सायकियाट्रीस्ट असून आसाम आणि अरुणाचल प्रदेशात 

मानसिक आरोग्य जनजागृती या विषयात कार्यरत आहेत.)

काही दिवसांपूर्वी जेव्हा माझा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यावेळी मी एका कुटुंबाचे टेलीकाैन्सिंलिंग करत होतो. कुटुंबाने आपला तरुण मुलगा (कदाचित माझ्याच वयाचा) गमावला होता. ही केवळ एकच केस नव्हती; परंतु कोविड -१९ मुळे मृत्यू झालेल्या अनेक कुटुंबांचे समुपदेशनासाठी मला सतत कॉल येत असतात. माझ्या नातेवाईक आणि मित्र मंडळीमध्ये कोविड कॉम्प्लिकेशनमुळे बरेच लोक मरण पावले आहेत, त्यामुळे कोविडमुळे एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हाची परिस्थिती मी जवळून पाहिली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच तरुणांबद्दल मला माहिती होती. माझे स्वतःचे फुफ्फुस आधीपासूनच हायपर इन्फ्लेमेटरी आहे आणि गेल्या १० वर्षात फुफ्फुसांच्या ॲलर्जीचे ३ दीर्घकालीन एपिसोड येऊन गेले आहेत. रिपोर्ट चेक करताना आणि काैन्सिलिंग चालू असताना पटकन मनात एक विचार येऊन गेला की "मी कोविडने मरणार तर नाही ना?"

हा एक जुना फोटो आहे. फोटोतील रुग्ण १०८ वर्षांचा माणूस आहे. जेव्हा त्यांनी मला प्रथमच सांगितले तेव्हा मी विश्वास ठेवला नाही की, हे १०८ वर्षांचे आहेत म्हणून. मी तीन वेळा हाच प्रश्न विचारला आणि त्यांनी पुन्हा तेच उत्तर दिले. शेवटी माझी खात्री पटली की, ते वृद्ध खरोखरच १०८ वर्षांचे आहेत.

त्या म्हाताऱ्या बाबांनी मला विचारले, "बेटा, तू माझ्यावर विश्वास का ठेवला नाहीस?" मी म्हणालो, "कारण दादाजी मी माझ्या आयुष्यात १०८ वर्षांच्या व्यक्तीला कधीच भेटलेलो नाही."

बाबा हसले आणि उत्तरले, "आज देख लिया ना, तो हमेशा याद रखना और तुम भी मेरी तरह जीना."

बाबांच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती. लहानपणी म्हणे त्यांनी गोष्टींमध्ये ऐकले होते की योगी, साधू इत्यादी २००..३०० वर्षे जगतात म्हणजे सामान्य व्यक्तीला १५० वर्षे जगणे आरामात शक्य आहे; हे त्यांनी गृहीत धरलं. त्यांचा आशावाद पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला. झोपेच्या तक्रारींसाठी ते आले होते. शेवटी मी फी घ्यायला नकार दिला तेव्हा म्हणाले, " इतका आश्चर्यचकित होऊ नकोस बेटा, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव - माणूस आधी मनातून मरतो आणि नंतर वास्तवात मरतो."

माझा कोविड रिपोर्ट तपासत असताना त्या बाबांचे शब्द आठवले आणि कोविडमुळे मरणाचा विचार पुन्हा करायचा नाही, असे मी ठरवून टाकले . आपल्या सर्वांना अजून खूप जगून हे जग सुंदर, सुरक्षित आणि ऊबदार बनवायचे आहे त्यामुळे मरणाचा विचार करून उपयोग नाही. लगेच मी आउटपुट देणारे विचार करण्याऐवजी प्रोसेस (प्रक्रिया)देणाऱ्या विचारांवर लक्ष केंद्रित केले.

प्रक्रिया देणाऱ्या विचारांचा अर्थ असा आहे की, मला कोणत्या गोष्टींवर(प्रक्रिया)लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. पुढील धोके टाळण्यासाठी मला उपाय (उपचार, विश्रांती, देखरेख) करणे आवश्यक आहे. म्हणून मी स्वत: ची काळजी घेण्याकडे सर्व लक्ष दिले होते. निष्कर्षाचा जास्त विचार केला नाही.

मी आउटपुटचा (निष्कर्ष ) विचार (मृत्यू किंवा प्रकृृती गंभीर होणे) पूर्णपणे कमी केले. म्हणून मी प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करण्यास अधिक सक्षम ठरलो (काळजी घेणे).

जेव्हा आपण सतत शोक समुपदेशन आणि मृत्यूच्या बातम्या ऐकत असतो तेव्हा मृत्यूबद्दल विचार न करणे कठीण होते; परंतु मी बाबांच्या त्या वक्तव्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला की .”माणूस आधी मनातून मरतो आणि नंतर वास्तवात मरतो. "विज्ञानदेखील आपल्याला हेच सांगते. आपण चिंताग्रस्त असल्यास, निराश किंवा तणावग्रस्त असल्यास आपली प्रतिकारशक्ती कमी होते आणि कॉम्प्लिकेशन वाढण्याची शक्यता अनेक पटीने वाढते. निरोगी मन आपल्याला निरोगी जीवन देते. योग्य मानसिकता ठेवणे ही सुखरूप बरे होण्याची सर्वात महत्त्वाची पायरी आहे.

जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये जगभरात जास्त लोक मरण पावतात.. त्या मागचे एक कारण असे : जगभरातील बऱ्याच धर्मांमध्ये त्यांचे मुख्य सण (दिवाळी, ख्रिसमस, ईद) हे वर्ष संपत आले की असतात म्हणून मरणासन्न लोक सणांपर्यंत जगण्यासाठी स्वतःला आशावादी ठेवतात; परंतु सण/उत्सव गेल्यावर त्यांच्या जगण्याची आशा कमी झालेली असते कारण पुढच्या वर्षीचा उत्सव अद्याप खूप दूर असतो आणि अजून एक वर्ष वाट बघणे बऱ्याच वेळा कठीण असते म्हणून जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये जास्त लोक मरण पावतात.

जगण्याची आशा ही दीर्घ आयुष्यासाठी खूप मजबूत आणि महत्त्वपूर्ण शक्ती आहे. मला भेटलेल्या त्या बाबांचे शब्द नेहमी लक्षात ठेवा : "माणूस आधी मनातून मरतो आणि नंतर वास्तवात मरतो."

(ताजा कलम - मी आता ठीक आहे आणि जवळजवळ बरा झालो आहे.)

अनुवाद- श्रुतीखामकर