शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

मैहर बँड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 6:00 AM

१९१७ सालच्या महामारीत माणसे टपटप मरून पडत असताना, बाबा अल्लाउद्दिन खां यांनी उभ्या केलेल्या एका संगीत चमत्काराची कहाणी..

ठळक मुद्देकाळोखाने दाही दिशा दाटून फुटणार असे वाटत असताना उद्याचा इतिहास लिहिणाऱ्या, आज आकार घेत असलेल्या वाद्यवृंदाचे नवे जोमदार स्वर कुठून तरी तरंगत कानी येतायत. तुम्ही ऐकताय का ते? 

- वंदना अत्रे

ही गोष्ट महामारीमध्ये घडलेली...! पक्ष्यांनी दाणे टिपावे, तशी माणसे टिपत जाणाऱ्या संकटाची, पण तरीही या कथेतला नायक मात्र तो नाही. ही कथा एका संगीतवेड्या आजोबांची आणि त्यांच्या अनेक अनाथ नातवांची. मृत्यूचे तांडव सुरू असतांना विविध जातीची अन् स्वरांची वाद्य घेऊन नवे राग आणि त्यात नव्या बंदिशी रचून जगाला रसरशीत उमेद देणारे असे काही निर्माण करणारे आजोबा आणि त्यांच्या दीडशे नातवांची. कदाचित फिल्मी किंवा काल्पनिक वाटावी अशी, पण अगदी खरीखुरी..

गोष्ट मध्य प्रदेशातील मैहर नावाच्या संस्थानातली! बाबा अल्ला उद्दीन खां नावाच्या अवलिया गुरूचे आणि ब्रजनाथ सिंग नावाच्या सहृदय संस्थानिकाचे मैहर. बाबा हे या संस्थानचे राजगायक. संगीताचे शिक्षण घेण्यासाठी वयाच्या आठव्या वर्षी घरातून पळून गेल्यावर देशभर आडवी-उभी भटकंती करीत रस्त्यावरचे आयुष्य जगत अनेक गुरू आणि अनेक वाद्य याचे शिक्षण घेत समृद्ध होत गेलेला हा गुरू. ... १९००च्या आगेमागे मध्य प्रदेश आणि आसपासच्या राज्यांमध्ये लाल ताप नावाच्या एका विचित्र तापाची साथ आली. ती कशी आटोक्यात आणायची, यावर विचार करेपर्यंत भांबावलेल्या समाजात हा-हा म्हणता बळी टिपत गेली. शेतात कामावर जाणारी पुरुष मंडळी आणि बायाबापड्या या तापाला बळी पडत होते, मागे उरत होती अनाथ, एकाकी सैरभैर झालेली मुले... जगायचे कसे आणि कोणाच्या आश्रयाने याचे उत्तर ठाऊक नसलेली. संस्थानिक ब्रजनाथ सिंग तेव्हा बाबांकडून संगीताचे शिक्षण घेत होते.

एका अस्वस्थ दिवशी, गाणे थांबवत ते बाबांना म्हणाले, “अवेळी अनाथ होण्याचा शाप ज्यांच्या माथी लिहिला गेलाय, त्या मुलांना शिकवायचे का गाणे?”

- बघता-बघता दीड-दोनशे अनाथ मुले राजवाड्यावर जमली. बाबांनी प्रत्येकासाठी मनात काही वाद्यांची योजना केली होती. हार्मोनियम, बासरी, सतार, इस्रज, जलतरंग, ढोलक, पखवाज अशी बरीच भारतीय वाद्य, शिवाय राजांच्या वाड्यावर एक भला मोठा पियानो होता. व्हायोलीन आणि क्लॅरिनेट मागवले गेले. झोपडीत राहणारे अनार खान, तान्सू प्रसाद, झुरेलाल, बैजनाथ सिंग, महीपत सिंग, चुन्नेलाल, लालची सूरदास, रामस्वरूप वाद्य शिकू लागले. काही मुली पण असाव्या बहुदा.

बाबांचा दिवस सुरू व्हायचा, तो राजाच्या शिक्षणाने आणि मावळायचा तो मुलांच्या सहवासात. आठ तास राजाचे शिक्षण आणि चार तास या मुलांसाठी. मनात आकार घेत असलेल्या एका योजनेसाठी बाबांचीही तयारीही सुरू होती! तरुण वयात हबू दत्ता नावाच्या एक संगीत संयोजकांकडे बाबा काम करीत असत. अनेक वाद्यांवर वाजणाऱ्या विविध बंदिशींचा वाद्यमेळ तेव्हा बाबांनी बघितला होता. असा मुलांचा वाद्यमेळ, देशातील पहिला-वहिला बँड त्यांच्या मनात होता..! संगीत शिक्षणाचा गंधही नसलेल्या आणि महामारीने ज्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले आहे, अशा अनाथ मुलांमधून बाबा तो उभा करीत होते. शास्त्रीय संगीताला बाबांनी तोपर्यंत हेमंत भैरव, मांज खमाज, गांधी बिलावल, मदनमंजिरी अशा कितीतरी नव्या रागांची देणगी दिली होती. आता या मुलांच्या वाद्यवृंदासाठी बाबा रागावर आधारित सोप्या बंदिशी तयार करू लागले, शिवाय काही पाश्चिमात्य सुरावटीही मनात होत्याच....जोमाने सराव सुरू झाला. असह्य दुःखाच्या काळात देशातील पहिला वाद्यवृंद उभा राहत होता!

वेदनेचा डंख असतांना निर्मितीच्या, सृजनाच्या आशीर्वादाचा विसर न पडणारी माणसे इतिहास घडवतात. मैहर बँड हा तो इतिहास आहे. बाबा अल्ला उद्दीन खां नावाच्या एका वेड्या कलाकाराने आपल्या संस्थानिकाच्या मदतीने निर्माण केलेला अनाथ मुलांचा मैहर बँड. देशातील पहिला वाद्यवृंद. महामारीच्या थैमानाला वेगळ्या भाषेत दिलेले उत्तर आहे ते. माणसाचे आयुष्य असे आहे-नाहीच्या टोकदार काट्यावर टांगलेले असते, उद्याचा भरवसा नसतो, अशा वातावरणातही भविष्याचे आश्वासन देणारे हिरवे कोंब त्या काट्याला फुटू शकतात हे सिद्ध करणारे.

बाबांच्या आणि त्यांच्या नातवंडांच्या या वाद्यवृंदाने पुढे त्या संस्थानात येणाऱ्या अनेक देशी-परदेशी पाहुण्यांना आपल्या वादनाने चकित केले. बाबांनी या वाद्यवृंदासाठी किमान तीनशे सोप्या बंदिशी तयार केल्या होत्या. या मुलांच्या पुढच्या पिढ्यांनी आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी त्या आत्मसात केल्या. आपल्या हयातीत बाबाच या वाद्यवृंदाचे संचलन करीत. कितीतरी संगीत महोत्सवांमधून या वाद्यवृंदाला आमंत्रणे आली. २०१७ साली या वाद्यवृंदाने आपली शताब्दी थाटात साजरी केली. आजही हा मैहर बँड कार्यरत आहे.

---

काळोखाने दाही दिशा दाटून फुटणार असे वाटत असताना उद्याचा इतिहास लिहिणाऱ्या, आज आकार घेत असलेल्या वाद्यवृंदाचे नवे जोमदार स्वर कुठून तरी तरंगत कानी येतायत. तुम्ही ऐकताय का ते? या महामारीचा काळा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा बहराचे नवे रंग असलेल्या या स्वरांची नोंद त्यात होईलच...

(लेखिका संगीत आस्वादक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

vratre@gmail.com