शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

‘चांदोबा’ची जादू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 6:01 AM

के. सी. शिवशंकर यांचं सारं आयुष्य  ‘चांदोबा’मधली चित्रं काढण्यात गेलं.  एखाद्या मासिकाचं व एखाद्या चित्रकाराचं  असं अद्वैत घडणं ही खूप मोठी गोष्ट आहे. 

ठळक मुद्देचित्रकार के. सी. शिवशंकर  यांचं नुकतंच वयाच्या सत्त्यावण्णव्या वर्षी  निधन झालं. त्यांच्या ब्रशमधून उमटलेल्या  ‘विक्रम वेताळ’ची छबी अजरामर झालेली आहे.  त्यांच्या चित्रांविषयी व चित्रांसह ‘असण्या’विषयी प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्याशी संवाद

- चंद्रमोहन कुलकर्णी

* के. सी. शिवशंकर आणि ‘चांदोबा’विषयी तुमच्या काय आठवणी आहेत?लहानपणापासून आपण जे बघतो, ते आपल्या बॅकग्राऊंडला सतत राहातं. त्याचे संस्कार होतात हा शब्द मी वापरणार नाही. आपल्यासारख्या मध्यमवर्गी लोकांकडे समज तयार होत जाणार्‍या वयात काय असतं वाचायला? - चित्रात छापलेलं खरं असतं असं वाटण्याच्या वयापासून मी व माझ्यासारखे असंख्य लोक ‘चांदोबा’शी जोडलेले आहेत. लहानपणी बघितलेली ती चित्रं मनात कोरली गेलीहेत. के. सी. शिवशंकर हा वयाच्या शंभरीपर्यंत पोहोचू लागलेला माणूस होता. त्यांचं सारं आयुष्य ‘चांदोबा’मधली चित्रं काढण्यात गेलं. एखाद्या मासिकाचं व एखाद्या चित्रकाराचं असं अद्वैत घडणं ही खूप मोठी गोष्ट आहे. परदेशात असं होत असेल, पण आपल्याकडे एक चित्रकार व एक मासिक यांचं इतकं घट्ट नातं जुळलेलं असावं याचं मला कौतुक वाटतं. ते गेले नि ते नातं संपलं, मात्र त्यांच्या चित्रांनी केलेला दृश्य परिणाम हा वाचकांसोबत राहिला. लॅन्डस्केप, पोट्रेट करणारे चित्रकार आता तुम्हाला दर पावलाला आढळतील; पण इलस्ट्रेशन करणं ही साहित्यामधली एक विशेष गोष्ट आहे. ते एक प्रकारचं साहित्यच मानतो मी. शंकर यांच्या कामाबाबतीत तर नुसते कष्ट महत्त्वाचे नसतात, त्यातून कलाकार मूळ संहितेला प्रवाही करणारी जी मांडणी करतो ती महत्त्वाची ठरते. विशिष्ट आशयासोबत प्रदीर्घ काळ काम करणं या कृतीला नमस्कार करावा इतकं हे विशेष आहे!* त्यांच्या चित्रांचं महत्त्व काय?जवळपास तेरा भारतीय भाषांमध्ये ‘चांदोबा’ प्रकाशित होत होता, चित्रं पोहोचत होती. तो सगळा काळ पाहता शंकर यांच्या चित्रकलेचा ‘प्रभाव’ कुणावर पडलाय असं मला फारसं जाणवलेलं नाही, त्याचं कारण निराळं आहे. ते एका विशिष्ट कंटेन्टबरोबर काम करत होते. तसा आशय इतर मासिकांमध्ये नव्हता. त्यांची चित्रं ही संपूर्ण भारतीय शैलीतली होती. कुठल्याही स्तरातल्या सामान्य माणसाला त्यांची चित्रं पाहून वाटायचं, ‘हे माझ्यासाठी आहे’ किंवा ‘हे मीच काढलंय.’ कलाकार आणि वाचक एकमेकांना आपल्या एरियात घेतात, विश्वास देतात, भाषा आपलीशी करतात हे इथे घडलं आहे. वाचकाला चित्रातून त्याच्या भाषेतली गोष्ट शंकर यांनी सांगितली. परदेशातली चित्रकला किंवा शिल्पकला बघा, त्यांच्या अभ्यासाचा, तपशिलांचा सामान्य माणसाला इतका दरारा वाटतो की तो बिचकतो. कलाकारांपासून थोड्या अंतरावर राहून बघतो. शंकर यांचं यश त्यांची चित्रं ‘माझी’ वाटण्यात आहे. छोट्या गोष्टींसोबत आलेली ती भाबडी चित्रं आहेत. त्यांचे रंग भडक आहेत. दाक्षिणात्य माणसांचा तोंडवळा नि देहयष्टी निवडून त्यांनी विक्रम, वेताळ, संन्यासी, राजे, स्रिया, राजवाडे चितारले. माझ्या दृष्टीनं ते महत्त्वाचे कला निर्देशकही होते. इलस्ट्रेटरला अभिनय, दिग्दर्शन, वेशभूषा, केशभूषा, पात्ररचना सगळं बघावं लागतं. वाचकानं गृहीत धरून उपयोगी नाही, शरण जावं अशी संपूर्ण पात्रं सलगतेचा विचार करून रेखाटावी लागतात. आता शिंगं फुटलेल्या आपल्यासारख्यांना ती चित्रं बटबटित वाटतील; पण झाडाला लटकलेल्या कवट्या, विक्रमचा झगा, पांढरे केस गळ्यात आलेला वेताळ, खांद्यावरचं प्रेत, तलवारीच्या मुठीत गच्च झालेली बोटं, तलवारीचं पातं या सगळ्यांची कल्पना करून त्यांच्या निर्माणाची भूमिका जबाबदारीनं निभवावी लागते. तेव्हा कुठं वाचक चित्रकाराचं बोट धरून गोष्टीत शिरतात. थोडं आकर्षण, थोडी भीती व वाचकाची पकड सुटू नये याकरिता एन्ड पीस म्हणून एखादं छोटं चित्र ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. त्यादृष्टीनं माझ्या मते शंकर यांच्यासारखा चित्रकार मानसशास्रज्ञही असतो.* अशा चित्रांची भूल आता नाही..तुम्ही कुठल्या माध्यमाद्वारे काम करता यानं सगळ्या गोष्टी बदलतात. विचार बदलतो. माध्यमानुसार तंत्र बदलतं नि कलेतून व्यक्त होण्याच्या पद्धती बदलतात. शंकर यांच्या काळात परकीय मासिकांचं चलन फारसं नव्हतं, त्यामुळं धकून निघालं. आज चित्रकारांना आशयानुसार आपलं कॅरॅक्टर डेव्हलप करण्याची संधी संपूर्ण जगामध्येच कमी आहे, भारतात तर जास्तच कमी आहे. आपल्याकडे दृश्य माध्यमांचा अलोट मारा याचं कारण आहे. शंकर क्रोकविलनं चित्रं काढायचे. लोखंड किंवा पितळेचं लांबसडक टोकाचं नीब नि इंडियन ब्लॅक इंक. त्यामुळं त्यांच्या रेषेचा दर्जा खूप वेगळा आहे. त्यातून आडव्या-तिरक्या वेगवान स्ट्रोक्सनी ते काम करायचे. जाणवतो, न जाणवतो अशा हलक्या स्वरांसारखी पातळ रेषा काढायचे. तर तुम्ही कुठल्या तंत्रासोबत काम करता हे महत्त्वाचं ठरतं, व ते काम कुठं दिसणार आहे हेही. चित्र भिंतीवर लागणार की छापलं जाणार यानुसारही पद्धत बदलते. चांदोबा पहिल्यांदा ऑफसेटमध्ये बर्‍यापैकी वितरण होणारा अंक असला तरी त्यावेळी हे तंत्र रूळलं नव्हतं. चित्रकाराला त्यात खूप सांभाळून, विचारपूर्वक काम करत गोष्टीचा स्वाद वाढवण्याची जबाबदारी होती. भारतातला हा मोठा काळ शंकर यांनी जवळजवळ जन्मभर गांभीर्यानं खांद्यावर पेलला. सकाळी साडेआठला कामाला येऊन बसणारा हा सर्मपित माणूस. विशिष्टच गोष्टीसोबत वाचकाला कंटाळा येऊ न देता तेच दृश्य सर्व तर्‍हेनं पाहता येण्याची, चित्रकलेची आयुष्यभर सेवा केलेला हा माणूस होता. असे दिग्गज जातात तेव्हा भीती वाटते.. की आपण आपली रेष हरवू नये, अभ्यास कमी पडू देऊ नये! कुठल्याही स्कूलचा नसणारा हा माणूस स्वत:च स्कूल झाला होता! आयुष्यभर शाईने चित्र काढणार्‍या या मनुष्याला नमस्कार करण्याचा योग ‘इन्कटोबर’सारख्या इन्स्टाग्राम हॅँडलमधून घेता येईल. कृतज्ञतेची ही संधी मुला-मुलींनी सोडायला नको.

मुलाखत  : सोनाली नवांगुळ