शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

चिमणीचं घरटं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 13:36 IST

मुलांनी आपल्या पणजीला  कधीच पाहिलेलं नव्हतं. अचानक ती घरी येणार म्हटल्यावर सगळ्यांचीच धांदल उडाली. ही पणजी खूपच खडूस असणार, असा त्यांचा अंदाज होता. पणजीला स्वच्छतेची आवड होती; पण प्राणी-पक्ष्यांबद्दलही तिला खूपच जिव्हाळा होता. मुलांचं मग तिच्याशी खूपच जमलं!

ठळक मुद्देधड ना लहान, धड ना मोठे अशा ‘मधल्या’ मुलांसाठी नवी ‘विण्डो’

- गौरी पटवर्धन 

तेजलच्या घरी आज सकाळपासून नुसती धावपळ चालू होती. तेजलच्या आईबाबांनी दोन आठवड्यांपासून घर आवरायला काढलं होतं. दिवाळी आल्यासारखं सगळं घर झाडून पुसून घेतलं होतं. सगळे पलंग आणि सोफे पुढे सरकावून त्यांच्या मागून केर काढला होता. घरातली सगळीकडची जाळी-जळमटं काढली होती. डबे घासून पुसून परत सामान भरून ठेवले होते. चादरी आणि पांघरुणं धुऊन ठेवली होती. तेजल आणि तिच्या धाकट्या भावाला त्यांचं कपाट आवरायला लावलं होतं.तेजल सातवीत आणि तिचा भाऊ, अमित चौथीत होता. त्यामुळे त्यांनी आवरलेलं कपाट आईबाबांना पटत नव्हतं. त्यामुळे ते पुन:पुन्हा त्यांना सामान आवरायला लावत होते. आणि आज सकाळपासून तर या सगळ्याचा अतिरेक झाला होता. तेजलची म्हातारी पणजी गावाकडून त्यांच्याकडे राहायला येणार होती आणि आज दुपारी ती येऊन पोहोचणार होती. तिचं वय पुष्कळ होतं आणि ती गेली दहा वर्षे प्रवास करून कुठेच गेली नव्हती. पण, आता अचानक तिच्या मनाने असं घेतलं होतं की आपले हातपाय चालताहेत तोवर सगळ्या नातवंडांना आणि पंतवंडांना एकदा भेटून यावं. या प्रवासात ती तिच्या एका चुलत काकांकडे गेली होती आणि ते तिला घेऊन सकाळी निघाले होते. ते आता केव्हाही पोहोचतीलच अशी परिस्थिती होती. आईबाबा अस्वस्थ होऊन येरझार्‍या घालत होते. अमितला ती पणजी आठवतच नव्हती. तेजलला इतकंच आठवत होतं, की ती लहान असताना आईबाबांबरोबर गावी गेलेली असताना ही पणजी तिला भेटली होती. पण त्यापलीकडे तिलाही काही आठवत नव्हतं.पण या न बघितलेल्या, न आठवणार्‍या पणजीचा त्यांना भेटायच्या आधीच सॉलिड राग आलेला होता. ती दोन दिवस राहायला येणार तर आपण आपलं कपाट चारवेळा का आवरायचं, हे त्यांना पटण्याच्या पलीकडे होतं. ही पणजी खडूस असणार असा अंदाज त्यांनी मनाशी बांधला होता.त्यांच्या आईबाबांनी त्यांना असं सांगितलं होतं की, पणजी स्वभावाने फार छान आहे. पण, तिचं पुन्हा आपल्या घरी येणं होणार नाही; तर आपण आपल्या बाजूने तिचं इथलं राहाणं छान होईल यासाठी प्रयत्न करूया. ही सगळी आवराआवर एवढय़ासाठी करायची की आपल्यामुळे तिला नकळतसुद्धा काही त्नास व्हायला नको.पण तेजलचा त्यांच्या या सांगण्यावर अजिबात विश्वास नव्हता. आईबाबा कधीच कुठल्या मोठय़ा माणसांबद्दल वाईट बोलत नाहीत हे तिला माहिती होतं. आणि त्यामुळेच त्यांनी आपल्याला काहीही सांगितलं तरी ही पणजी खडूस असणार यात तिला काही शंका नव्हती. शिवाय ती इतकी म्हातारी असेल तर दिसायला पण गोष्टीतल्या चेटकिणीसारखी असेल असं अमितला वाटत होतं. चांगली गोष्ट एवढीच होती की ती फक्त दोन दिवस राहणार होती आणि मग गावातच राहणार्‍या आत्याच्या घरी जाणार होती.ती येण्याच्या दिवशी आईबाबांनी तेजलला सांगितलं होतं, की सकाळी एकदा हॉल परत आवरून ठेव. कारण आई स्वयंपाकाच्या कामात होती. तिला आज दुपारी ते चौघं, पणजी आणि तिला सोडायला येणारे तीन-चार जण इतक्या सगळ्यांचा स्वयंपाक करायचा होता. बाबा आईला मदत करत होते आणि काही ऐनवेळी आठवलेल्या वस्तू बाहेरून आणून देत होते. तेजलने मनाशी चडफडत अमितला हाताशी घेऊन परत एकदा हॉल आवरला होता. मग त्या दोघांनी अंघोळ केली होती. घाईघाईने नास्ता केला होता आणि दोघंही छान छान कपडे घालून, केस विंचरून, कुठलेही उपद्व्याप न करता, शहाण्या मुलांसारखे गुपचूप हॉलमधल्या सोफ्यावर हळू आवाजात टीव्ही लावून बसून राहिले होते. दुपारचा दीड वाजला आणि शेवटी एकदाची घराची बेल वाजली. तेजलने पटकन टीव्ही बंद केला आणि दोघं उठून उभे राहिले. बाबांनी दार उघडलं. काकांच्या हाताला धरून कमरेत वाकलेली, सगळे केस पांढरे झालेली, सुरकुतलेल्या चेहर्‍याची, थरथरत्या हातांची, बारीक चणीची पणजी घरात आली. तिने उंबर्‍यातून आत येऊन सगळीकडे नजर फिरवली आणि ती काहीतरी बोलणार एवढय़ात तिच्या डोक्यात टपकन एक काडी पडली. ही काडी कुठून आली असा विचार करेपर्यंत जळमटं लागलेला एक छोटासा कापसाचा बोळा तिच्या डोक्यात पडला.आता मात्न आईने रागाने तेजलकडे बघितलं. तिला हॉल आवरायला सांगूनपण तिने तो आवरला नाही असं आईला वाटलं. तेजल पटकन म्हणाली, ‘अगं, पण मी खरंच आवरला होता हॉल.’ तिला वाटलं की आता आपल्याला चांगलीच बोलणी खायला लागणार आहेत. तेवढय़ात पणजी म्हणाली,‘हो तर! हॉल छान, स्वच्छ आवरलेलाच दिसतोय.’ आणि बोलत बोलत ती सोफ्यावर येऊन बसली. तेजलचे बाबा म्हणाले, ‘तेजल फार मनापासून काम करते. त्या काड्या तिच्या लक्षात आल्या नसतील. नाही तर तिने त्या नक्की काढल्या असत्या.’‘नको गं बाई..’ पणजी म्हणाली, ‘त्या काड्या आणि कापूस काढला नाहीस ते चांगलंच केलंस. तो कचरा पुण्याचा असतो बाई. तो कधी काढू नये.’‘म्हणजे?’ ही पणजी आपल्याला रागवली नाही त्या अर्थी खडूस नसावी, असा अंदाज बांधत तेजलने विचारलं.‘अगं हा कचरा कोणी केलाय?’‘मला नाही माहिती. मी नाही केलेला.’ अमित पटकन म्हणाला.‘ते झालंच रे सोन्या.’ पणजी त्याच्याकडे बघून गोड बोळकं हसत म्हणाली, ‘तू कशाला करशील असा कचरा? तो कचरा केलाय त्या चिमण्यांनी.’ असं म्हणून आजीने दाराच्या वर लटकवलेल्या फ्रेमकडे बोट दाखवलं. आणि खरंच, सगळ्यांच्या समोरच एक चिमणी अजून एक काडी घेऊन भुर्रकन त्या फ्रेमच्या मागे गेली. ते बघून पणजी म्हणाली,‘बाई, चिमण्या कोणत्याही घरात घरटं बांधत नाहीत. जे घर नांदतं असतं तिथेच चिमण्या घरटं बांधतात, कारण त्या मुक्या जिवाला एवढं समजत की लेकुरवाळं घर त्यांचं घरटं पाडणार नाही. तुम्ही चांगली मुलं आहात म्हणून चिमण्यांनी तुमच्या घरात घरटं करायला घेतलंय. आता त्यांची पिल्लं मोठी होऊन उडून जाईपर्यंत उरलेलं घर पाहिजे तेवढं आवरा; पण तेवढा एक कोपरा त्यांना कचरा करायला असू द्या. कोणीतरी मुका जीव आपल्या घरात लेकराबाळांना घेऊन राहण्याएवढा विश्वास टाकतं, तो विश्वास मोडू नका. त्यांनी केलेला कचरा पुण्याचा असतो.’आता मात्न तेजलला वाटायला लागलं होतं, की या पणजीने कायम आपल्याच घरी राहावं.lpf.internal@gmail.com(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)