शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

फाळणीनंतरचे सर्वात मोठे व नियोजनबद्ध स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 19:22 IST

परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात व स्वगृही सुरक्षितपणे पोहोचवून देण्याच्या कामात सध्या प्रशासन व्यस्त आहे.

भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी, आपली जन्मभूमी व घरे दारे सोडून शेकडो मैलांवर मोठ्या आशेने मजुरीच्या शोधात महाराष्ट्रात आलेल्या युपी, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड व या सारख्या इतर राज्यातील परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात व स्वगृही सुरक्षितपणे पोहोचवून देण्याच्या कामात सध्या प्रशासन व्यस्त आहे.आजपर्यंत अकोट तालुक्यातील जवळपास ७५० मजुरांचे स्थलांतर अकोट तालुक्यातून करण्यात आले असून, अजूनही हे काम सुरूच आहे. प्रशासनामार्फत त्यांना त्यांच्या मूळ गावी रेल्वे बसेस इत्यादींची व्यवस्था करून सुरक्षितपणे पोहोचून देण्यात येत आहे. याबाबत विचार करता अकोला जिल्ह्यात हा आकडा काही हजारांच्या घरात तर संपूर्ण राज्यात लाखांच्या घरात आहे. राज्याच्या विविध भागात उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड व इतर राज्यातून परप्रांतीय मजूर रोजीरोटीच्या शोधात महाराष्ट्रात आले. पाणीपुरी, भेळ, चणे, फुटाणे विकणे, गवंडी कामे, वीटभट्ट्यांवर मजुरी यासोबतच शेतातील शेतमजुरीची कामे इत्यादी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे या मजुरांना राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत होता. वितभर पोटाची टीचभर खळगी भरण्यासाठी पडेल ते काम व मेहनत करण्याची तयारी ठेवून धडपड करणाऱ्या या परप्रांतीय मजुरांना इथल्या मातीने सहजतेने सामावून घेतले. महाराष्ट्राच्या मायाळू संस्कृतीने ह्या मजुरांना रोजगारासोबतच आसरा दिला. जगण्याची नवी उमेद दिली. आपल्या रोजी रोटीमध्ये हे परप्रांतीय मजूर वाटेकरी होत असल्याची जाणीव असून, देखील इथल्या लोकांनी त्यांच्यासोबत कधीच दुजाभाव केला नाही. त्यामुळे गेली अनेक वर्षे हे परप्रांतीय इथल्या मातीचा भाग बनून राहिले व इथल्या जन जीवनाचा एक भाग बनले. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत या मजुरांची रोजी-रोटी गेली. उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाल्यामुळे दोन वेळ पोटाची खळगी भरण्यासाठी अपरिमित संघर्ष वाट्याला आला. या परिस्थितीत महाराष्ट्रातल्या जनतेने व प्रशासनाने या मजुरांच्या साहाय्याला धावून जात ह्या मजुरांची गेली अनेक दिवस रोजीरोटीची व्यवस्था केली; परंतु हा संघर्ष लवकर संपणारा नाही, याची जाणीव झाल्यामुळे या परप्रांतीय मजुरांनी महाराष्ट्रातून आपल्या स्वगृही जाणे पसंत केले. सुरुवातीच्या काळात राज्यातून इतर राज्यात जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे मिळेल त्या वाहनाने आणि अमाप पैसे खर्च करून जीवाची जोखीम पत्करून ह्या मजुरांनी स्थलांतर सुरू केले; परंतु प्रशासनाने याला पायबंद घालणे सुरू केल्यानंतर हजारो परप्रांतीयांनी आपल्या मुला-बाळांसह शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत स्वगृही जाण्यासाठी स्थलांतर सुरू केले. १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले भारत आणि पाकिस्तान ही दोन राष्ट्रे निर्माण झाली. त्यावेळी दोन्ही देशातून मोठ्या प्रमाणावर लोकांनी स्थलांतर केले होते. ‘त्या’ कटू आठवणीनंतर आज उद्भवलेल्या परिस्थितीत परप्रांतीयांचे स्वगृही जाण्यासाठी होत असलेले हे स्थलांतर स्वातंत्र्यानंतरचे सर्वात मोठी स्थलांतर आहे. फरक एवढाच की त्यावेळी झालेले स्थलांतर हे त्यावेळेस उद्भवलेल्या अराजकाचा एक भाग होते; परंतु आज परप्रांतीयांचे होत असलेले स्थलांतर अतिशय नियोजनबद्ध व सुव्यवस्थितपणे मानवीय दृष्टिकोनातून प्रशासनाकडून घडवुन आणल्या जात आहे. परप्रांतीय मजुरांना स्वगृही पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे सर्व प्रकारची व्यवस्था चोखपणे करण्यात येत आहे. यामध्ये मजुरांची तपासणी करून त्यांना रेल्वे स्टेशन बसस्थानकावर निर्धारित वाहनापर्यंत सुरक्षितपणे पोहोचून देणे, त्यांच्या प्रवास खर्चाची व्यवस्था करणे, दोन्ही वेळच्या जेवणाची, पाण्याची, लहान मुलांसाठी बिस्किटे दुधाची व्यवस्था, आजार व्यक्तीच्या औषधोपचाराची व्यवस्था करणे इत्यादी जबाबदारी प्रशासन मानवी दृष्टिकोनातून चोखपणे पार पडत आहे. यामध्ये प्रशासनाच्या आरोग्य विभाग पोलीस विभाग महसूल विभाग व इतर सर्व यंत्रणा अगदी जबाबदारीने मन लावून काम करत आहेत. प्रशासनाचा हा मानवी व चेहरा निश्चितपणे वंदनीय आहे प्रशासनाच्या माध्यमातून मजुरांना परप्रांतीयांना स्वगृही पोहोचून देण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांची दखल इतिहास निश्चितपणे घेईल व स्वातंत्र्यानंतरचे हे दुसरे मोठे व नियोजनबद्ध स्थलांतर म्हणून इतिहासात याची नोंद होईल. या बाबत होत असलेल्या मानवी प्रयत्नांना सलाम!

-राजेश नरेश बोडखे,अकोट

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLabourकामगार