शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
2
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
3
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
4
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
5
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
6
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
7
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
8
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
9
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
10
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
11
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
12
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
13
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
14
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
15
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
16
"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
17
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
19
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
20
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय

भंडारा जिल्ह्यात खिळेमुक्त वृक्ष मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 06:00 IST

भंडारा शहरातील संवेदनशील तरुणांनी खिळेमुक्त वृक्ष अभियान हाती घेतले आहे. शेकडो वृक्षांवर ठोकलेले खिळे काढण्याचा उपक्रम सुरु आहे.

ज्ञानेश्वर मुंदेप्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक डॉ. जगदिशचंद्र बोस यांनी वृक्षांना संवेदना असतात, हे सिद्ध केले. वृक्ष सजीव तर असतातच पण महत्वाचे म्हणजे वृक्ष प्राणवायू देतात. पर्यावरण संतुलनात वृक्षांचा वाटा मोठा आहे. जाहिरातबाजीचे साधन म्हणून वृक्षांची होणारी दुरवस्था वेळीच रोखली नाही तर पर्यावरणाचे संतुलन ढासाळायला वेळ लागणार नाही.संवेदनशील मनाला जसे शब्द बोचतात तसेच वृक्षाला खिळे. जाहिरातबाजीच्या नादात वृक्षांवर खिळे ठोकले जातात. खिळे वृक्षवाढीसाठी बाधा पोहचवितात. हा प्रकार टाळण्यासाठी भंडारा शहरातील संवेदनशील तरुणांनी खिळेमुक्त वृक्ष अभियान हाती घेतले आहे. शेकडो वृक्षांवर ठोकलेले खिळे काढण्याचा उपक्रम सुरु आहे. बॅनर, पोस्टर्स लावताना हमखास खिळ्यांचा उपयोग केला जातो. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आपले पोस्टर, बॅनर्स ठिकठिकाणी खिळ्याने ठोकतो. हा प्रकार टाळण्यासाठी भंडारा येथील खुशी बहुउद्देशिय संस्था, युवा जनकल्याण आणि पुणे येथील आंघोळीची गोळी या संस्थेने वृक्ष संवर्धन उपक्रम हाती घेतला आहे. भंडारा शहरात सात महिन्यांपूर्वी भंडारा येथील पर्यावरणप्रेमी राजेश राऊत यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम सुरु झाली. एक हातोडी आणि जंबोरा घेऊन ते आपल्या सहकाऱ्यांसह शहरातील झाडांवर ठोकलेले खिळे काढतात. शहरातीलच नव्हे तर राज्य मार्गावरील आणि राष्ट्रीय महामार्गावरील अनेक झाडे खिळेमुक्त आणि वेदनामुक्त झाली आहेत. पाहायला गेले तर झाडाचे खिळे काढणे खुप छोटे काम. परंतु यासाठीही कुणी पुढाकार घेत नाही. शहरातील नागरिकांनी आपला केवळ अर्धा तास दिला तरी शेकडो झाडे खिळेमुक्त होऊन बहरतील.राज्यात २२ जिल्ह्यात खिळेमुक्त वृक्ष अभियान स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राबविली जात आहे. यात भंडारा अग्रेसर आहे. शहरातील सुमारे २०० पर्यावरणप्रेमी या मोहीमेत सहभागी झाले आहे. त्यात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंतचा समावेश आहे. शेकडो वृक्षांना ठोकलेले खिळे काढून पर्यावरणाचे जतन केले जात आहे. आपण एखाद्या वृक्षाला खिळा ठोकतो तेव्हा ‘ऊती’च्या कार्यात अडथळा निर्माण होतो. अनेकदा ऊतीचे विघटन होते. सुमारे दहा खिळे एका वृक्षाला ठोकल्यास वृक्ष मारण्यास पुरेसे स्ट्रक्चरल आणि आरोग्य विषयक समस्या निर्माण होऊ शकतात. खिळ्यामुळे पडलेले छिद्र म्हणजे वृक्षाची एकप्रकारे जखमच असते. यातून वृक्षांचे आयुष्य घटते.

टॅग्स :wildlifeवन्यजीव