शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात खिळेमुक्त वृक्ष मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 06:00 IST

भंडारा शहरातील संवेदनशील तरुणांनी खिळेमुक्त वृक्ष अभियान हाती घेतले आहे. शेकडो वृक्षांवर ठोकलेले खिळे काढण्याचा उपक्रम सुरु आहे.

ज्ञानेश्वर मुंदेप्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक डॉ. जगदिशचंद्र बोस यांनी वृक्षांना संवेदना असतात, हे सिद्ध केले. वृक्ष सजीव तर असतातच पण महत्वाचे म्हणजे वृक्ष प्राणवायू देतात. पर्यावरण संतुलनात वृक्षांचा वाटा मोठा आहे. जाहिरातबाजीचे साधन म्हणून वृक्षांची होणारी दुरवस्था वेळीच रोखली नाही तर पर्यावरणाचे संतुलन ढासाळायला वेळ लागणार नाही.संवेदनशील मनाला जसे शब्द बोचतात तसेच वृक्षाला खिळे. जाहिरातबाजीच्या नादात वृक्षांवर खिळे ठोकले जातात. खिळे वृक्षवाढीसाठी बाधा पोहचवितात. हा प्रकार टाळण्यासाठी भंडारा शहरातील संवेदनशील तरुणांनी खिळेमुक्त वृक्ष अभियान हाती घेतले आहे. शेकडो वृक्षांवर ठोकलेले खिळे काढण्याचा उपक्रम सुरु आहे. बॅनर, पोस्टर्स लावताना हमखास खिळ्यांचा उपयोग केला जातो. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आपले पोस्टर, बॅनर्स ठिकठिकाणी खिळ्याने ठोकतो. हा प्रकार टाळण्यासाठी भंडारा येथील खुशी बहुउद्देशिय संस्था, युवा जनकल्याण आणि पुणे येथील आंघोळीची गोळी या संस्थेने वृक्ष संवर्धन उपक्रम हाती घेतला आहे. भंडारा शहरात सात महिन्यांपूर्वी भंडारा येथील पर्यावरणप्रेमी राजेश राऊत यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम सुरु झाली. एक हातोडी आणि जंबोरा घेऊन ते आपल्या सहकाऱ्यांसह शहरातील झाडांवर ठोकलेले खिळे काढतात. शहरातीलच नव्हे तर राज्य मार्गावरील आणि राष्ट्रीय महामार्गावरील अनेक झाडे खिळेमुक्त आणि वेदनामुक्त झाली आहेत. पाहायला गेले तर झाडाचे खिळे काढणे खुप छोटे काम. परंतु यासाठीही कुणी पुढाकार घेत नाही. शहरातील नागरिकांनी आपला केवळ अर्धा तास दिला तरी शेकडो झाडे खिळेमुक्त होऊन बहरतील.राज्यात २२ जिल्ह्यात खिळेमुक्त वृक्ष अभियान स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राबविली जात आहे. यात भंडारा अग्रेसर आहे. शहरातील सुमारे २०० पर्यावरणप्रेमी या मोहीमेत सहभागी झाले आहे. त्यात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंतचा समावेश आहे. शेकडो वृक्षांना ठोकलेले खिळे काढून पर्यावरणाचे जतन केले जात आहे. आपण एखाद्या वृक्षाला खिळा ठोकतो तेव्हा ‘ऊती’च्या कार्यात अडथळा निर्माण होतो. अनेकदा ऊतीचे विघटन होते. सुमारे दहा खिळे एका वृक्षाला ठोकल्यास वृक्ष मारण्यास पुरेसे स्ट्रक्चरल आणि आरोग्य विषयक समस्या निर्माण होऊ शकतात. खिळ्यामुळे पडलेले छिद्र म्हणजे वृक्षाची एकप्रकारे जखमच असते. यातून वृक्षांचे आयुष्य घटते.

टॅग्स :wildlifeवन्यजीव