शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खुदा, पायल आणि डिस्को.

By admin | Updated: June 13, 2015 13:41 IST

आधुनिक प्रणयी प्रेम हे हिंदी चित्रपटांचे मध्यवर्ती कथासूत्र. त्यामुळे स्त्रीला आधुनिक, धीट किंवा बंडखोर दाखवणोही गरजेचेच. त्यातूनच हिंदी चित्रपटातील स्त्री प्रतिमांची ढोबळ सूत्रे प्रस्थापित होत गेली.

- विश्राम ढोले
आधुनिकतेची ओढ आणि परंपरेचा ताण यांच्यात अडकलेल्या हिंदी चित्रपटांची एक खूप मोठी गोची स्त्रीविषयक प्रश्नात झाली आहे. ती अर्थात एकूणच भारतीय मानसिकतेचीच गोची आहे. हिंदी चित्रपटांमध्ये ती पॉप्युलर पातळीवर आणि स्पष्टपणो दिसते, इतकेच. ते साहजिकही आहे. कारण पारंपरिक बंधनांच्या पलीकडे जाऊ पाहणारे आणि वैयक्तिक निवडीतून केलेले आधुनिक प्रणयी प्रेम हे हिंदी चित्रपटांचे मध्यवर्ती कथासूत्र. त्यामुळे असे प्रेम करण्याइतपत स्त्रीला आधुनिक, धीट किंवा बंडखोर दाखविणो त्यासाठी गरजेचेच. पण तसे करताना, परंपरा आणि पुरु षी वर्चस्वाची खूप सारी मूल्ये बाळगणा:या कुटुंबव्यवस्थेची चौकट मोडणार नाही याची काळजी घेण्याचा ताणही होता. या सगळ्या ओढाताणीतून हिंदी चित्रपटातील स्त्री प्रतिमांची काही ढोबळ सूत्रे प्रस्थापित होत गेली. आणि अर्थातच पुरुष प्रतिमांचीही. ‘प्रणयी प्रेम (किंवा प्रसंगी लैंगिकताही) हे स्त्रीसाठी तर शहर हे पुरुषांसाठी आधुनिकतेचे  अवकाश आहे’, हे त्यातील एक प्रमुख सूत्र. त्यामुळे, आपली आधुनिकता सिद्ध करण्यासाठी शहरामध्ये कर्तृत्व दाखवणो ही हिंदी चित्रपटातल्या नायकाची तर धीटपणो किंवा बंडखोरीने प्रेम व्यक्त करणो किंवा प्रेमाच्या भावनेमध्ये आपले आधुनिक स्वत्त्व शोधणो ही नायिकेची अनेक वर्षे एक प्रमुख गरज बनून गेली होती. या सूत्रमधून आणि गरजेतून जशा अनेक कथा फुलत गेल्या. आणि अर्थातच सूत्रबद्ध गाणीही. 
‘मुगल-ए-आझम’ मधील (1960) ‘प्यार किया तो डरना क्या’ हे या निर्भीड गाण्यातील मेरुमणी. ‘मुगल-ए-आझम’चा सारा संदर्भ अस्सल राजघराण्याचा, ऐतिहासिक आणि पारंपरिक. त्यामुळे तिथे प्रेमाच्या भावनेतून उघडणारा संघर्षही तितकाच प्रखर. म्हणूनच आधुनिक रोमॅण्टिक प्रेमाची महती गाण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीने असा प्रखर संघर्ष लाभलेल्या इतिहास, प्राचीन साहित्य आणि लोककथांमधील अनेक कथांवर चित्रपट बनविले. सलीम अनारकलीची प्रेमकथा त्यातीलच एक लोकप्रिय कथा. अनारकली आणि मुगल-ए-आझम हे त्यावर आधारित दोन मुख्य चित्रपट. दोन्ही चित्रपट खूप गाजले आणि त्यातील गाणीही. पण ‘प्यार किया तो डरना क्या’ हे विशेष लक्षणीय ठरते. कारण त्यात प्रेमासाठी स्त्रीने लौकिक जगातील सर्वोच्च सत्तेला अगदी खुलेआम आव्हान दिले आहे. आणि तेही प्रियकर मूग गिळून गप्प बसला असताना. नौशादचं संगीत, लताचा सूर, मधुबालाचं सौंदर्य आणि ऐश्वर्यसंपन्न आरसेमहालाचा सेट असा एकेक अतिशय सुंदर असा ऐवज असला तरी त्यावरही कडी करून लक्षात राहतो तो शकील बदायुनीच्या ओळींमधला संदेश- प्यार किया तो डरना क्या. भर राजसभेमध्ये प्रत्यक्ष शहेनशहा अकबराला हे आव्हान देणारी अनारकली कुणी राजघराण्यातील स्त्री नाही. परंपरेचा उपहास किंवा उपेक्षा सहन करणारी ती नर्तकी आहे. त्यामुळे या गाण्याला प्रेमासाठीच्या संघर्षासोबतच एका वर्गसंघर्षाचेही अस्तर लाभते. परंपरेने निर्माण केलेले स्त्री-पुरु ष, राजा-रंक वगैरे सत्तेचे भेद प्रेमापुढे निर्थक आहे, असे सांगताना ती दाखला देते परंपरेला आदरणीय असणा:या ईश्वरी सत्तेचा. 
‘परदा नही जब कोई खुदासे’ असा पारलौकिकातील समतेचा आधार घेत ती ‘बंदो से परदा करना क्या’ असा लौकिकातल्या समतेचा उद्घोष करते. आधुनिक प्रेरणा आणि पारंपरिक आधाराची अशी सरमिसळ भारतीय मनच करू जाणो. ‘मुगल-ए-आझम’नंतर पाचेक वर्षातच आलेल्या गाइडमधील ‘काँटो से खिच के ये आँचल’ हे याच सूत्रसाखळीतील पुढचे गाणो. अर्थात हे रूढार्थाने आणि थेटपणो प्रेमगीत नाही. ते खरे तर आपली नवी ओळख शोधू पाहणा:या स्त्रीचे आनंदगीत आहे.  चित्रपटात ते येते रोझीवर (वहिदा रेहमान). रोझीचा नवरा मार्को हा आपल्याच विश्वात रमलेला, पेशाने आधुनिक शास्त्रज्ञ पण मनाने टिपिकल पारंपरिक असलेला पुरुष आहे. त्याच्याशी संसार करण्यासाठी रोझीने तिच्या अत्यंत आवडीच्या नृत्यकलेचाही त्याग केला आहे. घुंगरू बांधून ठेवले आहेत. पण इतके करूनही तिच्या वाटय़ाला नव:याकडून फक्त उपेक्षा, अवहेलनाच आणि फसवणूकच येते. त्यामुळे आत्महत्त्येचा प्रयत्न करण्याइतपत रोझी खचते. या परिस्थितीतून तिला बाहेर काढतो तो तरुण राजू गाइड (देवानंद). सगळ्यांचा विरोध पत्करून तो तिला साथ देतो. त्याच्या संगतीत रोझीला ख:या प्रेमाचीही चाहुल लागते आणि आपल्या गमावलेल्या स्वत्त्वाचीही. नृत्यकला हे आपले स्वत्त्व आहे आणि नव्याने गवसलेले प्रेम हा त्याचा आधार आहे अशा एका प्रत्ययाच्या क्षणी हे गाणो येते. जगण्याची रसरसती इच्छा पुन्हा निर्माण व्हावी आणि अशा स्वयंसिद्ध जगण्यासाठी मरण्याइतपत बेभान व्हावे अशी रोझीची भावावस्था आहे. इथे प्रेमासाठी कोणाला आव्हान देणो वगैरे नाही. पण स्वत्त्वाची ही शोधयात्र प्रेमाच्या मार्गानेच जाते हे सूत्र मात्र संपूर्ण गाण्यातून सुप्तपणो वाहत रहाते. ‘तोड के बंधन बांधी पायल’ किंवा ‘दिल की उडान’ या दोन्ही अवस्थांचा किनारा प्रेमाचा आहे हे जाणवत राहते. निर्भय वाटणो, मुक्त वाटणो, स्वत:चा शोध लागणो, आत्मसन्मान जागा होणो अशा अनेक सकारात्मक अवस्था परंपरेमध्ये स्त्रीच्या वाटय़ाला कमीच येतात. त्या सा:या अवस्था प्रेमाच्या अनुभवातून येऊ शकतात असा युक्तिवाद करीत चित्रपटांनी आणि गाण्यांनी एकाचवेळी प्रेमाची महती गायली आहे आणि स्त्रियांच्या आधुनिक होण्याचा स्वीकारार्ह मार्गही सुचवला आहे. असाच आशय असलेली ‘तुम अपना रंज ओ गम अपनी परेशानिया मुङो दे दो’ (शगून- 1964) ते ‘आजकल पाँव जमींपर नही पडते मेरे’ (घर-1978) अशी बरीच गाणी सांगता येतील. 
‘छोडछाड’मधली अनारकली मूळ अनारकलीच्या कथेतल्या अन्यायाविरुद्ध आव्हान उठवते आणि प्रसंगी ज्याच्यावर जीव टाकला त्या ‘सलीमची गली’ सोडण्याचीही तयारी दर्शविते. एका अर्थाने ही उत्तम आधुनिक अनारकली राजसत्तेलाच नव्हे तर अन्याय करणा:या प्रेमसत्तेलाही आव्हान देते. ‘प्यार किया तो डरना क्या’मध्येही सत्तेला दिलेले आव्हान ‘परदा नही जब कोई खुदासे. बंदो से परदा करना क्या’ अशा दैवी प्रांतातली समानतेवर आधारलेले आहे. ‘छोड छाड के’मधील नव्या अनारकलीला आधार आहे तो डिस्कोचा, उपभोगाचा. तिला माहीत आहे की तिच्याजवळ मादक सौंदर्याची सत्ता आहे. आणि ही सत्ता सहज चालू शकेल अशा डिस्कोथेकसारख्या जागाही तिला माहितेय. प्रेमापेक्षा तिला आजादी प्यारी आहे. 
प्रेमासाठी लढण्याबिढण्यापेक्षा डिस्कोत जाऊन ‘टॉप बीट’ वर ‘हिप हॉप’ करण्यात आणि ‘ट्रान्स म्युङिाक’ अनुभवण्यात तिला जास्त इंटरेस्ट आहे. 
‘मुगल-ए-आझम’मधील अनारकली मृत्यू कवटाळतानादेखील सलीमसाठी ‘खुदा निगेबान हो तुम्हारा’ असेच म्हणते. या पाश्र्वभूमीवर पाहिले तर सलीमची गली सहज सोडून डिस्कोमध्ये डान्स करू शकणारी ही नवी अनारकली जुन्या अनारकलीचा ‘फूल टू’ उत्तर आधुनिक ‘अॅण्टीक्लायमॅक्स’ आहे. पण त्यात एक मेख आहे.
 ‘छोडछाड के अपने’मधील अनारकली मध्यमवर्गी-उच्च मध्यमवर्गीय शहरी संस्कृतीतील ‘भद्र’ स्त्री नाही. रंगरूप, तोकडे कपडे आणि डिस्कोथेकमध्ये नाचणो यामधून तिचे ‘उत्छृंखलपण’, वेगळेपण ठसवले जाते. तिच्यासाठी वापरलेल्या ममता शर्माच्या आवाजाची जातकुळी वेगळी आहे. तो लता मंगेशकरी नाही की अगदी आशा भोसले वळणाचाही नाही. तो ‘चोली के पिछे’वाल्या इला अरुणी आवाजाशी नाते सांगणारा आवाज आहे. असा वेगळा ‘रॉ’नेस असलेला आवाज हिंदी चित्रपटसृष्टी बहुतेकवेळा ग्रामीण, भटक्या, लैंगिकदृष्टय़ा धीट किंवा उत्छृंखल स्त्रीपात्रंसाठी वापरते. त्यामुळे असा आवाज वापरून हे गाणो नव्या अनारकलीचे सामाजिक वेगळेपण आणि मध्यमवर्गीय शहरी प्रेक्षकांसाठीचे तिचे परकेपण अधोरेखित करते. 
खुदाचा आधार घेऊन प्रेमाची निर्भयपणो महती गाणारी नर्तकी अनारकली, प्रेमाचा आधार घेऊन पुन्हा पायल बांधू पाहणारी नर्तकी रोझी आणि डिस्कोतील उपभोगाचा आधार घेत प्रसंगी प्रेमाबिमाला नाकारू शकणारी डान्सर-आयटम अनारकली असा हा गाण्यातील प्रवास मोठा विलक्षण आहे. स्त्री आणि प्रेमभावना यांना हिंदी गाण्यांनी दिलेला प्रतिसाद कसा गुंतागुंतीचा आणि कालसापेक्ष आहे याचेच ते द्योतक आहे.  
 
अनारकली!
स्त्रियांसाठीचे खुलेपण, आधुनिकता मुख्यत्वे प्रेमाच्या प्रांतापुरतीच मर्यादित आहे. प्रेमभावनेचा आधार नसताना असे खुलेपण, अशी निर्भयता, असा स्व-अभिमान हिंदी चित्रपटातील गाण्यांमध्ये स्त्रियांच्या वाटय़ाला तसा कमीच. मात्र गेल्या काही वर्षात त्याचे प्रमाण थोडे वाढले आहे. ‘जिंदगी अगर कोई मॅच है तो समझो तुम मुङो तेंदुलकर, सामने ना आना ना टकराना कभी तुम भूलकर’ असे म्हणत ‘आय अॅम दी बेस्ट’ (फिर भी दिल है हिंदुस्थानी-2000 असे ठणकावून सांगणारी नायिका आताशा अधिक ठळकपणो दिसू लागली आहे. 
काही गाण्यांमध्ये प्रेमभावनेच्या या कथित, मिथकरूप आधारालाही आव्हान देण्यात आले आहे. ‘हाऊसफुल-2’ (2012)मधील ‘छोडछाड के अपने सलीम की गली. अनारकली डिस्को चली’ हे त्यातील एक फार इंटरेस्टिंग गाणो. हिंदी चित्रपटसृष्टी व्यापून राहिलेल्या अनारकलीच्या मिथकाला या गाण्याने पार उलटेपालटे करून टाकले आहे.
(लेखक माध्यम, तंत्नज्ञान आणि संस्कृती 
या विषयाचे अभ्यासक आहेत.)