शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

नुसते शब्द कसे टिकतील? - ते हरवणारच!

By admin | Updated: June 13, 2015 14:05 IST

हरवत जाणारे शब्द टिकवण्यासाठी ती संस्कृतीही टिकवली पाहिजे, पण ते शक्य आहे का? आपण आज मोटेनं पाणी काढणार आहोत का? जात्यावर दळणार आहोत का? बैलगाडीतून प्रवास करणार आहोत का? याचं व्यावहारिक उत्तर ‘नाही’ असंच येतं. - मग त्यासोबतचे शब्द तरी कसे व्यवहारात टिकतील?

- डॉ. तारा भवाळकर
 
बदलणं हा तर जगण्याचा धर्म. शब्दातल्या, भाषेतल्या बदलांची प्रक्रिया अखंड चालत आलीय. अगदी प्राचीन काळापासून. संतसाहित्यातले अनेक शब्द आता आपल्याला माहीत नाहीत. तेव्हाच्या संस्कृतीतले, जगण्यातले ते शब्द आता भौतिक संस्कृतीच्या बदलामुळं मागं पडलेत. जगणं बदलल्यामुळं त्या जगण्यातले शब्दही बदलले. 
आपलं एकूणच जगणं बदललं. पाश्चिमात्यांचं अनुकरण करणं वाढलं. त्यामुळं भाषेतल्या बदलांचीही देवघेव वाढली. जागतिक संस्कृतीतल्या आदानप्रदानामुळं शब्दही आदानप्रदान होत असतात. मराठीत तर प्रादेशिक बदलानुसार शब्द बदलतात. मराठीत शब्दांच्या अनेक छटा दिसतात. एकाच अर्थाचा शब्द प्रदेशानुसार बदललेला दिसतो. सीमाभागात ही सरमिसळ अधिक जाणवते. जेव्हा सांस्कृतिक आदानप्रदान होतं, तेव्हा भाषेचंही होतंच. लग्नसमारंभातली ‘मेहंदी’ ही संकल्पना आपल्याकडं नव्हतीच. आपल्याकडं होती ती ‘हळद’. मात्र उत्तरेतून ‘मेहंदी’ हा प्रकार आला आणि आपल्यातलाच झाला. सांस्कृतिक बदलामुळं लग्नातल्या मुहूर्तमेढ, रूखवत, मांडव परतवणी, आजेचीर (आजीला देण्यात येणारी साडी-चोळी), पोट झाकणं (वधूच्या आईस्ची साडी-चोळी), धारेचा आहेर (चुलत्याने आणलेल्या कळशीतून वधुवराच्या पायावर पाणी सोडल्यानंतर द्यायचा आहेर) या संकल्पनाही हरवत चालल्या आहेत. हरवत चाललेले शब्द ज्या संस्कृतीतून आले, ती संस्कृतीच नाहीशी होऊ लागल्यानं हे होणं स्वाभाविकच म्हणा!
 केवळ शेतीसंस्कृती आणि गावगाडय़ातलेच नव्हे तर शहरी संस्कृतीतलेही शब्द बदलले. जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रतच बदल झाल्यानं भाषिक बदल होणं, हे ओघानंच आलं! डिपार्टमेंटल स्टोअर्समुळं आठवडी बाजार मागं पडले. परिणामी त्या बाजाराशी संबंधित शब्द हरवले. बैठकीच्या खोलीचा ‘हॉल’ झाला. माहेरवाशिणीचा प्रवास बदलला. ती बैलगाडीएवजी एकटी मोटारीनं जाऊ लागली. मग मुराळी, बुत्ती हे शब्द कसे राहतील? 
अलीकडं हिंदी आणि इंग्रजीचा प्रभाव वाढल्यानं त्या दोन्ही भाषेतल्या शब्दांना आपण जवळ केलं. त्यामुळं व्याकरण आणि वाक्यरचनाही बदलू लागली आहे. या काळात मातृभाषेत भाषांतरित केलेले शब्द वापरण्याचा प्रयत्नही झाला. उदाहरणार्थ : भ्रमणध्वनी (मोबाईल), स्थिरभाष (लॅन्डलाईन), कृष्णधवल (ब्लॅकव्हाईट), धनादेश (चेक), रोखापाल (कॅशिअर).
-  पण रूळत असलेल्या शब्दांपेक्षा मातृभाषेतले, मुद्दाम निर्माण केलेले शब्द अवघड असल्याचं दिसून आलं. या भाषिक गमतीजमती आहेत.
 शब्द नुसते टिकत नाहीत, कारण तो संस्कृतीचा भाग असतो. तिच्यातल्या बदलानुसार ते मागं पडतात. आपल्याला भूतकाळाबद्दल उमाळा असतो. नवं स्वीकारताना जुन्याबद्दल आत्मियता वाटते.. आणि इथंच गोंधळ होतो. विशेषत: मध्यमवर्गीयांमध्ये ही द्विधावस्था जास्त आढळते. भावनिक बांधिलकी आणि उपयुक्ततावाद यात ओढाताण होते. 
हरवत जाणारे शब्द टिकवण्यासाठी ती संस्कृतीही टिकवली पाहिजे, पण ते शक्य आहे का? आपण आज मोटेनं पाणी काढणार आहोत का? जात्यावर दळणार आहोत का? बैलगाडीतून प्रवास करणार आहोत का? पाच-पाच दिवसांचे लग्नसमारंभ साजरे करणार आहोत का? याचं व्यावहारिक उत्तर ‘नाही’ असंच येतं. मग त्यासोबतचे शब्द तरी कसे व्यवहारात टिकतील?
शब्द मुद्दाम जतन होत नसतात. मुळात भाषेचा हा प्रवाह टिकवण्यासाठी तिच्याविषयी आस्था असली पाहिजे. शिक्षणाचं माध्यम मराठीऐवजी इंग्रजी होऊ लागलंय. त्यामुळं शिकण्याच्या परिभाषेवरही परिणाम झालाय. माणसाचं जसं जगणं, तसं त्याचे आविष्कार असतात. त्या आविष्काराचा परिणाम होणारच. 
- जगण्यातली सहजता संपल्यानं सहज आलेले शब्दही संपणारच की!