शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

एखादी आई इतकी भयंकर कसे काय वागू शकते? यामागची कारणं मन हेलावून टाकणारी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 07:55 IST

आई हा ममतेचा हिमालय असे वर्णन केले जाते. मात्र, काही जणी आपल्याच मुलांना ठार मारण्याइतपत क्रूर होतात, की ते पाहून धक्का बसतो.

समीर परांजपे, मुख्य उपसंपादक, मुंबई

आई हा ममतेचा हिमालय असे वर्णन केले जाते. मात्र, काही जणी आपल्याच मुलांना ठार मारण्याइतपत क्रूर होतात, की ते पाहून धक्का बसतो.

आई म्हणजे ममतेचा हिमालय असे वर्णन केले जाते. त्यातील काही जणी आपल्याच मुलांशी इतक्या क्रूरपणे वागतात की ते पाहून धक्का बसतो. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये एका ३० वर्षीय महिलेने पोटच्या सहा लहान मुलांना विहिरीत ढकलून दिले व स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. सर्व मुलांचा जीव गेला. आईचा जीव वाचला. अमेरिकेमध्ये अँड्रीया येट्स या महिलेने आपल्या सहा महिने ते सात वर्षे वयोगटातील पाच मुलांना बाथटबमध्ये बुडवून ठार मारले.

एकीचा नवरा दारुडा, दुसरीचा सद्वर्तनीदोन वेगवेगळ्या देशांतील घटना. महाडच्या घटनेतील महिलेचा नवरा सारखा दारु पिऊन यायचा. तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. नवऱ्याच्या मारहाणीला कंटाळून या महिलेने टोकाचे पाऊल उचलले. अमेरिकेतील अँड्रीय ही नर्स होती. नवरा सद्वर्तनी होता. मात्र आपण मुलांचे उत्तम संगोपन करू शकत नाही असे तिच्या मनात होते. 

दोनपेक्षा अधिक मुले ही समस्याएखादी आई इतकी भयंकर कसे काय वागू शकते या प्रश्नाबाबत अमेरिकेत एक पाहणी करण्यात आली. त्या देशात दर एक लाखांमागे आठ मुलांची हत्या होते. त्यातही आईने मुलांची हत्या करण्याच्या घटनांत सावत्र आईपेक्षा सख्ख्या आईकडून अशी कृत्ये अधिक घडतात असे आढळून आले. जग आधुनिकतेकडे चालले असले तरी कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी लागणारा पैसा कित्येकदा अपुरा पडतो. नवरा-बायको दोघेही कमवत असले तरी गरजा वाढलेल्या असतात. काही वेळेस दोनपेक्षा अधिक मुले जन्माला घातली जातात. त्यांच्या खर्चाचा प्रचंड ताण त्या कुटुंबावर येतो. त्यातच जर नवरा दारुडा असेल, मारहाण करत असेल तर त्याच्या पत्नीने ते सोसायचे तरी किती? कधी कधी एखाद्या महिलेचे विवाहबाह्य संबंध असतात. त्यातूनही असे गुन्हे घडतात.

आपल्यामागे मुलांचे हाल नकोत हा विचारएखादी बाई अगदी श्रीमंत घरातील असेल पण तिचा नवरा तिचा छळत असेल, दुसऱ्या प्रेमप्रकरणात अडकून संसाराचा बट्याबोळ करायला निघाला असेल, सासरची मंडळी खूप त्रास देत असतील तर अशा स्थितीतही एखादी आई क्रूर वागू शकते. गरिबी, श्रीमंती हे विषय अशावेळी दुय्यम ठरतात. मानसशास्त्रज्ञांचे मत असे आहे की, आपण जे हाल भोगतोय ते आपण मेल्यानंतर मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून एखादी महिला आधी आपल्या पोटच्या पोरांना ठार मारते व मग स्वत: आत्महत्या करते.

पुरुषांचे वाईट वर्तनसावत्र आई आपल्या मुलांचा छळ करते असे ढोबळमानाने मानले जाते. या गोष्टीला अनेक जणी अपवाद आहेत. मात्र सावत्र आईने आपल्या मुलांना संपविले अशी उदाहरणे कमी आढळतात हेही तितकेच खरे. नवरा जर दारुडा, व्यसनी, बेजबाबदार, बाहेरख्याली असेल व दोनापेक्षा जास्त मुले जन्माला घातली असतील तर त्या संसाराचा बट्ट्याबोळ ठरलेला असतो. अनेक श्रीमंत घरातले नवरेही नादान असतात. पुरुषाच्या अशा बदवर्तनातून निर्माण झालेल्या वाईट स्थितीचा कडेलोट झाला की, त्याची पत्नी भयंकर हिंसक कृत्य करू शकते असे सिद्ध झाले आहे.

मानसिक आरोग्य जपायला हवेआपल्या मुलांना ठार मारणारी आई ही कायद्याच्या दृष्टीने खूनीच असते. पण समाजामध्ये असे प्रकार घडू नयेत म्हणून नवरा, बायको यांचे समुपदेशन करणे, आईच्या शारिरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय योजना राबविणे अशा उपाययोजना करता येतील. अशा काही योजना युरोप, अमेरिकेमध्ये आहेत. कोणताही माणूस गुन्हा करण्यास एकदम प्रवृत्त होत नाही. त्याच्या भोवतालची परिस्थिती साचून त्यातून मग हे कृत्य घडते. आई क्रूर का होते याचा विचार करताना तिच्या भवतालची परिस्थिती अधिक सुसह्य झाली तर अशा प्रकारचे गुन्हे कमी होतील. महाड व अमेरिकेतील घटनांचा हाच धडा आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी