घर ते पाठीशी हवंच!
By Admin | Updated: April 9, 2016 14:53 IST2016-04-09T14:53:26+5:302016-04-09T14:53:26+5:30
आत्महत्त्या- मग ती एखाद्या फेमस स्टारची असो नाहीतर कुणाला माहिती नसलेल्या कुण्या सामान्य स्त्री-पुरुषाची, ती एक दुर्दैवी घटना असते. आणि ती व्यक्ती त्या निर्णयार्पयत का पोचली असावी या प्रश्नाचं उत्तरही सरळ-साधं नसतं.

घर ते पाठीशी हवंच!
>एकटय़ाचा-एकटीचा टिकाव लागणं मुश्कीलच!
सोनाली कुलकर्णी
आत्महत्त्या- मग ती एखाद्या फेमस स्टारची असो नाहीतर कुणाला माहिती नसलेल्या कुण्या सामान्य स्त्री-पुरुषाची, ती एक दुर्दैवी घटना असते. आणि ती व्यक्ती त्या निर्णयार्पयत का पोचली असावी या प्रश्नाचं उत्तरही सरळ-साधं नसतं. प्रत्युषा माङया क्षेत्रतली होती, तरीही तिने इतकं टोक का गाठलं असावं, याच्या कारणांची छातीठोक खात्री देणं मला चुकीचं आणि असंवेदनशील, असभ्यच वाटतं. त्या एका घटनेने अख्ख्या इंडस्ट्रीवर एका विशिष्ट आरोपाचं सरसकट लेबल लावणं हेही मला मान्य नाही.
ग्लॅमरच्या जगातल्या माणसांना त्यांच्या कामाचा भाग म्हणून बरं-वाईट नाव मिळतं, त्यांच्या चेह:याला ओळख मिळते. त्यांची व्यक्तिगत सुख-दु:खं, यश-अपयश, त्यांची नाती, त्यातले ताण-तणाव या सगळ्या गोष्टी फार चटकन लोकांच्या पुढे येतात आणि लोकांनाही त्यात विशेष रस असतो म्हणून चर्चा होते. अन्यथा ताण आणि कामाचे प्रेशर, स्पर्धा, त्यातून निर्माण होणारी असुरक्षितता सगळीकडेच आहे. प्रत्येक क्षेत्रत आहे. करिअरच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मिळणारं यश-अपयश, त्यातून निर्माण होणारा ताण तुम्ही कसा हाताळता हे तुम्ही किती महत्त्वाकांक्षी आहात, तुमची वाढ कशा वातावरणात झाली आहे या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. तुमची व्यक्ती म्हणून जडणघडण कशी झालेली आहे यावरून तुम्ही मानसिक पातळीवर किती कणखर आहात, हे ठरतं. या क्षेत्रत त्या कणखरपणाची जरा जास्तच गरज असते, हा मुख्य फरक!
तुमच्या वर्तणुकीचा समतोल तुमच्या कुटुंबावरही अवलंबून असतो. तुम्ही कोणाबरोबर राहता, तुमचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, हेही महत्त्वाचं आहे. मुंबईसारख्या शहरात एकटय़ाने राहणा:यांच्या बाबतीत हा प्रश्न फार कठीण ठरू शकतो. ठरतोच.
हे क्षेत्र अनप्रेडिक्टेबल आहे. काहीवेळा अतक्र्य आहे. समतोल राखत प्रवास करायचा असेल तर कुटुंब बरोबर हवं. परस्परांवर विश्वास हवा आणि त्यांचा भक्कम पाठिंबा हवा.