शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

‘अ’ दर्जाकडून ‘ढ’ हाेण्याकडे महाराष्ट्र, कुठं नेऊन ठेवलाय शिक्षणाचा दर्जा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 09:47 IST

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या कामगिरी श्रेणीकरण निर्देशांकामध्ये राज्यातील शैक्षणिक स्थितीचा आरसा दाखविण्यात आला असून, त्यातील आकडेवारी महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे.

डाॅ. उमेश दे. प्रधान 

महाराष्ट्राने असे का घडत आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची वेळ आली आहे. प्रगत राज्याला शैक्षणिकदृष्ट्या असमाधानकारक ‘प्रचेष्टा ३’ परिणामात (३१ ते ४० टक्के गुणांमध्ये) का जाऊन पोहोचावे लागले आहे, याचा परामर्श घेणे आवश्यक आहे. ‘अ’ दर्जाकडून निकृष्टतेकडे जाणे परवडणारे नाही. त्यातील पहिला मुद्दा स्पष्ट आहे, तो म्हणजे अध्यापनाची मूळ समस्या सोडून शिक्षकांना इतर शिक्षण पूरक साहित्यामध्येच जास्त लक्ष घालावे लागणे. त्यामुळे होतेय असे की, वर्गाध्यापनासह आधार कार्ड जोडा, शालाबाह्य विद्यार्थी गोळा करा, मध्यान्ह भोजन व्यवस्था पाहा यासारख्या अनेक गोष्टींची जबाबदारी शिक्षकांच्या खांद्यावर आहे.

दुसरा मुद्दा म्हणजे, कोरोनानंतरच्या काळात दिसून आलेला शिक्षकांना अपेक्षित अशा प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा अभाव. सगळे काही ऑनलाइन आणि डिजिटल करण्याच्या घाईगडबडीत अपेक्षित माहिती आणि ज्ञान पोहोचलेच नाही, असे तर नाही. जे प्रत्यक्ष भेटीतून घडणेसुद्धा दुरापस्त आहे ते ऑनलाइन पद्धतीने कसे साध्य होणार? आजही संगणक हाताळणीच्या बाबतीत, शिक्षकांची तंत्रज्ञान साक्षरता झालेली आहे, असे म्हणणे धाडसाचेच होईल.

शिक्षण व्यवस्थेतील दुरवस्थेवर अंकुश ठेवण्याचे काम ज्या पर्यवेक्षीय कार्यक्रमातून शक्य होते तेच नेमके कमकुवत असल्याचे जाणवते. प्रत्यक्ष वर्गाध्यापनाचे निरीक्षण, विश्लेषण होत नसल्याने प्रत्याभरणाची सोयच राहिली नाही. त्यामुळे शिक्षक वर्गात काय करतो आहे? त्याचा सकारात्मक परिणाम होत आहे का? याचे अवलोकन करणे अवघड झाले आहे. ना याचे शासन स्तरावर नियोजन, ना शालेय. शिक्षण क्षेत्रातील राजकारणाच्या वाढत्या हस्तक्षेपाचा अनुभव तर रोजचाच बनत चालला आहे. 

राजकीय उलथापालथीत राज्यातील शिक्षणाची आबाळ होते आहे. सर्वच बाबतीत शासनाकडून निर्णय येत असल्याने शिक्षकाला केवळ बघ्याची भूमिका घ्यावी लागली तर नवल काय? ऑनलाइन करायच्या कामांची व त्याच्या पूर्ततेची लगबग यात शिक्षक पुरता त्रासून जातो आणि अध्यापन प्रक्रियेपासून दुरावला जातो. सारे लक्ष संगणकात, माहिती भरण्यातच वेळ जातो आणि पूर्वीसारखे कागदी घोडे नाचवण्यातच खरे चित्र बाजूला पडते. विचार करायला हवा या साऱ्याच गोष्टींचा आणि कृतीही. 

महाराष्ट्र कुठे होता, कुठे आला?वर्ष     श्रेणी     गुण२०१८- १९     अ     ८२१-८८०२०१९-२०     अ     ८८१-९४०२०२०-२१     द्वितीय     ७६१-८२०२०२१-२२     प्रचेष्टा-३     ५८१-६४०

‘प्रचेष्टा ३’ श्रेणी म्हणजे काय? ‘प्रचेष्टा ३’ ही श्रेणी मिळणे म्हणजे एक प्रकारची नामुष्की आहे. शिक्षण क्षेत्रातील कामगिरीत आपण कसे नापास झालो, याचा केंद्र सरकारने दिलेला हा पुरावा आहे. ‘प्रचेष्टा ३’ ही श्रेणी एकूण निर्देशांकात नीचांकी स्तरावर असते. गुणांच्याच भाषेत सांगायचे तर महाराष्ट्राची कामगिरी १०० पैकी ३१ ते  ४० गुण मिळावे, अशी आहे. कसे म्हणवून घेणार आपण सुशिक्षित महाराष्ट्र? 

(लेखक इंग्रजी अभ्यास निर्मिती मंडळाचे माजी समन्वयक सदस्य, आहेत) 

टॅग्स :Educationशिक्षणMaharashtraमहाराष्ट्रEducation Sectorशिक्षण क्षेत्र