शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
4
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
5
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
6
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
7
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
8
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
9
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
10
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
11
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
12
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
13
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
14
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
15
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
16
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
17
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
18
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
19
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
20
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

‘अ’ दर्जाकडून ‘ढ’ हाेण्याकडे महाराष्ट्र, कुठं नेऊन ठेवलाय शिक्षणाचा दर्जा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 09:47 IST

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या कामगिरी श्रेणीकरण निर्देशांकामध्ये राज्यातील शैक्षणिक स्थितीचा आरसा दाखविण्यात आला असून, त्यातील आकडेवारी महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे.

डाॅ. उमेश दे. प्रधान 

महाराष्ट्राने असे का घडत आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची वेळ आली आहे. प्रगत राज्याला शैक्षणिकदृष्ट्या असमाधानकारक ‘प्रचेष्टा ३’ परिणामात (३१ ते ४० टक्के गुणांमध्ये) का जाऊन पोहोचावे लागले आहे, याचा परामर्श घेणे आवश्यक आहे. ‘अ’ दर्जाकडून निकृष्टतेकडे जाणे परवडणारे नाही. त्यातील पहिला मुद्दा स्पष्ट आहे, तो म्हणजे अध्यापनाची मूळ समस्या सोडून शिक्षकांना इतर शिक्षण पूरक साहित्यामध्येच जास्त लक्ष घालावे लागणे. त्यामुळे होतेय असे की, वर्गाध्यापनासह आधार कार्ड जोडा, शालाबाह्य विद्यार्थी गोळा करा, मध्यान्ह भोजन व्यवस्था पाहा यासारख्या अनेक गोष्टींची जबाबदारी शिक्षकांच्या खांद्यावर आहे.

दुसरा मुद्दा म्हणजे, कोरोनानंतरच्या काळात दिसून आलेला शिक्षकांना अपेक्षित अशा प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा अभाव. सगळे काही ऑनलाइन आणि डिजिटल करण्याच्या घाईगडबडीत अपेक्षित माहिती आणि ज्ञान पोहोचलेच नाही, असे तर नाही. जे प्रत्यक्ष भेटीतून घडणेसुद्धा दुरापस्त आहे ते ऑनलाइन पद्धतीने कसे साध्य होणार? आजही संगणक हाताळणीच्या बाबतीत, शिक्षकांची तंत्रज्ञान साक्षरता झालेली आहे, असे म्हणणे धाडसाचेच होईल.

शिक्षण व्यवस्थेतील दुरवस्थेवर अंकुश ठेवण्याचे काम ज्या पर्यवेक्षीय कार्यक्रमातून शक्य होते तेच नेमके कमकुवत असल्याचे जाणवते. प्रत्यक्ष वर्गाध्यापनाचे निरीक्षण, विश्लेषण होत नसल्याने प्रत्याभरणाची सोयच राहिली नाही. त्यामुळे शिक्षक वर्गात काय करतो आहे? त्याचा सकारात्मक परिणाम होत आहे का? याचे अवलोकन करणे अवघड झाले आहे. ना याचे शासन स्तरावर नियोजन, ना शालेय. शिक्षण क्षेत्रातील राजकारणाच्या वाढत्या हस्तक्षेपाचा अनुभव तर रोजचाच बनत चालला आहे. 

राजकीय उलथापालथीत राज्यातील शिक्षणाची आबाळ होते आहे. सर्वच बाबतीत शासनाकडून निर्णय येत असल्याने शिक्षकाला केवळ बघ्याची भूमिका घ्यावी लागली तर नवल काय? ऑनलाइन करायच्या कामांची व त्याच्या पूर्ततेची लगबग यात शिक्षक पुरता त्रासून जातो आणि अध्यापन प्रक्रियेपासून दुरावला जातो. सारे लक्ष संगणकात, माहिती भरण्यातच वेळ जातो आणि पूर्वीसारखे कागदी घोडे नाचवण्यातच खरे चित्र बाजूला पडते. विचार करायला हवा या साऱ्याच गोष्टींचा आणि कृतीही. 

महाराष्ट्र कुठे होता, कुठे आला?वर्ष     श्रेणी     गुण२०१८- १९     अ     ८२१-८८०२०१९-२०     अ     ८८१-९४०२०२०-२१     द्वितीय     ७६१-८२०२०२१-२२     प्रचेष्टा-३     ५८१-६४०

‘प्रचेष्टा ३’ श्रेणी म्हणजे काय? ‘प्रचेष्टा ३’ ही श्रेणी मिळणे म्हणजे एक प्रकारची नामुष्की आहे. शिक्षण क्षेत्रातील कामगिरीत आपण कसे नापास झालो, याचा केंद्र सरकारने दिलेला हा पुरावा आहे. ‘प्रचेष्टा ३’ ही श्रेणी एकूण निर्देशांकात नीचांकी स्तरावर असते. गुणांच्याच भाषेत सांगायचे तर महाराष्ट्राची कामगिरी १०० पैकी ३१ ते  ४० गुण मिळावे, अशी आहे. कसे म्हणवून घेणार आपण सुशिक्षित महाराष्ट्र? 

(लेखक इंग्रजी अभ्यास निर्मिती मंडळाचे माजी समन्वयक सदस्य, आहेत) 

टॅग्स :Educationशिक्षणMaharashtraमहाराष्ट्रEducation Sectorशिक्षण क्षेत्र