ताटातूट
By Admin | Updated: May 14, 2016 14:04 IST2016-05-14T14:03:56+5:302016-05-14T14:04:40+5:30
कुटुंबातला कर्ता लेक आपल्या बायको-मुलांसह दुष्काळाच्या धगधगत्या, कोरडय़ा फुफाटय़ातले गाव सोडून मुंबईच्या आस:याला धावलेला. गावात हाताला काम नाही, प्यायला पाणी नाही, काय करावे दुसरे? ..आणि त्याची आई तिकडेच मागे राहिलेली, बाप शेटवाडीच्या तांडय़ावर! सोबतीला दोघे नातू आणि चार जनावरे. कोणी आले, तर चहाला पाणी नाही. सगळे लक्ष आकाशाकडे लागलेले.. की, पाणी येईल, पेरणी होईल, पीक येईल.. ..मग मुले घरी येतील!!

ताटातूट
>
नसलेल्या पाण्याने ओढलेल्या रेघेमागे पांगलेल्या नात्यांची कहाणी
- ओंकार करंबेळकर
डोंगरावर चहुबाजूंनी वरवर सरकत चाललेल्या झोपडय़ा.. यंदाच्या मे महिन्यातील कडक ऊन.. इथल्याच दत्ताजी साळवी मैदानात लातूर-नांदेडातून दुष्काळग्रस्त लोकांचे तांडे.. त्यांना रेशन-पाणी देणा:या गाडय़ा आणि टँकर्सच्या फे:या अशा गोष्टींनी घाटकोपरच्या भटवाडीमधील डोंगर गजबजून गेला आहे. पाण्याच्या टाकीसमोर लागलेल्या कॅन्स आणि डब्यांच्या रांगा आणि सांडलेल्या पाण्याच्या डबक्यात नाचणारी लहान मुले यावर्षीच्या दुष्काळग्रस्त कॅम्पमध्ये तुमचे स्वागत करतात. सोबतीला अचानक पायातून जाणारी डुकरे आणि कुत्री आहेतच. दोन पावले चालून तुम्ही चिखल तुडवत गेटमधून आत गेलात की एकदम चित्र बदलूनच जाते. टँकरचे पाणी आणि रेशनच्या गाडय़ांमधील अन्न मिळविण्यासाठी पोर बखोटीला मारून एका हाताने साडी सावरणा:या महिला पळताना दिसतात. ठरावीक वेळेनंतर मदतीसाठी येणा:या गाडय़ा, त्यांच्यामागे पळणारे लोक, रांगेमध्ये येऊन मदत स्वीकारा अशी सतत होणारी उद्घोषणा असा एक पॅटर्नच तयार झालाय इथे. दुष्काळग्रस्त आहोत हे सांगणारी पुठ्ठय़ासारखी मोठी ओळखपत्रे नाचवणारे पुरुषही दिसू लागतात.
..अर्धवट झोपडय़ा आणि एकूणच त्यांची अवस्था दुष्काळग्रस्तांची स्थिती सर्वकाही चटकन सांगून जाते. जवळच्या झोपडय़ांपेक्षाही यांची कळा अधिक वाईट दिसते. जणू दारिद्रय़ाचे चिमुकले बेट कोणीतरी चिमटीत उचलून येथे फेकलेय..
ही आपल्या मुळातून तुटून पाण्यापाठी आलेली कुटुंबे.
आईबाप, त्यांची तरणी नाहीतर कच्चीबच्ची पोरे! आजा-आजी बहुधा कोरडय़ा पडलेल्या गावातल्या वणव्यातच राहिलेले. ते कसे येणार?
मुंबईच्या कुशीत अशा अनेक कुटुंबांनी आपला तात्पुरता संसार थाटला आहे.
त्यातलाच एक घाटकोपरच्या भटवाडीतला हा डोंगर! दुष्काळग्रस्तांच्या कॅम्पमध्ये बहुतांश लोक नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातून आलेले आहेत. दरवर्षी ऊस तोडणी करणारी ही मंडळी यावर्षी काहीच काम नसल्याने मोठय़ा संख्येने मुंबईच्या दिशेने आली आहेत. गावाकडे काहीच पिकत नाही असे दिसल्यावर हाताला येईल ते सोबत घेऊन त्यांनी मुंबई गाठली. या लोकांशी बोलताना दरवर्षीपेक्षा यंदा दुष्काळ किती तीव्र आहे ते जाणवते.
आणि हेही की, कोरडय़ा दुष्काळात जीव जगवण्याची, काहीही करून जगण्याची लढाई कुटुंबातल्या हरेकासाठीच जणू एक युद्ध बनले आहे. राठोड, चव्हाण, जाधव वगैरे आडनावांची ही कुटुंबे आहेत. त्यांच्यापैकी देवीदास राठोड यांच्याशी गप्पा सुरू होत्या. मला म्हणाले, चला घरी!
हे घर म्हणजे तात्पुरती झोपडी! बोलता बोलता सहज विषय काढला, तर मागे राहिलेल्या घराच्या आठवणीने या भल्या माणसाच्या डोळ्यात पाणीच आले.
देवीदास आहेत नांदेडच्या मुखेडमधील बापशेटवाडीचे. मनू तांडा हा त्यांचा बंजारा समाजाचा तांडा. वर्षभरामध्ये जवळच्या जमिनीच्या तुकडय़ावर काही पिकले तर पिकले नाहीतर इतर कामासाठी मोकळे अशी त्यांच्या तांडय़ाची स्थिती! गेल्या दोन वर्षामध्ये मुखेड भागात पाऊस फारच कमी झाला आहे. तरीही देवीदासांनी कर्ज काढून खते, बियाणी घेतली आणि सोयाबीन, कापूस लावला. पण रोपे जेमतेम वीतभर उंचीची झाल्यावरच पाण्याविना करपून गेली. नाही म्हणायला थोडीफार ज्वारी हाताशी आली पण खत दुकानदाराचे आणि बियाण्याचे पैसे अंगावर बसलेच. त्यामुळे शेतात पीक नाही आणि व्याजाने घेतलेले पैसे परत करण्यास पैसेही नाहीत अशा कात्रीत ते सापडले.
घरचे खर्च आणि रोजचे पोटपाणी कसे चालवायचे याच्या चिंतेने सरळ विष घेऊन आत्महत्त्या करावी असे वाटण्यार्पयत विचार गेले. शेवटी दुष्काळाच्या वणव्यात पेटलेल्या गावात मरण्यापेक्षा मुंबईत काही करता येते का हे बघायला गाव सोडले. तीन मुलगे आणि बायकोला घेऊन सरळ भटवाडीमध्ये थडकले.
बापशेटवाडीतल्या तांडय़ावर एका गायीच्या सोबतीला देवीदासांची आई एकटीच मागे राहिली आहे. मुलांच्या शाळांना सुटी असल्यामुळे त्यांना घेऊन बाहेर पडता आले आहे.
देवीदासांप्रमाणो इथे आलेल्या लोकांना आठवडय़ात दोन-चार दिवस काम मिळते आणि रोजच्या कामाचे चारशे रुपयांर्पयत पैसे मिळतात. एक मुलगा, बायको आणि देवीदास असे तिघे काम करतात. पण दररोज काम मिळेल याची शाश्वती नाही. आम्ही भेटलो, त्या दिवशी त्यांच्या बायकोला आणि मुलाला काम मिळाले होते पण त्यांना मिळाले नाही. म्हणूनच ते घरी थांबले होते आणि आमची भेट झाली.
दुपारी त्यांच्या बायकोचा कामावरून जेवलात का विचारायला फोन येऊन गेला होता. आम्ही बोलत असतानाच त्यांचा धाकटा मुलगा अमोल समोर आला. पायाच्या अंगठय़ाला ठेच का लागली असे विचारल्यावर देवीदास म्हणाले, दोन दिवसांपूर्वी रेशन आणणा:या गाडीचे चाक त्याच्या बोटावरून गेले. त्याचा डॉक्टरकडेच दोनेकशे रुपये खर्च झाला. ही पाहा औषधांची बरणी असे सांगत त्यांनी पाठीमागून एक प्लॅस्टिकची बरणी दाखवली.
आईला घरी एकटे सोडून कसे काय आलात विचारल्यावर त्यांना काय बोलावे सुचेना! सगळी हतबलता. मग गळ्यातला आवंढा थांबवत म्हणाले, परमुलखात तिला काय झाले तर काय घ्या.. मग कोण करणार तिचे म्हणून तिला म्हटले, तू थांब गावातच!
पण देवीदासांचे काळीज तिकडे गावीच राहून गेले आहे. आईपाशी. मुंबईत झालेल्या कमाईतून शंभर, दोनशे, पाचशे असे काढून बाजूला ठेवतात आणि कोणी गावाकडे जाणारा भेटला तर त्याच्याबरोबर आईसाठी धाडतात. पण अशी वेळ फारच कमी येते.
गाव सोडून परक्या मुंबईच्या आश्रयाला आलेले देवीदासांचे कुटुंब आणि मागेच राहून गेलेली त्यांची आई यांच्यात एक दुवा मात्र या दुष्काळातही टिकून आहे : फोन!
रोज आईचा फोन आला की ती रडायला लागते. तुम्ही सगळे भेटून जावा असे सांगत राहते. गुडघे दुखत असल्याची तक्रार करते. पण आता पाऊस पडेर्पयत देवीदास परत जाऊ शकत नाहीत.
मला म्हणत होते, ‘‘काय करणार, तुम्हीच सांगा! दिवस आले आहेत, ते निभावले पाहिजेत! इथे लोक मदत करतात. पीठ, तांदूळ, पाणी देऊन आम्हाला जगवले जाते आहे. पण प्रत्येक घास घेताना गावाची आणि आईची आठवण येते. कुटुंबाची ही सगळी वाताहत केवळ पाणी नसल्यामुळे झाली आहे. गावाकडे सध्या दोन तीन दिवसातून दोन हंडे पिण्याचे पाणी मिळते. अशा अवस्थेत तिकडे सगळ्यांचा जीव कसा जगेल?’’
- यंदा पाऊस भरपूर पडावा आणि आपल्या कुटुंबामागचे हे संकट लवकर जावे याकडे ही अख्खी वस्ती आस लावून बसली आहे. देवीदास बोलत असताना त्यांच्या आसपासचे लोक झोपडीजवळ येऊन बसत होते. काय करणार? काम नसेल हाताला, तर रिकामा दिवस अंगावर येतो म्हणत होते. देवीदासच्या बोलण्याला हो ना, बघा ना करत दुजोरा देत होते.
इथे आलेल्या प्रत्येक लहानमोठय़ाची अशीच स्वत:ची अशी कहाणी आहे. हे सगळे लोक पावसाची वाट बघत थांबलेत. कधी पाऊस येतो आणि आम्ही गावाकडे शेतीसाठी जातो अशा विचारांमध्ये ते आहेत.
या कुटुंबांच्या बरोबर मुले आहेत. त्यांच्यातल्या बहुतेकांनी मुंबई पहिल्यांदाच पाहिलेली. इतके मोठे शहर असते, हे तोवर फक्त टीव्हीवर दिसलेले. मुंबईने या मुलांना आता जीव लावायला घेतला असावा. अनेकांच्या नजरेत मुंबईतल्या गगनचुंबी आकाशात भिरभिरणारी नवलाई दिसते. त्या नवलाईला हळूहळू आकर्षणाचा रंग चढतो आहे.
आमच्या आजूबाजूला भिरभिरत्या एका अकरा-बारा वर्षाच्या हस:या मुलीला सहज विचारले,
‘‘मग आवडले का इथे तुला? की गावच छान आहे?’’
- तर ती हसून म्हणाली, ‘‘इकडेच जास्त बरं वाटतं. पण गावाकडच्या मोठय़ा झाडांची तेवढी आठवण येते..’’
चार जनावरे, दोन नातू आणि सुरताबाई!
मुंबईत गेलेल्या देवीदासांच्या आईला शोधत बापशेटवाडीत गेलो, तर गावातून चालणो अवघड असा सगळा फुफाटा! जमीन कसली दगडगोटय़ांची जणू पखरण़ कोरडवाहू 12 एकर जमीऩ लहरी पावसावर अवलंबून शेती़ तोही बक्कळ झाला तर पिकेना अन् नाही झाला तर उगवेना़़़ अशा बापशेटवाडीतल्या मनू तांडय़ावर धूळ तुडवत शोधले, तेव्हा सुरताबाई भेटल्या. दुष्काळाने पेकाट मोडलेले. मुलगा, सून हातावर पोट घेऊन मुंबईला गेलेले. गावाकडे या एकटय़ाच! पंचाहत्तरी ओलांडलेल्या सुरताबाई काशीराम राठोड आपल्या दोन नातवांसह जनावरांच्या पाण्यासाठी दोन किलोमीटरचे अंतर थकलेल्या पावलांनी चालत जातात़
डोंगरी भागात मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करणारा हा समाज कैक वर्षापासून मनू तांडय़ावर वास्तव्याला आह़े गेली तीन वर्षे पाऊस नाही़ शेती ओसाड पडली आह़े दोन वेळच्या भाकरीची चिंता असणारे कुटुंब महानगरांच्या दिशेने निघून गेल़े तांडय़ावर वृद्ध आणि लहान मुले अन् उरलीसुरली जनावरे हा महिना कसा जाईल, याच्या चिंतेत आहेत़ सुरताबाईंना नऊ मुली, चार मुले असा दांडगा परिवार आह़े पतीच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी सांभाळणा:या सुरताबाईंनी कोरडवाहू जमिनीतच खाण्यापुरती ज्वारी, मूग, उडीद अशी पिके आजवर घेतली़ गेल्या तीन वर्षातील दुष्काळदाह शेतीच नव्हे, तर आयुष्य करपून टाकणारा ठरला़ चारही मुले कामाच्या शोधात मुंबईला गेली़ दोन नातू अन् चार जनावरांची जबाबदारी पेलत सुरताबाई आकाशाकडे डोळे लावून बसल्या आहेत़ नातू सुनील व अनिल या दोघांनीही पदवी शिक्षण पूर्ण केले आह़े पुढचे शिक्षण सुरू ठेवत दोघेही आजीच्या कामात मदत करतात. चार दिवसांनी तांडय़ावर येणा:या पाण्याने आमची तहान भागत असली तरी जनावरांचे कसे होणार, हा प्रश्न सुरताबाईंना सतावतो आह़े कामाच्या शोधात अख्खे कुटुंब मुंबईला गेल़े दुष्काळाने घरातही खायला दाणा नाही़ कोणी पाहुणा आला तर चहा पाजवू अशी परिस्थिती नाही, हे सांगताना सुरताबाईंचा कंठ दाटून आला़ नातवाचे लग्न जमले आह़े पण लग्न कसले, आता जगायचे कसे हाच प्रश्न आह़े 1972 पेक्षाही हा दुष्काळ भयाण आह़े
जमिनीत पाणी नाही अन् माणसांच्या मनात ओलावा नाही़
आता सुरताबाई फक्त वाट पाहत आहेत : पावसाची वाट!
एकदा का पाणी पडले की पोरे घरी परततील़ अंगण पुन्हा फुलेल़ पेरणी होईल़ पीक येईल़ दुष्काळाला वाहून नेईल़़़ हीच आस ठेवत सुरताबाई आभाळाएवढा दिवस ढकलत आहेत़ - किशोरसिंह चौहाण, मुखेड
सक्तीची ताटातूट
लातूर, जालना, नांदेडच्या भागातील लोक दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडायला जायचे. पण यंदा कमी पावसामुळे उसाचे क्षेत्रच कमी झाले. म्हणून यांच्यापैकी काही लोकांनी दक्षिण भारताची वाट धरली आहे. हे ऊस तोडणारे बेळगाव-धारवाडर्पयत जायचे. पण उत्तर कर्नाटकातही दुष्काळ असल्याने त्यांना आणखी खाली सरकावे लागले. त्यांच्या काही टोळ्या थेट तिरुपती-चेन्नईर्पयत पोहोचल्या आहेत. चेन्नईपासून दक्षिणोस तंजावर आणि अडियलूरमध्येही दमट-उष्ण हवामानात या टोळ्या काम करत आहेत.
महाराष्ट्र किंवा कर्नाटकच्या कोरडय़ा हवामानात राहण्याची आणि काम करण्याची सवय असणा:या तोडणी मजुरांचा कोयता तामिळनाडूच्या दमट हवामानात तितक्याच वेगाने चालत नाही. मे महिन्याचे कडक ऊन आणि सारखा येणारा घाम यामुळे वारंवार आजारी पडण्याचे प्रमाणही त्यांच्यामध्ये वाढीस लागले आहे. घरापासून इतक्या दूर आणि अशा हवामानात घरातील म्हाता:या कोता:यांना कसे आणायचे म्हणून नाइलाजाने त्यांना घरीच ठेवून मजूर तिकडे गेले आहेत. ज्वारी-बाजरी खाण्याची सवय असल्यामुळे तेथील तांदळाचे पदार्थही खाता येत नाहीत. पण या दुष्काळाच्या वर्षाने त्यांना भाषा, अन्न, हवामान प्रत्येक प्रश्नावर झगडायला लावून घरापासून हजार किलोमीटर लांब या अवस्थेवर आणून सोडले आहे.
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत)
onkark2@gmail.com