कुटुंब-दाह
By Admin | Updated: May 14, 2016 14:07 IST2016-05-14T14:07:56+5:302016-05-14T14:07:56+5:30
एरवी कुटुंब घडते-बिघडते, चालते-अडते ते त्यातल्या नात्यांच्या भरवशावर! बदलत्या काळाने माणसे बदलवली, तसे कुटुंबांचे रंगही पालटले.

कुटुंब-दाह
>मुलामाणसांची ताटातूट करणारी दुष्काळव्यथा
एरवी कुटुंब घडते-बिघडते, चालते-अडते ते त्यातल्या नात्यांच्या भरवशावर!
बदलत्या काळाने माणसे बदलवली, तसे कुटुंबांचे रंगही पालटले.
जुन्या विणी सैल झाल्या, जुन्या सवयीच्या समीकरणांवर हरकती आल्या,
मर्यादा तोडून स्वातंत्र्याचे ङोंडे फडकले, जुने मोडले-तुटले; तसे नवे घडतही गेले!
- पण हे सारे मुख्यत: शहरांच्या आधाराने.
गावखेडय़ातल्या कुटुंबांचे जुने काच तुटण्याआधी
नव्या अडचणींचे काटेच वाटेत आले.
गावेच्या गावे कोरडय़ा वणव्यात लोटणारा दुष्काळ हे ताजे कारण !
या दुष्काळाने पेकाट मोडलेल्या कुटुंबांतल्या माणसांची ताटातूट केली आहे.
तरणी माणसे मुंबईसारख्या बडय़ा शहरांच्या आस:याला गेली आहेत आणि
गावचे घर सांभाळत मागे राहिलेले म्हातारे-कोतारे
गोठय़ातल्या जनावरांसह पावसाची वाट पाहत पाण्यापाठी वणवणत मुलांच्या परतण्याकडे डोळे लावून आहेत.
एरवी कधी कुणापुढे हात न पसरणा:या मायबापांना
परक्या शहरातल्या अन्नछत्रंच्या रांगेत बसणो भाग पडते आहे,
मालकीच्या शिवारात अधिकाराने राबणा:या शेतक:याच्या घरधनिणी
धुण्या-भांडय़ाची, साफसफाईची कामे मिळवण्यासाठी
शहरांपुढे हतबलतेने वाकत आहेत.
कुटुंबे तुटली, पांगली आहेत.
एरवी मुंबईतल्या दुष्काळी छावणीत राहणा:या देवीदासची एकटी आई आम्हाला
नांदेड जिल्ह्यात बापशेटवाडीच्या
तांडय़ावर भेटती ना!
पाऊसपाण्याकडे डोळे लावून ताटातूट सोसणा:या
कुटुंबांच्या या हतबल काफिल्यांची एक खबर
- आजच्या आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या निमित्ताने!