शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘डोन्ट फरगेट 2004’; काँग्रेस जिंकली त्याची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 13:27 IST

‘निवडणुकीत काहीही होऊ शकते, जर ठरवले तर!’ असा विश्वास हे पुस्तक देते. निवडणुकीच्या राजकारणात रस असलेल्या प्रत्येकाने वाचायलाच हवे असे हे पुस्तक आहे.

राजू इनामदार, वरिष्ठ बातमीदार, पुणे -

काँग्रेस जिंकणे शक्यच नाही.’ २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या दोन वर्ष आधीच, या निवडणुकीचा अंदाज भारतातील एखादा नुकताच वयात आलेला नवमतदारही वर्तवतो आहे. २००४ची लोकसभा निवडणूकही अगदी अशीच होती. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची लोकप्रियता ऐन भरात होती. १९९९च्या निवडणुकीत स्वतंत्र १८२ आणि आघाडी करून (राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए) २९८ जागा जिंकून भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेवर आला होता. काँग्रेसला १९९९मध्ये मिळाल्या होत्या ११२ जागा आणि आघाडी करून (संयुक्त लोकशाही आघाडी अर्थात यूपीए) १३५! त्याआधीपासूनच काँग्रेसला घरघर लागली होती. केंद्रातील सत्तेबरोबरच राज्यांमध्येही सत्तेतून पायउतार व्हावे लागत होते.१९९९ ते २००४ या मधल्या पाच वर्षांत सत्ताधारी भाजपने काँग्रेसच्या विरोधात देशभर रान उठवत ‘इंडिया शायनिंग’ म्हणत जोरदार मुसंडी मारली होती. त्यामुळेच २००४च्या निवडणुकीत काँग्रेसला स्वतंत्रपणे देशभरात फार तर ७५ जागा मिळतील आणि त्यांच्या आघाडीला फार तर १२० वगैरे. भाजप आघाडीच सत्तेवर येणार आणि काँग्रेसला परत एकदा दारूण पराभवाचा सामना करावा लागणार, असेच बोलले जात होते.या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे काम एका जाहिरात संस्थेला मिळाले. फक्त ७ ते १५ दिवस त्यांनी काँग्रेसची प्रचार मोहीम राबवली. ‘इंडिया शायनिंग’च्या विरोधात त्यांनी ‘काँग्रेस का हात सबके साथ’ अशी एकदम साधी भूमिका घेतली. सर्वसाधारण माणूस, आम आदमी हा त्यांनी केंद्रबिंदू ठरवला आणि त्यावरच सगळा भर दिला.त्या निवडणुकीचे निकाल समोर आले त्यावेळी निवडणुकीत एखादी प्रचार मोहीम काय करू शकते, याचे दर्शन सगळ्या जगाला घडले. काँग्रेस स्वतंत्रपणे ११२ जागांवरून १४५ जागांवर आली तर त्यांची आघाडी १३५वरून २२० वर. त्याचवेळी भाजपची पूर्वीच्या १८२ जागांवरून थेट १३७ जागांवर गच्छंती झाली होती तर त्यांच्या आघाडीला २९८वरून १८५ वर आणले होते.हे सगळे कसे झाले, याची गोष्ट म्हणजे ‘डोन्ट फरगेट २००४, ॲडव्हर्टायझिंग सिक्रेट्स ऑफ ॲन इम्पाॅसिबल इलेक्शन हिस्टरी’ हे इंग्रजी पुस्तक. ते लिहिले आहे त्या मोहिमेत प्रत्यक्ष अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या जयश्री एम. सुंदर यांनी. भारतीय निवडणुकांमधील अनेक लहान-मोठ्या गमती या पुस्तकात आहेत. शिवाय कोणत्याही निवडणुकीत कोणालाही कमी समजू नये हा धडाही! भारतीय जनमानस फार विलक्षण आहे. यांना काय कळतं, असे सर्वांनाच वाटत असताना सामूहिकपणे अशी काही भूमिका मतपेटीतून व्यक्त होते की, भल्याभल्यांना त्याचा धसका बसावा. इंदिरा गांधी यांचा आणीबाणीनंतरचा पराभव व जनता पार्टीच्या पतनानंतरचे त्यांचे दिमाखदार पुनरागमन याच भारतीय जनमानसाने घडवून आणले होते. जयश्री सुंदर यांनी पुस्तकात याचाही बारकाईने विचार केला आहे. त्यावेळच्या काँग्रेसच्या निवडणूक जाहिराती या करायच्या म्हणून केलेल्या नव्हत्या तर हा असा बारीकसारीक विचार करून प्रसारित करण्यात आल्या होत्या.

पुस्तकाचे लिखाणही केवळ एक गोष्ट सांगावी अशा गमतीने झालेले नाही. गंभीरपणे ते लिहिले गेले आहे. ‘डोन्ट फरगेट २००४’ या शीर्षकातूनच हा गंभीरपणा दिसतो. निवडणूक कॅम्पेनशिवाय आणखीही बरेच काही त्यात आहे. लहान-लहान प्रकरणे करून जयश्री यांनी आशय अधिक सुलभ करून वाचकांसमोर आणला आहे. समजणे सोपे व्हावे म्हणून पुस्तकात छायाचित्रेही दिली आहेत. 

निवडणूक कॅम्पेन नव्हे -पुस्तकाचे लिखाणही केवळ एक गोष्ट सांगावी अशा गमतीने झालेले नाही. गंभीरपणे ते लिहिले गेले आहे. ‘डोन्ट फरगेट २००४’ या शीर्षकातूनच हा गंभीरपणा दिसतो. निवडणूक कॅम्पेनशिवाय आणखीही बरेच काही त्यात आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूकRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी