शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

महाआघाडीतील ‘बिघाडी’ ठरावी दिशादर्शक

By किरण अग्रवाल | Updated: December 19, 2021 16:40 IST

VidhanParishad Election Result: आगामी महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी महाआघाडीला आपल्या घराचे वासे बळकट करून ठेवण्याचा संकेत मिळून गेला आहे.

- किरण अग्रवाल

विधान परिषदेच्या निवडणूक निकालाने महाआघाडीतील बिघाडीची स्थिती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणून ठेवली आहे. अर्थात, खंडेलवाल यांच्या रूपाने भाजपात नव्या नेतृत्वाची भर पडली असून, आगामी महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी महाआघाडीला आपल्या घराचे वासे बळकट करून ठेवण्याचा संकेत मिळून गेला आहे.

 

विधान परिषद सदस्यत्वासाठीच्या निवडणुकीत स्वकीयांच्या व हक्काच्या समजल्या जाणाऱ्या मतांचीच फाटाफूट होत त्रिपक्षीय महाआघाडीच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागल्याचे पाहता, आगामी महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका ‘महाआघाडी’ने लढायच्या ठरल्यास कोणाला लाभ होणार, असा प्रश्न उपस्थित होणे गैर ठरू नये.

 

विधान परिषदेच्या अकोला, बुलडाणा, वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात यंदा भाजपाने ‘जशास तसे’ राजकारण केल्यानेच यापूर्वी विजयाची हॅटट्रिक केलेल्या शिवसेनेच्या गोपीकिशन बाजोरिया यांचा पराभव करता आला. गेल्या दोन निवडणुकांपासून वसंत खंडेलवाल यांचे नाव उमेदवारीच्या स्पर्धेत राहिले असले तरी यंदा ते प्रथमच रिंगणात उतरले होते. ते नवखे असले तरी पक्ष त्यांच्यासाठी कंबर कसून कामाला लागला होता. बाजी पलटणे काय असते, ते भाजपाने या निवडणुकीत दाखवून दिले. याउलट महाआघाडीतील तीन पक्षांची कागदावर दिसणारी मतदारांची आकडेवारी निर्धास्तता दर्शवणारी होती. मात्र, ती किती फसवी होती हे निकालाने लक्षात आणून दिले. निवडणुकीच्या बाजारात हे चालतच असते; पण संबंधित मतदारांना काही महिन्यांतच स्वतःलाही निवडणुकीच्या मांडवाखालून जायचे असताना काहींकडून फाटाफुटीचे धाडस केले गेले, ही यातील विशेष बाब म्हणायची.

 

आघाडीकडे असलेली मते फुटली, ती नेमकी कोणाची, हे भलेही नक्की सांगता येऊ नये. कारण ज्या ‘वंचित’बद्दल शंका घेतली जातेय त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आघाडीतीलच घटक पक्षांच्या माथी दगाबाजीचे खापर फोडले; यातील ‘कथनी व करनी’च्या फरकाचे राजकारण घडीभर बाजूस ठेवले तरी, स्वकीयांचीही मते फुटलीत हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. महापालिका व जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकांमध्ये तिकिटासाठी आपल्याला पक्षाच्याच दारात जायचे आहे, हे माहीत असतानाही संबंधितांनी दगाबाजीचे धाडस केले. यावरून एक तर पक्षांतर्गत धुसफूस किंवा आघाडीतील घटक पक्षात परस्परांबद्दल असलेली नाराजी तर उघड व्हावीच, शिवाय राजकारणात उद्याचा विचार न करता तात्कालिक लाभालाच कसे महत्त्व प्राप्त झाले आहे, हेदेखील लक्षात यावे.

 

खरे तर अकोला जिल्हा परिषदेत सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीविरोधात एकवटलेल्या विरोधकांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यासाठी मागणी पत्र दिले होते, त्यावरील आपल्या सह्या ग्राह्य धरू नये, असे भाजपच्या सदस्यांनी म्हटले तेव्हाच ‘वंचित’सोबतच्या त्यांच्या अंतस्थ हातमिळवणीचे संकेत मिळून गेले होते; परंतु त्याची फिकीर न बाळगता आघाडी धर्मावर विसंबून काहीशी निर्धास्तता बाळगली गेली. शिवाय यापूर्वी शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही विजयाचा चमत्कार घडविलेल्या बाजोरिया यांना यंदा खुद्द शिवसेनेंतर्गत गटबाजीला पुरून उरण्यात अपयश आले. भाजपात आपली मते सांभाळण्याची जशी तटबंदी केली गेली, तसे शिवसेना व एकूणच आघाडीतील वरिष्ठांकडूनही पुरेशी नाकाबंदी केली गेली नाही.

 

महत्त्वाचे म्हणजे, आघाडीतील शिवसेनेच्या सहयोगी पक्षांना सेनेचे वर्चस्व नकोय की काय, असा प्रश्न यातून उपस्थित होणारा असल्याने यापुढील महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही आघाडीने लढायच्या झाल्यास काय चित्र असू शकेल, याचा अंदाज बांधता यावा. वसंत खंडेलवाल यांच्या विजयाने भाजपाचा उत्साह दुणावणारा असून, या पक्षाची वाटचाल ‘शतप्रतिशत’कडे सुरू झाल्याचे म्हणता यावे. भाजपाच्या या वाटचालीला समर्थपणे रोखायचे तर आघाडीत दिसून आलेली ‘बिघाडी’ची स्थिती बदलावी लागेल, जे आजघडीला जरा अवघडच दिसते आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकMahavikas Aghadiमहाविकास आघाडी