शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

महाआघाडीतील ‘बिघाडी’ ठरावी दिशादर्शक

By किरण अग्रवाल | Updated: December 19, 2021 16:40 IST

VidhanParishad Election Result: आगामी महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी महाआघाडीला आपल्या घराचे वासे बळकट करून ठेवण्याचा संकेत मिळून गेला आहे.

- किरण अग्रवाल

विधान परिषदेच्या निवडणूक निकालाने महाआघाडीतील बिघाडीची स्थिती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणून ठेवली आहे. अर्थात, खंडेलवाल यांच्या रूपाने भाजपात नव्या नेतृत्वाची भर पडली असून, आगामी महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी महाआघाडीला आपल्या घराचे वासे बळकट करून ठेवण्याचा संकेत मिळून गेला आहे.

 

विधान परिषद सदस्यत्वासाठीच्या निवडणुकीत स्वकीयांच्या व हक्काच्या समजल्या जाणाऱ्या मतांचीच फाटाफूट होत त्रिपक्षीय महाआघाडीच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागल्याचे पाहता, आगामी महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका ‘महाआघाडी’ने लढायच्या ठरल्यास कोणाला लाभ होणार, असा प्रश्न उपस्थित होणे गैर ठरू नये.

 

विधान परिषदेच्या अकोला, बुलडाणा, वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात यंदा भाजपाने ‘जशास तसे’ राजकारण केल्यानेच यापूर्वी विजयाची हॅटट्रिक केलेल्या शिवसेनेच्या गोपीकिशन बाजोरिया यांचा पराभव करता आला. गेल्या दोन निवडणुकांपासून वसंत खंडेलवाल यांचे नाव उमेदवारीच्या स्पर्धेत राहिले असले तरी यंदा ते प्रथमच रिंगणात उतरले होते. ते नवखे असले तरी पक्ष त्यांच्यासाठी कंबर कसून कामाला लागला होता. बाजी पलटणे काय असते, ते भाजपाने या निवडणुकीत दाखवून दिले. याउलट महाआघाडीतील तीन पक्षांची कागदावर दिसणारी मतदारांची आकडेवारी निर्धास्तता दर्शवणारी होती. मात्र, ती किती फसवी होती हे निकालाने लक्षात आणून दिले. निवडणुकीच्या बाजारात हे चालतच असते; पण संबंधित मतदारांना काही महिन्यांतच स्वतःलाही निवडणुकीच्या मांडवाखालून जायचे असताना काहींकडून फाटाफुटीचे धाडस केले गेले, ही यातील विशेष बाब म्हणायची.

 

आघाडीकडे असलेली मते फुटली, ती नेमकी कोणाची, हे भलेही नक्की सांगता येऊ नये. कारण ज्या ‘वंचित’बद्दल शंका घेतली जातेय त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आघाडीतीलच घटक पक्षांच्या माथी दगाबाजीचे खापर फोडले; यातील ‘कथनी व करनी’च्या फरकाचे राजकारण घडीभर बाजूस ठेवले तरी, स्वकीयांचीही मते फुटलीत हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. महापालिका व जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकांमध्ये तिकिटासाठी आपल्याला पक्षाच्याच दारात जायचे आहे, हे माहीत असतानाही संबंधितांनी दगाबाजीचे धाडस केले. यावरून एक तर पक्षांतर्गत धुसफूस किंवा आघाडीतील घटक पक्षात परस्परांबद्दल असलेली नाराजी तर उघड व्हावीच, शिवाय राजकारणात उद्याचा विचार न करता तात्कालिक लाभालाच कसे महत्त्व प्राप्त झाले आहे, हेदेखील लक्षात यावे.

 

खरे तर अकोला जिल्हा परिषदेत सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीविरोधात एकवटलेल्या विरोधकांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यासाठी मागणी पत्र दिले होते, त्यावरील आपल्या सह्या ग्राह्य धरू नये, असे भाजपच्या सदस्यांनी म्हटले तेव्हाच ‘वंचित’सोबतच्या त्यांच्या अंतस्थ हातमिळवणीचे संकेत मिळून गेले होते; परंतु त्याची फिकीर न बाळगता आघाडी धर्मावर विसंबून काहीशी निर्धास्तता बाळगली गेली. शिवाय यापूर्वी शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही विजयाचा चमत्कार घडविलेल्या बाजोरिया यांना यंदा खुद्द शिवसेनेंतर्गत गटबाजीला पुरून उरण्यात अपयश आले. भाजपात आपली मते सांभाळण्याची जशी तटबंदी केली गेली, तसे शिवसेना व एकूणच आघाडीतील वरिष्ठांकडूनही पुरेशी नाकाबंदी केली गेली नाही.

 

महत्त्वाचे म्हणजे, आघाडीतील शिवसेनेच्या सहयोगी पक्षांना सेनेचे वर्चस्व नकोय की काय, असा प्रश्न यातून उपस्थित होणारा असल्याने यापुढील महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही आघाडीने लढायच्या झाल्यास काय चित्र असू शकेल, याचा अंदाज बांधता यावा. वसंत खंडेलवाल यांच्या विजयाने भाजपाचा उत्साह दुणावणारा असून, या पक्षाची वाटचाल ‘शतप्रतिशत’कडे सुरू झाल्याचे म्हणता यावे. भाजपाच्या या वाटचालीला समर्थपणे रोखायचे तर आघाडीत दिसून आलेली ‘बिघाडी’ची स्थिती बदलावी लागेल, जे आजघडीला जरा अवघडच दिसते आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकMahavikas Aghadiमहाविकास आघाडी