शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिनेमातला सिनेमा

By admin | Updated: November 8, 2014 18:18 IST

काय करायचे आहे, कसे करायचे आहे याची पक्की समज हे नव्या पिढीचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच त्यांच्या जगण्याला एक प्रकारची घाई आहे. जगभरातील नव्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांमधून ही घाई दिसून येते. मात्र, कशावर फोकस करायचा, हे माहिती असल्याने ही घाई वृथा वाटत नाही.

- अशोक राणे

 
हल्लीची पिढी खूपच स्मार्ट आहे, असं अलीकडे सर्रास कानांवर येतं. म्हणजे नेमकं काय, असं विचारलं तर सरसकट सर्वांनाच सांगता येईल असं नाही. ‘आपल्या आधीच्या पिढीपेक्षा अधिक हुशार’ एवढंच मोघम उत्तर मिळण्याचीच दाट शक्यता. ही पिढी वेगळी आहे हे खरंच आहे. याआधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे, ती इमोशनल आहे; परंतु सेंटिमेंटल नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा निर्णय ते फार वेळ न दवडता घेतात. कारण ते उगाचच भावुक होत नाहीत. कुणाला काय वाटेल याचा तर जवळपास विचारच करीत नाहीत. कारण त्या त्या निर्णयाचा थेट त्यांच्याशी आणि केवळ त्यांच्याशीच मुख्यत: संबंध असतो, याची त्यांना स्पष्ट आणि नेमकी जाणीव आहे. पुढच्या वळणाकडे सरकण्याची त्यांना एक प्रकारची अपरिहार्य घाई असते. आधीच्या पिढीसारखं एकाच जागी खोळंबून राहणं त्यांना त्यांच्या काळाच्या- काम, काळ, वेगाच्या संदर्भात परवडणारं नसतं. पूर्वीची पिढी एकदा नोकरीत चिकटली की ग्रॅच्युइटी, फंड घेऊनच बाहेर पडणार. आताची पिढी सटासट नोकर्‍या बदलते आणि इतकंच नाही, तर त्याचं म्हणजेच करियरचं नीट प्लॅनिंगही करते. त्यांच्या सभोवताली आकर्षित करून घेणार्‍या गोष्टी इतक्या असतात, की या पिढीतील मुले जेव्हा फोकस्ड राहतात, तेव्हा त्यांचं मनापासून कौतुक करावंसं वाटतं. काळ कुठलाही असो, प्रत्येक तरुण पिढीत दोन प्रकार असतातच. एक वर्ग सर्वच बाबतींत बेपर्वा असतो, तर दुसरा फोकस्ड! सभोवताली नीट बारकाईने पाहिलं, तर एक गोष्ट सहज लक्षात येईल आणि ती म्हणजे आधीच्या पिढय़ांतील फोकस्ड लोकांपेक्षा या आताच्या पिढीसाठी काळ मोठा कसोटीचा आहे.. कारण भरकटण्याच्या शक्यता आता अधिक आहेत आणि इथेच ही पिढी खर्‍या अर्थाने आधीच्या पिढीपेक्षा अधिक स्मार्ट वाटते. अशी एक स्मार्ट मुलगी मला भेटली ‘डोन्ट से दॅट वर्ड’ या जपानी चित्रपटात!
साटो ताकुमा या चोवीस वय असलेल्या लेखक-दिग्दर्शकाचा हा चित्रपट! हायस्कूलच्या फुटबॉल टीमची मॅनेजर नात्सु हिला टीममधल्या खेळाडूंपेक्षा पराभव वर्मी लागला आहे. चालू सिझनमध्ये तिची टीम सपाटून मार खाते आहे. एकामागून एक पराभवाची मालिकाच सुरू आहे.. आणि शिक्षा सुनावली जाते नात्सुला! तिने राजीनामा द्यावं असं सुचविलं जातं. ती केवळ नकारच देत नाही, तर पदावर राहण्यासाठी निकराने लढा देते. कारण सततच्या या पराभवाची नामुष्की टीमवर का येते, याची तिला नेमकी जाणीव आहे. टीममधला कुणीच गांभीर्याने खेळाकडे पाहत नाही. केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी प्रत्येक जण खेळतो आहे. एका विशिष्ट र्मयादेपर्यंत आपापलं कसब, कौशल्य वापरायचं आणि त्याच्या जोरावर एक खेळाडू म्हणून पुढच्या वर्षीच्या कॉलेज प्रवेशाची व्यवस्था करायची, एवढाच र्मयादित स्वार्थ प्रत्येक जण पाहतो आहे. टीम म्हणून एक सांघिक जाणिवेचा त्यांच्यात लवलेशही नाही आणि हेच त्यांच्या सततच्या पराभवाचं मुख्य कारण आहे. नात्सु ते संबंधितांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करते आहे; परंतु मुळाशी न जाता वरवरची मलमपट्टी करायची सवय असलेल्या व्यवस्थेला तिच्या तडफडीची दखल घ्यावीशी वाटत नाही.. आणि मग एका क्षणी तिला मॅनेजरच्या पदावरून पायउतार व्हावं लागतं. शिस्तीचा आग्रह धरणारी नात्सु गेल्याचा पोरांना आनंद होतो. आधीच तिची टर उडविणारे, तिला छळणारे उच्छाद मांडतात. टीमचा कॅप्टन गो याला नात्सुची तडफड कळते; परंतु बेपर्वा वृत्तीच्या आपल्या टीममेट्सना तो समजावू शकत नाही. नात्सुला टीम सोडावी लागते; परंतु ती एकाकी पडत नाही. अगतिक होत नाही. कारण तिला खेळाचं र्मम कळलेलं असतं.. आव्हानं अंगावर घ्यायची, ती पेलायची आणि परतवायची! जयपराजयाच्या पलीकडे जाऊन निकराने, जिद्दीने ‘खेळत’ राहणे म्हणजे खेळ! ती तेच आपल्या टीममध्ये पेरायचा प्रयत्न करते.. कारण ते खेळाचंच नव्हे, तर अवघ्या जगण्याचंच र्मम आहे, याचे तिला भान आहे. ती आणि एकूणच ‘डोन्ट से दॅट वर्ड’ तेच अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतो. हा चित्रपट पाहताना मला ‘हीप हीप हुर्ये’, ‘उडान’ आणि ‘चक दे इंडिया’ या आपल्या चित्रपटांची तीव्रतेने आठवण झाली. कारण हे तीनही चित्रपट केवळ खेळाचंच नव्हे, तर अवघ्या जगण्याचं भान देणारे विलक्षण सुंदर चित्रपट होते.
साटो ताकुमा इकॉनॉमिक्स घेऊन बी.ए. करीत असताना अँड फिल्म्सचं आकर्षण वाटून तिकडे वळला. परंतु, ‘अँड फिल्म्स करायच्या त्या क्लायंटसला खूष करण्यासाठी, त्यापेक्षा आपण आपल्याला आवडतील अशा फिल्म्स का करू नयेत’ असा विचार करीत थोडीफार उमेदवारी करून त्याने त्याकडे पाठ फिरविली. चित्रपट निर्मितीच्या एका साध्या कार्यशाळेत जाऊन चार धडे गिरविले आणि थेट चित्रपटच केला. ‘डोन्ट से दॅट वर्ड’ हा त्याचा पहिला चित्रपट! चित्रपट पाहून अजिबात तसं वाटत नाही. इतकी त्याची माध्यमाची आणि मुख्यत: भोवतालच्या जगाची समज प्रगल्भ आहे. गेल्या काही वर्षांत जगभर असे काही साटो ताकुमा भेटत आलेत. अतिशय फोकस्ड आणि म्हणूनच प्रभावी!
वर मी म्हटलंय, की या नव्या पिढीला, पुढच्या वळणाकडे सरकण्याची एक प्रकारची अपरिहार्य घाई असते. ‘वुई विल बी ओके’ या कोरियन चित्रपटात या तरुणाईच्या कायम तोंडी असलेला एक संवाद आहे - ‘यू डोन्ट हॅव मच टाइम लेफ्ट, हाऊ कॅन यू बी सो रिलॅक्स्ड.’ आपण म्हणावं, अरे आता आता कुठे तुझं आयुष्य सुरू झालंय. अख्खं आयुष्य पडलंय. कसली एवढी घाई? पण त्यांना ती आहे. कारण त्यांच्या काळाचा वेग भन्नाट आहे. 
आधीच्या कुठल्याही पिढीत नव्हती एवढी स्पर्धा आहे. त्यात नुसतं टिकून राहण्यासाठीच नव्हे, तर यशस्वीपणे वाटचाल करायची असेल, तर ही घाई अपरिहार्य आहे. त्यातून एक विजिगीषू जिद्द जशी पुढे येते तद्वतच नैराश्यही वाट काढणारच. आत्महत्येचा विचारही बळावणार. ‘वुई विल बी ओके’चा नायक सांग-सेक तरुणाईच्या या मनोवस्थेकडे आपलं लक्ष वेधतो.
तो एक नट आहे. अजून त्याला मोठी संधीही मिळायची आहे; परंतु अनावर महत्त्वाकांक्षेने जोर धरलाय. त्याची भूमिका असलेल्या चित्रपटाचा बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभाग व्हावा आणि नट म्हणून त्याला जगभरच्या चित्रपट व्यावसायिकांमध्ये वावरायला मिळावं; परंतु महत्त्वाकांक्षाच ती! ती काय इतकी सहजपणे पूर्ण होणार?
नट म्हणून नुकती कुठे सुरुवात झालेल्या सांग-सेकला त्याच्या मित्राच्या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका मिळते; परंतु  नायिका पहिल्याच दिवशी शूटिंग सोडून निघून जाते. कारण यांची फिल्म मोबाईलच्या कॅमेर्‍याने शूट होणार असते. मुळातच सर्व प्रकारच्या अडचणींशी सामना करीत सुरू झालेल्या या फिल्मला सतत अडचणींना सामोरे जावे लागते. परिणामी किंचितही कसली प्रगती होत नाही आणि सांग-सेकला कमालीचं नैराश्य येतं. आणि मग तो आत्महत्येचा निर्णय घेतो. एरवी चिठ्ठी लिहून ठेवली जाते. तो मोबाईलवर तशी चिठ्ठी ‘लिहून’ ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तो आत्महत्या करता करता, आपण आत्महत्या का करतो ते सांगताना स्वत:ला मोबाईलच्या कॅमेर्‍याने शूट करतो. म्हणजे तसा प्रयत्न करीत राहतो. कारण ते नेमकं जुळून येत नाही. गच्चीच्या कठड्यावर उभं राहतानाच तारांबळ उडते, त्यातून खाली वाकून पाहताना भ्यायला होतं आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही ते जुळून येत नाही. त्यातच हे सारं चालू असताना स्वत:च शूट करायचा. इमेज आणि साऊंड सिंक्रोनाईज होत नाही.. आणि तिथून त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो. तो पुन्हा नव्या उमेदीने आयुष्याकडे येतो. जगणं अवघड आहे; परंतु मृत्यूही सोपा नाही, याचं त्याला भान येतं.
जेमतेम विशी गाठलेल्या बेक जेहोने चित्रपट लेखन-दिग्दर्शनाच्या आपल्या पहिल्याच प्रयत्नात ती समज दाखवली आहे, ती कौतुकास्पद आहे. आपल्या नायकाच्या कलाजीवनात त्याच्या अति महत्त्वाकांक्षेमुळे निर्माण झालेले प्रश्न आणि 
अगदी आत्महत्येच्या निर्णयाशी त्याचं येणं हा प्रवास लेखक-दिग्दर्शक म्हणून तो स्वत:ही सेंटी होऊन पाहत नाही. जे वाटतं त्या वाटेने नायकाला जाऊ देत तो त्याचं त्याला भान येण्यास मदत करतो आणि यादरम्यान  तो नायक जे कॅमेर्‍यात निरोपाचं बोलतो, त्यातून या पिढीची मानसिकता नेमकी व्यक्त करतो. आजवर मी ‘फिल्म विदिन फिल्म’ म्हणजेच सिनेमातला सिनेमा या जॉनरमधील अनेक उत्तमोत्तम चित्रपट पाहिले. 
‘वुई विल बी ओके’ हा त्यामधला एक, असं मी निश्‍चितपणे म्हणू शकतो. चित्रपटातल्या लोकांची गोष्ट आणि म्हणून मग एकाच वेळी ते बनवत असलेला चित्रपट आणि त्यांच्या ‘या’ गोष्टीवरचा चित्रपट असं हे जॉनर आहे. गुरुदत्त यांचा ‘कागज के फूल’ आणि अगदी अलीकडचा ‘ओम शांती ओम’ हे या प्रकारातील चित्रपट! ‘वुई विल बी ओके’चा नायक चित्रपटात काम करणारा नट आहे, त्याची महत्त्वाकांक्षाही चित्रपटविषयक आहे, त्याच्या चित्रपटाचं रडत रखडत कामही सुरू आहे आणि आपल्या आत्महत्येचं तो शूटिंगही करण्याचा प्रयत्न करतो आहे. असा आहे हा उत्तम जमून आलेला सिनेमातला सिनेमा..!
(लेखक भारतीय व जागतिक चित्रपटांचे 
व्यासंगी अभ्यासक, दिग्दर्शक व परीक्षक आहेत.)