शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

लालचुटूक फुग्यातली बदलती हवा

By admin | Updated: February 13, 2016 17:55 IST

एकेकाळी बंडखोरीचं एक टोक आणि विरोधाचं दुसरं टोक गाठणारा व्हॅलेण्टाईन्स डे नावाचा परका उत्सव. आता अगदीच ‘रुटीन’, कोमट झालेला दिसतो. टोकाचा आग्रह-विरोध ते रुटीन सेलिब्रेशनचं वार्षिक कर्मकांड हा सामाजिक विचारवृत्तींचा लंबक या टोकाकडून त्या टोकाकडे गेला कसा?

-  मेघना ढोके
 
व्हॅलेण्टाईन्स डे. हा दिवस या देशात 25 वर्षापूर्वी कुणाला माहिती होता? 14 फेब्रुवारी नावाच्या कॅलेण्डरवरच्या दिवसाची या समाजात ना काही ओळख होती, ना विशेष माहात्म्य!
मात्र 90-91 मध्ये देशानं अर्थव्यवस्थेची कवाडं उघडली आणि त्या नुकत्या उघडलेल्या दारातून जागतिकीकरणाचं वारं भरारा वाहू लागलं. त्याच वा:यावर स्वार होत हा ‘डे’ही भारतीय समाजात मुसंडी मारू लागला. दरम्यान, ‘खाउजा’ अर्थात खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि बाजारपेठ भावनिक आवाहनं करत नवनवीन उत्पादनं ‘गरज’ म्हणून विकू लागली. मात्र सण-उत्सवांची उदंड रेलचेल आणि चंगळ असलेल्या देशात या नव्या सणाची काय ‘गरज’ होती? सामाजिक तरीही अत्यंत व्यक्तिगत, खासगी, भलत्याच उत्सवाची काय आवश्यकता होती?
- वरकरणी काहीही नाही! 
तरीही व्हॅलेण्टाईन्स डे या समाजात टिकला, रुजला, स्वीकारला गेला आणि वाढला.
 तो कसा?
- बाजारपेठ! असं त्याचं सोपं उत्तर कुणीही देईल! ते खरं, महत्त्वाचं आणि वरकरणी अचूकही आहेच! मात्र तेच एकमेव उत्तर आहे असं मात्र नव्हे! त्यापलीकडे जाऊन समाजातल्या त्या काळातल्या तारुण्यातल्या बंडखोरीशी हा तेव्हाचा ‘परका’ उत्सव जोडून पाहिला तर काही गोष्टींची नव्यानं उकल होते आणि नव्यानं निर्माण झालेले विरोधाभासही दिसू लागतात.
गेल्या 25 वर्षात 25 वेळा बाजारपेठ आणि मार्केटिंगच्या रेटय़ानं हा दिवस देशभर तोलून धरला, माध्यमांनी गाजवला आणि विरोधकांनी चर्चेत ठेवला हे जितकं खरं, तितकंच या देशातल्या तारुण्यानेही आपल्या तत्कालीन बंडखोरीला या दिवसाशी जोडून घेतलं, हेही खरं! तसं नसतं तर एक लालचुटूक बदामी फुगा मनमर्जी जगण्याचं प्रतीक म्हणून कसा काय स्वीकारला गेला असता? तीव्र विरोधाच्या टाचण्या टोचूनही व्हॅलेण्टाईन्स डे चा हा फुगा फुटला नाही उलट जास्त उंच ङोपावत राहिला, तो कसा? 
‘खाउजा’च्या रेटय़ातल्या पावशतकी प्रवासातल्या सामाजिक मानसिकतेची आणि वैयक्तिक विचार-वृत्तींची नोंद त्यासाठी घ्यावी लागेल. मात्र त्या नोंदीसह ताळा जुळवत व्हॅलेण्टाईन्सची समीकरणं मांडावीत तर चालू वर्तमानातलं चित्र मात्र आश्चर्यकारकरीत्या वेगळंही दिसतं! एकेकाळी बंडखोरीचं एक टोक आणि विरोधाचं दुसरं टोक गाठणारा हा उत्सव आता अगदीच ‘रुटीन’, कोमट झालेला दिसतो. 
टोकाचा आग्रह-विरोध ते रुटीन सेलिब्रेशनचं वार्षिक कर्मकांड असा सामाजिक विचारवृत्तींचा लंबक या टोकाकडून त्या टोकाकडे गेला कसा?
याचीच विशेष ‘व्हॅलेण्टाईन्स’ चर्चा