शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

आव्हानातला आशीर्वाद आयुष्य उजळेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 6:00 AM

आयुष्यातील प्राधान्यक्रमांची कायमच उलथापालथ होत असते. यापुढे आपल्या सर्वांना एक गोष्ट सतत स्वतःला सांगावी लागणार आहे.. कोरोनाला सामोरे जाताना जे-जे चांगले बदल आपण स्वतःमध्ये केले ते टिकवून ठेवा..

ठळक मुद्देकोरोना जाईल तेव्हा जावो, स्वतःमधील उत्तम जाणणारा माणूस आव्हानाच्या डोळ्याला डोळा भिडवू शकतो हे नक्की!

- वंदना अत्रे

सकाळी लवकर गाडी पकडण्यासाठी एखाद्या दिवशी पहाटे उठण्याची वेळ आली तर आपली अजिबात कुरकुर नसते, पण प्राणायाम किंवा व्यायाम करण्यासाठी रोज पहाटे लवकर उठावे लागेल असे चुकून जरी कोणी सुचवले तरी आपण सोईस्करपणे गप्प बसतो...! आयुष्यातील छोटे-छोटे बदल करणे आपल्याला किती अवघड वाटत असते नाही! चारही दिशांनी आपल्या आयुष्यात आरपार घुसलेल्या कोरोना नावाच्या नकोशा पाहुण्याने आपल्याला मुकाटपणे किती बदलांना स्वीकारायला लावले याची कधी तुम्ही यादी केली आहे? बदलण्याची माणसाची क्षमता किती आहे, याची जणू परीक्षा घेणारा हा काळ आणि आव्हान आहे. मला कितीतरी वेळा असे वाटते, प्रत्येक संकटात, आव्हानात काहीतरी आशीर्वाद दडलेला असतो जो कधीच आपल्याला लगेच दिसत नाही; पण एखादे रहस्य हळूहळू उलगडत जावे तशी ही आशीर्वादाची उजळ बाजू हळूहळू समोर येऊ लागते.

कित्येकांचे बळी घेणारा, हजारो कुटुंबांची जीवघेणी मोडतोड करणारा, जिवलग आप्तांची दुःखं काठावर बसून बघण्यास भाग पाडणारा हा आजार कसला आशीर्वाद आपल्या मुठीत घेऊन येणार, असे कडवटपणे म्हणावेसे वाटणे स्वाभाविक; पण प्रत्येक आशीर्वादाची काही किंमत पण असते ना..! या आव्हानाने दिलेला आशीर्वाद कोणता? अनेकांना पायदळी चिरडत सुसाट वेगाने धावत असलेल्या माणसाला थांबवत त्याच्या आयुष्यातील कित्येक गोष्टींची खरी किंमत त्याने दाखवून दिली आहे.

पैसे, आरोग्य, कुटुंब, नोकरी, माणुसकी, निसर्ग, गरजा या गोष्टींना तुमच्या आयुष्यात किती महत्त्व आहे ते १ ते १० या आकड्यात दाखवा असे तुम्हाला २०१९ साली सांगितले असते तर तुम्ही जे आकडे तेव्हा लिहिले असते तेच आज लिहाल का? आयुष्यातील प्राधान्यक्रमांची अशी उलथापालथ होत असताना यापुढे आपल्याला सर्वांना एक गोष्ट सतत स्वतःला सांगावी लागणार आहे. कोरोनाला सामोरे जाताना जे-जे बदल आपण स्वतःमध्ये केले ते टिकवून ठेवण्याची!

या संकटाने आपल्याला हात धुण्याच्या आणि सामाजिक स्वच्छतेच्या सवयी नव्याने लावल्या. नियमित व्यायाम आणि प्राणायाम अशा योगशास्त्रातील अनेक साधना स्वतःच्या जीवनशैलीत सामावून घ्यायला लावल्या. आपल्या गरजा, नाती, आपल्याला उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर, निसर्ग या प्रत्येक गोष्टीकडे नव्याने बघायला लावले. कोरोना निरोप घेतोय असा भ्रम झाल्यागत आपण पुन्हा नव्याने जगणे सुरू करीत असताना हे सगळे बदल पुसून, पाटी कोरी करून पुन्हा पूर्वीच्याच शैलीने जगण्याच्या मोहात न पडणे हे नव्या परिस्थितीतील आव्हान आहे. या दीड वर्षाने आपल्याला आपल्यामध्ये असलेल्या संयमाची ओळख करून दिली आहे. कोणत्याही आव्हानात माघार न घेता चिवटपणे टिकून राहणाऱ्या लढाऊ बाण्याचा परिचय करून दिला आहे. अनोळखी माणसाच्या हाकेला धावून जाणाऱ्या सहृदयतेच्या दर्शनाने आपण अनेकदा हेलावून गेलो आहोत. हे सगळे सांभाळून ठेवणे फार महत्त्वाचे आहे असे तुम्हाला नाही वाटत? त्यासाठी एक फार छान उपाय आहे, आणि तो म्हणजे आपल्या उत्तमाची डायरी लिहिणे. आपल्यातील उत्तमाची जाणीव ती आपल्याला वारंवार करून देते.

उत्तमाची डायरी!

सकारात्मक मानसशास्त्रातील हा एक फार प्रभावी उपाय आहे. सर्वसामान्यतः डायरी लिहिली जाते ते आपल्या मनात खदखदत असलेले दुःख, कोणापुढे मांडता न येणारे अपयश लिहिण्यासाठी. डायरी हा आपल्या जीवनाचा असा आरसा असतो जो कोणीही कधीही बघू नये अशी आपली इच्छा असते. सकारात्मक मानसशास्त्र सांगते, रोज प्रत्येकाने आपल्या उत्तमाची डायरी लिहावी. त्या दिवसात आपण जे-जे काही चांगले केले असेल त्याची, ऐकलेला चांगला विचार, जे विचार आपले कौशल्य सुधारण्यासाठी उपयोगी पडणारे आहेत, ज्या विचारांवर तुमची श्रद्धा आहे त्या सगळ्या गोष्टी या उत्तमाच्या रोजनिशीत लिहा. तुमच्यासाठी, स्वास्थ्यासाठी, प्रगतीसाठी, कोणते शब्द उपयोगी आहेत ते शोधून काढा अन् त्याची डायरीत नोंद करून ठेवा. स्वतःशी संवाद साधण्यासाठी याच शब्दांचा उपयोग करा.

उत्तमाची डायरी का लिहायची? ती आपल्याला आपल्यामधील उत्तमाची वारंवार ओळख करून देते आणि त्यावरील आपला विश्वास वाढवताना आपला आत्मविश्वासपण वाढवते. कोणतेही आव्हान हाताळण्यासाठी स्वतःची, स्वतःमधील सामर्थ्याची ओळख असणे पुरेसे आहे. कोरोना जाईल तेव्हा जावो, स्वतःमधील उत्तम जाणणारा माणूस आव्हानाच्या डोळ्याला डोळा भिडवू शकतो हे नक्की!

(ज्येष्ठ पत्रकार आणि अनुवादक)

vratre@gmail.com