शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

‘भारत माता की जय!’ कसाब म्हणाला; पण समाधान झाले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 13:06 IST

26/11 Terror Attack: हल्ल्यानंतर साधारण तीन आठवड्यांनंतर. दिनेश कदम आणि मी त्याची चौकशी करत होतो. त्याचा सहकारी इस्माइल जखमी झाल्याचे त्याला माहीत होते; पण तो मेल्याचे माहीत नव्हते. मी त्याच्याकडे बघितले आणि त्याचा उद्धटपणा मला सहन होईनासा झाला.

- राकेश मारिया(माजी पाेलिस आयुक्त, मुंबई)हल्ल्यानंतर साधारण तीन आठवड्यांनंतर. दिनेश कदम आणि मी त्याची चौकशी करत होतो. त्याचा सहकारी इस्माइल जखमी झाल्याचे त्याला माहीत होते; पण तो मेल्याचे माहीत नव्हते. मी त्याच्याकडे बघितले आणि त्याचा उद्धटपणा मला सहन होईनासा झाला.

‘चल माझ्याबरोबर. ऊठ,’ असे म्हणून मी उभा राहिलो. बाकीचे अवाक् झाले होते. ‘कुठे?’ त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला विचारत होते. पहाटेचे ३:३० वाजले होते. मी दिनेश कदमला एका बाजूला घेतले, आणि मला कुठे जायचे आहे ते त्याला सांगितले. त्याने वाहनांची व्यवस्था केली. काही मिनिटांतच, आमची फौज जे.जे. रुग्णालयाच्या शवागाराच्या दिशेने निघाली. कसाबला एका वाहनात सुरक्षितपणे ठेवलेले होते. जिथे त्याचे नऊ सहकारी फ्रीझरमध्ये चिरनिद्रा घेत होते, ती जन्नत. ‘ये देख! ये हैं तेरे जिहादी दोस्त जो जन्नत में हैं.’ मी म्हणालो. तो आ वासून बघतच राहिला.

तो वास असह्य आणि पोट ढवळून काढणारा होता. ते चेहरे भयंकर दिसत होते. एका अतिरेक्याच्या डोळ्यात बंदुकीची गोळी घुसली होती. काही जण फार वाईट रीतीने भाजले होते, आणि जळलेल्या मांसाचा उग्र दर्प हवेत भरून राहिला होता. ‘काय म्हणतात तुझे उस्ताद? सुगंध, हं? तेज? कुठे आहे सुगंध? कुठे आहे तेज? हा सुगंध आहे? हे तेज आहे?’ मी त्याला विचारत राहिलो. त्याच्याकडे उत्तर नव्हते. ‘जर तुझे उस्ताद म्हणतात की, जिहादमध्ये आलेला मृत्यू तुम्हाला जन्नतमध्ये घेऊन जातो, आणि तुमची शरीरे प्रकाशमान होतात आणि त्यातून सुगंध येतो, आणि पऱ्या तुमच्या सेवेला हजर असतात, तर ते स्वत: जाऊन जिहादमध्ये का मरत नाहीत? तुम्हाला का पाठवतात ते? कारण त्यांना इथल्या नरकाची मजा लुटायची असते म्हणून? त्यांना जन्नतमध्ये जाण्यात रस नसतो वाटतं?’ मी त्याला विचारले. त्याचा चेहरा पिळवटला, पांढराफटक पडला. उलटी होत असल्याप्रमाणे दोन्ही हातांनी पोट धरून तो जमिनीवर बसला.

आम्ही जेव्हा शवागारातून बाहेर पडलो, तेव्हा तो पूर्णपणे भांबावून गेल्याचे आणि त्याला धक्का बसला असल्याचे दिसत होते. फसवला गेलेला. भ्रमनिरास झालेला. आता मला जरा हलके वाटले. हिंदीत म्हणतात त्याप्रमाणे, मेरी भड़ास बाहर निकल चुकी थी.

आमची फौज मेट्रो जंक्शनवर आली. काही दिवसांपूर्वीच या नराधमाने जिथे माझ्या प्रिय सहकाऱ्यांना आणि निरपराध शहरवासी बांधवांना ठार करत मृत्यूचे थैमान घातले होते, तोच पट्टा. माझ्यात पुन्हा काय संचारले माहीत नाही. मी सगळ्यांना थांबवले आणि माझ्या गाडीतून खाली उतरलो. त्यांना कसाबला बाहेर आणायला सांगितले. पहाटेचे ४:३० झाले असावेत. ‘खाली वाक आणि जमिनीवर डोके टेक’, मी कसाबला हुकूम केला. त्याने घाबरून निमूटपणे माझ्या आदेशाचे पालन केले. 

आता म्हण, ‘भारत माता की जय’ मी आज्ञा केली. ‘भारत माता की जय!’ कसाब म्हणाला. एका वेळेने समाधान झाले नाही, म्हणून मी त्याला आणखी एकदा म्हणायला लावले.(‘लेट मी से इट नाऊ’ या राकेश मारिया यांच्या पुस्तकातून साभार)

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाRakesh Mariaराकेश मारिया