पालवी!
By Admin | Updated: July 2, 2016 14:38 IST2016-07-02T14:38:12+5:302016-07-02T14:38:12+5:30
आपल्या अवयवांचं दान करून आपल्या केवळ स्मृतीच नव्हे, तर प्रत्यक्षातही जिवंत राहण्याची अनोखी संधी विज्ञान-तंत्रज्ञानानं आपल्या हाती दिली आहे. स्वत:बरोबरच इतरही आणखी काही जणांना जीवनदान देऊन लोकोत्तर होण्याचा हा जीवनदायी प्रयोग आता बाळसं धरू लागला आहे. विशेष म्हणजे, अशिक्षित, खेडुतांचा त्यातला वाटा लक्षणीय आहे.

पालवी!
>- चन्नवीर मठ
पूर्वी जुनी-जाणती, ज्येष्ठ मंडळी आपल्या अनुभवाचे बोल सांगताना तरुणांना, मुलांना कायम सजग करत असायची.
‘आपल्या आयुष्यात असं काही काम करा, की मृत्यूपश्चातही लोक आपल्याला लक्षात ठेवतील, आपल्या कार्याच्या रूपानं आपल्या स्मृती कायम जिवंत राहतील.’
पण हा आता केवळ सांगोवांगी सल्ला राहिलेला नाही, तर प्रत्यक्षातही येऊ लागला आहे. किंबहुना प्रत्यक्षात आणणं खूपच गरजेचं झालं आहे.
मृत्यूनंतर आपल्या अवयवांचं दान करून आपल्या केवळ स्मृतीच नव्हे, तर प्रत्यक्षातही जिवंत राहण्याची अनोखी संधी विज्ञान-तंत्रज्ञानानं आपल्याला दिली आहे. एवढंच नव्हे, आणखी इतरही काही जणांना जीवदान देऊन लोकोत्तर होण्याचा हा जीवनदायी प्रयोग आहे. हृदय, यकृत, डोळे, त्वचा, फुफ्फुसं, हाडे. असे आपले अनेक अवयव आपण दान करू शकतो आणि ‘अमरत्वाचा’ हा पट्टा एकाकडून दुस:याकडे हस्तांतरित करू शकतो. तसं होऊ लागलं आहे.
त्यासाठी पाहिजे मात्र केवळ इच्छाशक्ती. आपली स्वत:ची आणि त्याहीपेक्षा आपल्या जवळच्या नातेवाइकांची. त्यांनी जर त्वरित निर्णय घेऊन देहदान आणि अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण केली तर जीवन-मृत्यूच्या वाटेवरील लक्षावधी नागरिकांच्या आयुष्यात पुन्हा जीवनाची पालवी फुटू शकते. या कार्यात अगदी अशिक्षित, खेडूत माणसंही आता सजगतेनं सहभागी होताहेत ही त्यातील आशेची गोष्ट. अलीकडे ‘ग्रीन कॉरिडॉर’च्या माध्यमातून अत्यंत कमी कालावधीत अवयवांची वाहतूक करून रुग्णांना जीवनदान देण्याच्या कपोलकल्पित वाटू शकतील अशा अनेक घटनाही घडल्या आहेत.
कायद्यानंही ही प्रक्रिया आता सोपी केली आहे. नागपूरच्या अधिवेशनात 18 डिसेंबर 2क्15 रोजी मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यातील सुधारणा राज्य सरकारने स्वीकारल्या आहेत़ मानवी अवयव प्रतिरोपण कायद्यात अनुभवाअंती आलेल्या अडीअडचणी दूर करण्यासाठी केंद्र शासनाने त्यात सुधारणा करून सुधारित कायदा 2क्11 मध्ये मंजूर केला होता. तो सुधारित कायदा जसाच्या तसा राज्यामध्ये लागू करण्याबाबत ठराव आणि या कायद्यामध्ये काही तरतुदींचा समावेश भविष्यात करण्याचा शासकीय ठराव वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत मांडला आणि हा ठराव बहुमताने संमत करण्यात आला. त्याचेही सकारात्मक परिणाम दिसत आहेत़
मात्र अवयवदानाची केवळ इच्छा असून उपयोग नाही. त्यासंदर्भातील महत्त्वाच्या बाबीही आपल्याला माहीत हव्यात.
जिवंतपणी देता येणारे अवयव
मूत्रपिंड : सर्वात जास्त वेळा आरोपण केला जाणारा हा अवयव. यामध्ये अवयवदात्याचे (देणा:याचे) एक मूत्रपिंड त्याच्या शरीरापासून अलग करून दोन्ही मूत्रपिंडे निकामी झालेल्या रुग्ण व्यक्तीस बसवले जाते.
यकृत : यकृताच्या आजारामुळे ज्यांचे यकृत निकामी झालेले असते, अशा व्यक्तीला सुदृढ व्यक्तीच्या यकृताचा एक तुकडा बसवला जातो. यामध्ये अवयवदात्याचे यकृत नव्याने तयार होऊन उत्तम कार्य करीत राहते. त्याला त्रस होत नाही आणि रुग्णामध्ये यकृताच्या निरोगी पेशी तयार होऊन त्याच्या यकृताचे काम सुधारत राहते.
फुफ्फुस : दोन्ही फुफ्फुसे निकामी झालेल्या रुग्णाला सुदृढ आणि निरोगी व्यक्ती आपले एक फुफ्फुस देऊ शकते.
लहान आतडे- आतडय़ाचा एक भाग ज्याचे लहान आतडे खराब झाले आहे अशा रुग्णाला देता येतो.
स्वादुपिंड : निरोगी आणि सुदृढ व्यक्तीच्या स्वादुपिंडाचा एक तुकडा स्वादुपिंड पूर्ण निकामी झालेल्या व्यक्तीला देऊन त्याचे प्राण वाचवता येतात.
अवयव दान करण्याची पद्धत
ज्या रुग्णाचा मेंदू काही आजाराने अथवा अपघाताने निकामी होतो अशा व्यक्तीचाच अवयव दान करण्यासाठी अवयवदाता म्हणून उपयोग होतो. अशा व्यक्तीस सुसज्ज इस्पितळातील आय.सी.यू.मध्ये दाखल करून त्याच्या तब्येतीची संपूर्ण काळजी घेतली जाते. त्या व्यक्तीच्या नातेवाइकांची कायदेशीरपणो न्यायालयीन लेखी संमती त्वरित घेतली जाते.
त्याच वेळेस अवयवदानासंबंधी अधिकृत संस्थेला इस्पितळातर्फे अवयवदानाबाबत कळवले जाते.
ज्या अवयवांचा वापर होणार आहे, अशा अवयवांच्या सुदृढ आणि निरोगीपणाच्या अनेक चाचण्या त्वरित केल्या जातात. तसेच मृत रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवले जाते, त्याला आवश्यक ते सलाईन आणि औषधे शिरेवाटे दिली जातात.
अवयवदान संस्थेतर्फे ज्यांना हे अवयव बसवायचे आहेत, अशा रुग्णांना त्वरित कळवले जाते. या रुग्णांच्या शरीरामार्फत हे अवयव स्वीकारले जातील का, याची तपासणी केली जाते. इस्पितळातील डॉक्टर्स शस्त्रक्रियेची तयारी करून, अशाप्रकारे शस्त्रक्रिया करणा:या तज्ज्ञ व मान्यताप्रत शल्यविशारदांच्या गटाला (सर्जिकल टीमला) पाचारण करतात.
अवयवदात्याला शल्यगृहात आणून त्याचे दान करण्याचे अवयव शस्त्रक्रियेयोगे बाहेर काढले जातात. नंतर त्या अवयवातील पेशींना आणि रक्तवाहिन्यांना वेगवेगळे विशेष रासायनिक आणि औषधी द्राव आणि बर्फाच्या साह्याने पुनरुज्जीवित केले जाते.
ज्या रुग्णांना हे अवयव बसवायचे आहेत त्यांना शस्त्रक्रियेद्वारे ते ताबडतोब बसवले जातात. मृत अवयवदात्याचा देह सन्मानपूर्वक नातेवाइकांच्या ताब्यात दिला जातो.
अवयवदानासाठी रुग्णालये व संस्था
1) नॅशनल ऑर्गन अॅण्ड टिश्यू ट्रान्सप्लांट (एनओटीटीओ) ही संस्था भारत सरकारच्या आरोग्यसेवा महासंचालनालयाच्या तसेच आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रलयाच्या अधिपत्याखाली काम करते. अवयवदानासंबंधी होणारे गैरव्यवहार टाळण्यासाठी याबाबतीत काम करणा:या संस्थांना एनओटीटीओची मान्यता घ्यावी लागते.
2) इंडियन सोसायटी ऑफ ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ही संस्था भारतातील अवयवदानाबाबत कार्य करणारी मान्यताप्रत सरकारी संस्था आहे. भारत सरकारच्या ‘मानवी अवयवदान कायदा 1994’च्या अनुषंगाने, या संस्थेद्वारे सर्व अवयवदानासंबंधी आकडेवारी आणि माहिती जमा केला जाते आणि त्याचे नियंत्रण केले जाते.
3) महाराष्ट्रातील अवयवदानासंबंधात प्रादेशिक अवयव आरोपण संस्था के.ई.एम. इस्पितळ, मुंबई येथे आहे.
4) अवयवदानासंदर्भात महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेले विभागीय अवयवदान समन्वय संस्थेचे (झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन कमिटी) कार्यालय, के. ई. एम. इस्पितळाकरिता, सरदार मुदलियार रस्ता, 489, रास्ता पेठ, पुणो- 411क्11 येथे आहे.
(फोन : क्2क्-66क्37363)
(इमेल : : ztccpune@gmail.com93ूूस्र4ल्लीॅें्र’.ूे)
संस्थेचे हे रजिस्टर्ड कार्यालय आह़े या संस्थेच्या कार्यक्षेत्रतील पुणोसह कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नगर, सातारा, सांगली, धुळे आदि जिल्ह्यांतील 28 मल्टिस्पेश्ॉलिटी हॉस्पिटल्स या कार्यालयाला संलगA आहेत़
याव्यतिरिक्त नागपूर आणि औरंगाबाद येथेही झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन कमिटी (ङोडटीसीसी)ची समन्वय केंद्रे आहेत़ डॉ़ चारुलता बावनकुळे या नागपूरच्या झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन कमिटी (ङोडटीसीसी)च्या सहसचिव आहेत़ (स्र‘52‘4’ी8ंँ.ूे) औरंगाबादचे केंद्र अद्याप कार्यान्वित होणो बाकी आहे.
अवयवदानासाठी मल्टिस्पेश्ॉलिटी हॉस्पिटल्सची गरज असते. मात्र, देहदान करण्याची व्यवस्था वैद्यकीय महाविद्यालयाशी संलगA असलेल्या जिल्हा रुग्णालयात आह़े त्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज भरणो आवश्यक आह़े शिवाय जवळच्या नातेवाइकांची संमती गरजेची असत़े मरणोत्तर नेत्रदान करण्याची व्यवस्था जिल्हा रुग्णालय आणि मान्यताप्राप्त नेत्रपेढींमध्ये असत़े त्यासाठी नेत्रदात्याच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी लवकरात लवकर नेत्रपेढीशी संपर्क करणो आवश्यक आह़े
5) झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर, मुंबई - अवयवदानाच्या बाबतीत अवयवदाता आणि त्या अवयवांचा लाभार्थी यांचा समन्वय साधणारी विभागीय अवयवदान समन्वय केंद्र ही महाराष्ट्र सरकारच्या 2क्क्1 च्या कायद्यान्वये बनलेली पंजीकृत संस्था आहे. या संस्थेमार्फत ज्यांना अवयवदानाची आवश्यकता आहे अशा रुग्णांची पूर्ण खातरजमा करून एक यादी बनवली जाते. तसेच ज्यांचे नातेवाईक आपल्या ब्रेनडेथ झालेल्या मृत व्यक्तीचे अवयवदान करू इच्छितात, अशा वेगवेगळ्या इस्पितळातील मृतांची यादीदेखील त्या इस्पितळाच्या सहकार्याने तयार ठेवते. जेव्हा आवश्यक असेल त्यावेळेस त्या अवयवरोपणाची शस्त्रक्रिया या समितीच्या देखरेखीखाली मान्यताप्राप्त इस्पितळामध्ये कायदेशीरपणो केली जाते. जेव्हा एखादी जिवंत व्यक्ती आपले मूत्रपिंड अगर एखादा अवयव रुग्णाला देऊ इच्छिते, तेव्हा त्याबाबतसुद्धा पूर्ण शहानिशा करून ती शस्त्रक्रिया करण्यासाठी ही समिती पुढाकार घेते. अवयवदानाबद्दल लोकजागृती आणि विविध कार्यक्रमदेखील या संस्थेमार्फत केले जातात. या संस्थेशी मुंबईतील 32 इस्पितळे संलग्न आहेत़ याशिवाय देशपातळीवर काम करणा:या सात स्वयंसेवी संस्थाही संलग्न आहेत.
संस्थेचा पत्ता : एल. टी. एम. जी. हॉस्पिटल,
नवी कॉलेज बिल्डिंग, पहिला मजला,
खोली क्रमांक 29/ए, सायन पश्चिम,
मुंबई - 400022.
करमाळ्यातील ‘आधुनिक सावित्री’
अवयवदानाचे महत्त्व ग्रामीण भागातील लोकांना कळले असून, सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील सात महिलांनी पतीला किडनी देऊन त्यांचे प्राण वाचविले आहेत़
एवढेच नव्हे, ग्रामीण भागातील या महिलांनी आपल्या कृतीतून अवयवदानाचा वस्तुपाठही घालून दिला आह़े करमाळा शहरातील अशोकलाल बोरा, संजयकुमार देवी, अशोक क्षीरसागर (आता दिवंगत), दशरथ कणसे, अनिल कणसे, अजित मसलेकर व किरण सूर्यपुजारी या सात जणांना वेगवेगळ्या कारणांमुळे किडनीचा आजार जडला होता. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये या सातही जणांवर किडनीरोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली होती.ग्रामीण भागातील ही सजगता अवयवदानाची चळवळ पुढे नेते आहे.
लाखोंना मिळू शकते जीवदान.
दोन वर्षापासून मोहन फाउंडेशनतर्फे देशपातळीवर अवयवदानाविषयी मोफत हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून, सध्या मराठीसह सात भाषांमध्ये माहिती देण्यात येते. काही दिवसांपूर्वी नागपूर येथे केंद्र सुरू करण्यात आले आहे. अवयवदानाविषयीची ही हेल्पलाइन मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, इंग्रजी अशा भाषांमध्ये उपलब्ध आहे.
प्रत्यारोपणाचा कालावधी
डोळे काही महिने जतन केले जाऊ शकतात.
हाडे आणि त्वचा कितीही काळार्पयत जतन केली जाऊ शकते.
सहा तास फुफ्फुस जतन केले जाऊ शकते.
48 तास किडनी जतन केली जाऊ शकते.
‘मृत्यूनंतरची’ आठ रूपं!
आपल्या स्वत:च्या किंवा प्रियजनांच्या मृत्यूनंतर देता येण्यासारखे अवयव दान देऊन आपण तब्बल आठ व्यक्तींना जीवनदान देऊ शकतो.
.हे सारे जगू शकतात!
भारतात दरवर्षी पाच लाख रुग्ण अवयव न मिळाल्याने मृत्युमुखी पडतात. त्यामधील दोन लाख लोक यकृताच्या आजाराने, तर पन्नास हजार रुग्ण हृदयाच्या विकाराने मरण पावतात. दरवर्षी दीड लाख रुग्णांना मूत्रपिंडाची गरज असते, पण त्यातील फक्तपाच हजार रुग्णांचीच निकड भागते. आज दहा लाख अंध रुग्ण नेत्रदानाच्या प्रतीक्षेत आहेत. सव्वा अब्ज लोकसंख्या असलेल्या या देशात आज वर्षाकाठी फक्त जास्तीत जास्त एक हजार मृतांचे अवयव दान होते. यातही बहुसंख्येने असलेले नेत्रदाते वगळता इतर बाबतीत ही संख्या अगदीच तोकडी आहे. जगातल्या इतर देशांच्या तुलनेत आणि आपल्या देशातील गरजेच्या मानाने आपण खूपच मागे आहोत. दर दहा लाख नागरिकांच्या मागे आपल्या देशात फक्त क़्क्क्8 जण अवयव दान करतात, तर स्पेन, सिंगापूर, बेल्जियम अशा देशांत हा दर दहा लाखांना 2क् ते 4क् एवढा आहे. मोहन फाउंडेशन (चेन्नई), शतायू फाउंडेशन (अहमदाबाद आणि बडोदा) या संस्थादेखील अवयवदानाबाबत सामाजिक प्रबोधन, अवयवदान करणा:या व्यक्तींची नोंदणी इत्यादि गोष्टी करतात.
मोहन फाऊंडेशन,
मोफत हेल्पलाइन क्र. : 18001037100
अवयवदानातील अडचणी
कुठलाही रुग्ण मयत झाल्यानंतर, त्याचे शोकाकुल नातेवाईक अवयवदानाचे महत्त्व समजून घेण्याच्या मन:स्थितीत नसतात. त्यामुळे त्यावेळच्या अवयवदानाच्या सूचनांना ते विरोध करतात.
मनुष्य मृत झाल्यानंतर त्याचे अवयव काढणो म्हणजे त्याच्या शरीराची विटंबना करणो असा एक बहुसंख्य लोकांचा समज असतो. याच कारणामुळे कित्येकदा लोक उत्तरीय शवचिकित्सा (पोस्टमार्टेम) करण्यासही नकार देतात.
मृत व्यक्तीच्या अवयवदानाबद्दल आपल्या देशातील 1994 चा कायदा अतिशय कडक आहे. ऑगस्ट 2क्11 मध्ये त्यात काही बदल करून तो थोडा शिथिल करण्यात आला.
अवैध अवयवदान आणि ‘मूत्रपिंड तस्करी’च्या अनेक घटना घडल्यामुळे नागरिकांच्या मनात अवयवदानाबद्दल अनेक गैरसमज प्रचलित आहेत.
अवयवदानाबद्दल जनजागृतीच्या मोहिमा मोठय़ा प्रमाणावर हाती घेतल्या जात नाहीत.
(लेखक लोकमतच्या सोलापूर आवृत्तीत उपमुख्य उपसंपादक आहेत.)
channavir@gmail.com
डॉ. रवि वानखेडे
(संचालक, मोहन फाउंडेशन, नागपूर केंद्र; सदस्य, विभागीय प्रतिरोपण समन्वय केंद्र, नागपूर.)
डॉ़ अविनाश भोंडवे
(इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणो शाखेचे माजी अध्यक्ष व अवयवदान चळवळीतले कार्यकर्ते.)
आरती गोखले
(समन्वयक, विभागीय प्रतिरोपण समन्वय केंद्र,
पुणो.)
डॉ़ राजाराम पोवार
(अधिष्ठाता, डॉ़ वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर.)