शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
2
मराठी सिंधी म्हणजे वडापाव- दाल पकवान एकत्र; उल्हासनगर शहर विकासासाठी निधी देणार - एकनाथ शिंदे
3
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
4
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
5
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
6
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
7
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
8
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
9
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
10
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
11
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
12
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
13
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
14
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
15
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
16
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
18
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
19
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
20
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
Daily Top 2Weekly Top 5

नाटकवाल्यांच्या कविता..  उत्तरार्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 06:05 IST

राजीव नाईक, रवींद्र लाखे आणि माया पंडित या अस्सल नाटकवाल्यांच्या कवितांविषयी. 

ठळक मुद्देराजीव नाईक, रवींद्र लाखे आणि माया पंडित हे ज्या काळाचे प्रतिनिधी आहेत, त्या काळाचे अत्यंत जबाबदार दर्शन त्यांच्या नुकत्याच  प्रसिद्ध झालेल्या कवितासंग्रहांतून दिसते. 

- अतुल पेठे

चांगल्या नाटकात जगण्याची जी क्षणिक अद्भुतता दिसते, ती तर राजीव नाईक यांच्या कवितेत दिसतेच, पण त्यांच्या कवितेत नादमय भाषेचेही भान दिसते. त्याविषयी ते कसे व्यक्त होतात पाहा.शब्दांचे अर्थ गळून पडताततेव्हा आवाज शिल्लक उरतात.नाद वेगळे :ते असतात अर्थाच्याही आधीस्वयंभू, आपण आपलेच.ते हुंकारात असतात, हुंदक्यात असतात, हंबरड्यात असतातकर्कश्य, किरट्याकिनर्‍या किंकाळीत असतातगंभीर, गीर्रेबाज गाजत असतातचपळचंचल पावलांत असतातकधी अलवार बोटांत असतातअन् कधी कधी शप्पथ तरएखाद्या डोळ्यातही असतात किंवा प्रत्येक ध्वनी म्हणजे वाचाच होय असं मानलं की नादानादातून ऐकू येऊ लागतात अर्थ..अशा कविता वाचताना कधी आपण अंतर्मुख होतो, बहिर्मुख बनतो तर कधी व्याकुळतो. या कविता इथल्या अवतालाशी आणि भवतालाशी ममत्वाने जोडलेल्या आहेत. विचार आणि भावना यांचा सुयोग्य मिलाफ असलेल्या या कविता वाचताना आयुष्याचा पट विस्तारतो. हा पट आयुष्याचे समग्र भान देतो. आता आपण रवींद्र दामोदर लाखे यांच्या ‘अवस्थांतराच्या कविता’ आणि ‘संपर्क क्षेत्नाच्या बाहेर’ या दोन काव्यसंग्रहाविषयी एकत्न बोलू. या कविता परकेपणाच्या, पोरकेपणाच्या, विसंवादाच्या, आत्मशोधाच्या, गुंत्याच्या, देहाच्या, मन बिघडण्याच्या, आपलेपणाच्या, नैराश्याच्या, उद्वेगाच्या, गर्तेच्या, स्खलनाच्या, भीतीच्या, अपुरेपणाच्या, अलिप्ततेच्या, जगण्या-मरण्याच्या, साशंकतेच्या,  एकुटवाणेपणाच्या आणि सूक्ष्मपणाच्या आहेत. या सार्‍या कवितांत व्यक्तीची प्राणांतिक वेदना आहे. ‘ठळक’ या कवितेत ही अवस्था अशी येते :जग पुसट होत चाललंय  ह्या भयानं थरकाप होतोय माझा.ह्या भयाची हेडलाइन होईल का  एखाद्या वर्तमानपत्नाची?तर अशा आजूबाजूच्या पसरलेल्या भयावह भवतालात मी कोण? हा चिरंतन प्रश्न करणार्‍या लाखेंच्या या आत्मभानाच्या कविता लखलखीत आहेत. वानगीदाखल हा छोटे तुकडे पहा -मी माझं घर  लॉक करून जातो.  परततो.घराची बेल वाजवतो.  दार उघडण्याची वाट पहातो.तेव्हा मी कुठे असतो?.किंवामाझ्या जागी  मी रहावे.माझ्या जागी  मला जाग यावी.किंवामी वल्हवतोय  नसलेलं पाणीन पुढे सरकत  ना मागे.रवींद्र लाखे हे जसा मी कोण, हा प्रश्न विचारतात तसेच अस्वस्थ होऊन काठावरच उभय का हे सभोवताल? असे घुसमटून टाकणारे प्रश्न उभे करतात. आजूबाजूचं लबाड, हिंसक आणि अनैतिक भ्रष्टाचारी जग त्यांना अस्वस्थ करते. नाट्यछटाकार दिवाकरांची आठवण यावी, अशी त्यांची नाट्य (छटा)कविता देव्हारा मुळातूनच वाचावी अशी आहे. देव देव्हारा शोधत हिंडतोय कुठं कुठं. प्रत्येक देव्हार्‍यात मांजरींनी ठाण मांडलंय. हे वास्तव वाचताना काटा आणते. अशाच ध्यान, र्शाद्ध या कविता नाट्यछटेच्या अंगाने जाणार्‍या आहेत. जगण्यातील विरोधाभास आणि षड्रिपूंचे दर्शन रूपकाद्वारे उभे करण्याचे सार्मथ्य त्यात आहे. रवींद्र लाखेंच्या अशा कविता वाचताना आपल्या आजूबाजूच्या चिकटलेल्या सृष्टीचं दर्शन होतं. आपल्याला न जाणवलेल्या असंख्य गोष्टी त्यांच्या कवितेत सहज शब्दरूप होऊन येतात.आता मी माया पंडितांच्या तल्खलीचा वेध घेण्याचा प्रयत्न करतो. या तल्खलीत आत-बाहेर जळणारा सोलीव वेदनांचा कल्लोळ आहे, दु:खाचे गहिवर आहेत आणि शोकमग्न व्याकुळता आहे. या भव्य नाटकाची नायिका आहे बाई !अशी तिन्हीसांजेची आलीस बाई  या कालिंदीच्या काठीसार्‍याच येतात इथे  कुणाची गोष्ट मोठी तर कोणाची खोटीआलीच आहेस तर ठेव उतरवूनआणवलेले चंद्रबळ, हृदयातले सारे सलहरेक हाडातली चरचरती कळकिंवाउपेक्षेचे सल गाड समंजस ओळींमधून, समांतर हो.मान झुकवून सामोरी जा दु:खाला, होऊन पारदर्शी संपूर्ण सोलीव.पेरून घे अंगभर, अधीन हो दु:खाच्या.अशा कवितांतून बाईच्या दु:खाच्या अनेक पातळीवरील उसवणार्‍या अनेक परींच्या वेदना आहेत. जे वाट्याला पडेल ते बाई गच्च पांघरूण बसते अशा पराकोटीच्या भावनेने टाके उसवून उघडे पडते तिच्या जगण्याचे विरूप सणंग असे कवितेतली बाई जगू पाहते. या बाईचे दु:ख गहिरे आहे. ही बाई गावातली जशी आहे तशी शहरातलीही आहे. ती कुठल्याही जातीपाती आणि धर्मातली आहे. या बाईचा लढा फक्त पुरुषाशी नाही तर एकूण जगण्याशीच आहे. या अस्वस्थतेतून ती बंड करत आहे. कोणता मुखवटा घालायचाय आहे मला?कोणता घातलेला मी आवडेल त्यांना?पर्यायांच्या कोणत्या पडद्यात लपावेआणि कोणत्या फूटपट्टीने मोजावेतकमतरतांचे अंगभूत व्यास? वर्तुळातल्याकोणत्या बंद दारापुढे रहावे उभेकोणत्या कडी-कोयंड्यांचा घ्यावा  उघडायला ध्यास?किंवाधमन्या मांस रक्तपेशी नसाशिरात पक्केजात मारी बिन दोर्‍याचे बेमालूम टाकेसंस्कृतींच्या चिरगुटांना जात मारी गाठीगळ्याभवती फास टाकते वर्णाची मिजासी.माया पंडित यांची ही कविता अतिशय उत्कट आहे. तल्खली म्हणजे होरपळून टाकणारा दाह आहे. त्याचे चटके आपल्याला बसत असताना आपल्याला बाई उमगली का हा प्रश्न छळतो आणि आपण एकुणातच  बाईमाणसावर घनघोर अन्याय केला आहे याची कबुली द्यावी लागते.तर असे हे तीन नाटकवाले कवी आणि त्यांच्या अस्सल मराठीपणातून उगवलेल्या सशक्त कविता !                                          कविताबिविता - मौज प्रकाशन, तल्खली - शब्द प्रकाशनसंपर्क क्षेत्नाच्या बाहेर,  अवस्थांतराच्या कविता -  कॉपर कॉइन प्रकाशनatulpethe50@gmail.com(लेखक प्रयोगशील रंगकर्मी आहेत.)