शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
3
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
4
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
5
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
6
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
7
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
8
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
9
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
10
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
11
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
12
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
13
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
14
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
15
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
16
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
17
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
18
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
19
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
20
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या आरोग्याची चिंताजनक स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 06:20 IST

डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा देशव्यापी अभ्यास अहवालाने दाखवलेलं आदिवासींच्या आरोग्याचं चित्रं

-अश्विनी कुलकर्णी

समजा, तुमच्या अंगात गेले काही दिवस ताप आहे. तुम्ही डॉक्टरांकडे जाता. ते विचारतात,  ‘कधीपासून येतोय ताप? किती आहे?’

तुम्हाला यातले काहीच सांगता येत नाही. कारण ताप मोजण्यासाठी आवश्यक तो थर्मामीटरच तुमच्याजवळ नाही.

- तर तुमचे रोगनिदान डॉक्टर कसे करतील? ते कितपत (आणि कसे) अचूक असेल?

- भारताच्या आदिवासी भागातील आरोग्याच्या प्रश्नांची स्थिती नेमकी ही अशीच आहे.

सगळे अंदाजाने, अनमानधपक्याने चाललेले. नेमके मापन नाही. पुरेशा नोंदी नाहीत. संदर्भ नाहीत.बालमृत्यूसारखी अरिष्टे ओढवली की आगीच्या बंबाने भडका विझवायला धावावे, तशा यंत्रणा जातात आणि तात्पुरते उपचार होतात. 

भारतातील इतर समूहांपेक्षा आदिवासी समूहांच्या आरोग्याचे प्रश्न बिकट आहेत, याचा अंदाज सर्वांनाच आहे; पण नेमकेपणाने माहीत नाही. आरोग्यमापनाचीे जगन्मान्य परिमाणे वापरून जमवलेली आकडेवारी, आजारांचे प्रकार, त्यांचे प्रमाण  अशा अत्यंत आवश्यक संदर्भांचा अभ्यास करून नुकताच प्रसिद्ध झालेला  The Expert Committee on Tribal Health हा अहवाल म्हणूनच अत्यंत महत्त्वाचा आहे. असा अभ्यास पहिल्यांदाच होत आहे, हेही विशेष. 

साधारण पाच वर्षांपूर्वी आदिवासी मंत्नालय व महिला-बाल कल्याण मंत्रालय या दोन्हींच्या पुढाकाराने ही तज्ज्ञ समिती नेमण्यात आली. त्याचे अध्यक्ष आहेत डॉ. अभय बंग. 

देशातील आदिवासी समूहांच्या आरोग्यस्थितीचा अभ्यास करताना या समितीला जाणवलेली सर्वात मोठी आणि गंभीर अडचण अशी की आदिवासींच्या संदर्भातील आकडेवारी वेगळी गोळा करणे, त्याचे जतन करणे, विश्लेषण करणे हेच मुळात आजवर झालेले नाही. आदिवासी मंत्नालय स्थापन होऊन दोन दशके झाली. आरोग्य मंत्रालय तर त्याही आधीचे तरीही ही स्वतंत्न आकडेवारी उपलब्ध नाही. सध्या आहेत त्या ग्रामीण भागातील सेवा आणि आदिवासी मंत्नालयाच्या आकडेवारीतून अत्यावश्यक ते संदर्भ शोधून ते जुळवण्याचा आणि त्या विश्लेषणावरून निष्कर्षांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या तज्ज्ञ समितीने हाती घेतला. निधी नेमका कशावर किती खर्च होतो हेही कळणे कठीणच. आदिवासी समूहातील आरोग्याची परिस्थिती नेमकेपणाने समजण्यातील ही अडथळ्याची शर्यत पार करत एक मोठे आव्हान समितीने पेलले आहे हे लक्षात येते.

या अहवालातली एक दिलासादायक बाब म्हणजे आदिवासी समूहामधील स्त्री-पुरुष प्रमाण! 1000 पुरुषांमागे 990 महिला आदिवासी समाजात आहेत. इतर समूहांमध्ये हे प्रमाण 933 इतकेच आहे. तसेच मूल जन्मल्याबरोबर स्तनपान करण्याचे प्रमाणही आदिवासींमध्ये सर्वाधिक आहे. या जमेच्या बाजू. 

- पण अशा काही मोजक्या बाबी वगळता इतर आकडेवारी निराशाजनक आहे. 

 

या पार्श्वभूमीवर आदिवासी भागातील आरोग्यसेवा यंत्रणेतील मनुष्यबळाची कमतरता पाहून मन विषण्ण होते. एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येच्या देशात डॉक्टर, विशेषज्ञ यांची कमतरता आदिवासी भागातील दवाखान्यांत सदैव असते. पूर्णवेळ सेवा उपलब्ध आहे ती ‘आशा’ची! इतर समाजघटकात 72 टक्के बालकांपर्यंत लसीकरण पोहोचते आहे तर आदिवासी भागातील फक्त 56 टक्के बालकांना याचा लाभ मिळतो.

ही सर्व विदारक परिस्थिती मांडणार्‍या या अहवालात  परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारत आहे हेही वेळोवेळी नमूद केलेले आहे. या सुधारणांना वेग आणि दिशा मिळावी म्हणून काही नेमक्या उपाययोजनाही हा अहवाल सुचवतो.

1. आदिवासी विखुरलेल्या छोट्या-छोट्या वस्त्यांमध्ये राहतात. या भागात दळणवळणाची साधने, रस्ते, वीज यांची पुरेशी उपलब्धता करणे.

2. लोकसंख्येनुसार आरोग्यसेवेतील मनुष्यबळ ठरवण्याचे निकष आदिवासींपुरते बदलणे.

3.  गावागावातून आरोग्यमित्र , आरोग्यदूत नेमणे.

4. गावातील युवक-युवतींना प्राथमिक/प्रतिबंधात्मक उपचारांसाठीचे प्रशिक्षण देणे.

5.   भाषा समजणे, चालीरिती माहीत असणे, हवामान माहीत असणे, लोकांचा त्यांच्यावर विश्वास असणे हे आरोग्यसेवा गावातच असण्याचे फायदे आहेत. 

6. निदान व औषध-उपचार याबरोबर आरोग्य संबंधातील समज वाढवणे, नवीन उपकारक सवयी आत्मसात करण्यास मदत करणे हेही महत्त्वाचे आहे. 

आदिवासी युवक-युवती आरोग्य शाखेचे विद्यार्थी होऊन, आरोग्यसेवेतील विविध जबाबदा-या घ्यायला लागले तर मनुष्यबळाचा कमतरतेवर एक शाश्वत उपाय असू शकतो. ते आदिवासी भागात येऊन आत्मीयतेने काम करतील म्हणून त्यांना या विद्यालयातून शिक्षण घेण्यास विशेष प्रोत्साहन मिळावे असेही सुचवलेले आहे.

आरोग्यसेवा आदिवासी भागात पोहोचवण्यासाठी यंत्रणा काय असावी, त्यात कोणकोणत्या प्रकारचे मनुष्यबळ असावे, त्यांच्या जबाबदा-या काय असाव्या व त्यासाठीचा निधी कसा उपलब्ध आहे, हे या अहवालात सविस्तर मांडले आहे. 

मुळात आदिवासी भागातील आरोग्यासंबंधीची आकडेवारी वारंवार गोळा करून त्याच्या आधारे निर्णय घेण्याची व्यवस्था हवी, असे हा अहवाल म्हणतो.. म्हणजे आधी थर्मामीटर हवा!

आदिवासी आरोग्याचे प्रश्न स्थानिक, तत्कालिक उपाययोजनेतून सुटणार नाहीत, तर त्यासाठी समग्र बदल आवश्यक आहे. तो बदल का हवा, कसा व कोठे करता येईल हे या अहवालातून स्पष्ट होते. आता पुढची लढाई आहे त्यातील उपाययोजना प्रत्यक्षात आणण्याची. 

आदिवासींच्या आरोग्याची ‘स्थिती’* 15-19 वयोगटातील 50 टक्के युवतींचे वजन कमी

* 15-49 वयोगटातील 65 टक्के महिलांना अनिमिया

* अन्य समूहाच्या तुलनेत चढा बालमृत्युदर 

* जन्माच्या वेळेचे बाळाचे वजन 2.5 किलोपेक्षा कमी असण्याचे प्रमाण सर्वाधिक* गेल्या वीस वर्षांत आदिवासी आहारातील कोबरेहायड्रेट, प्रोटीन, जीवनसत्त्वांच्या प्रमाणाला गळती* फक्त 25 टक्के गरोदर आणि स्तनदा महिलांना पुरेसा व पौष्टिक आहार * बालकांमध्ये कमी वजन, वाढ खुंटणे आणि अकाली मृत्यू हे कुपोषणाचे परिणाम सर्वाधिक* मलेरिया, क्षयरोग, कुष्ठरोग यासारख्या आजारांचे प्रमाण अधिक. मलेरियामुळे मृत्यू पावणा-या रुग्णांमधले निम्मे रुग्ण आदिवासी * चारपैकी एका आदिवासीस उच्च रक्तदाबाचा त्नास *याच बरोबर सीकलसेल, अनिमियासारखे आदिवासी समूहातील विशेष आजार आहेतच.* व्यसन हा एक मानसिक आजार!    

(लेखिका प्रगती अभियान या स्वयंसेवी संस्थेच्या सचिव आणि आदिवासी प्रश्नांच्या अभ्यासक आहेत.)

pragati.abhiyan@gmail.com