शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 06:48 IST

चार ठिकाणी शिवसेना लढतेय स्वबळावर

मुंबई : राज्यात ७ जानेवारीला होत असलेल्या पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत राज्यातील सत्तारुढ महाविकास आघाडीत बिघाडीचेच सूर अधिक दिसत आहेत. धुळे सोडले तर कुठेही महाविकास आघाडी झालेली नाही.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची आहे पण सेना वेगळी लढत आहे. सेनेने ४४ गणांमध्ये उमेदवार दिले आहेत. अकोल्यात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत पण सेना वेगळी लढत आहे. फक्त चार गणात काँग्रेस-सेनेने एकमेकांविरुद्ध उमेदवार दिले नाहीत. अकोल्यात एकेकाळी सेनेचे मोठे प्रस्थ होते पण आज ते राहिलेले नाही. अलिकडे बाळापूरमध्ये शिवसेनेचे नितीन देशमुख आमदार झाले, त्यामुळे पक्षाला थोडे बळ मिळाले आहे. त्या शिवाय गोपिकिशन बाजोरिया हे सेनेचे विधान परिषद सदस्य आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि भाजप हे लढतीतील प्रमुख पक्ष आहेत.वाशिममध्ये सेना स्वबळावर लढत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचे जाहीर केले होते पण ५२ पैकी २८ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीने एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे केले. यवतमाळ-वाशिमच्या सेना खासदार भावना गवळी पक्षाचा किल्ला स्वतंत्रपणे लढवत आहेत. धुळे जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना अशी महाविकास आघाडी आहे. या महाविकास आघाडीने भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. बाजूच्या नंदुरबारमध्ये महाविकास आघाडी होऊ शकलेली नाही. तेथे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढत आहेत. माजी मंत्री व भाजपचे नेते आ. विजयकुमार गावित आणि काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेत गेलेले चंद्रकांत रघुवंशी निवडणुकीत आणि नंतर काय करतात याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस