युवराजांचे स्वप्न... आणि भाजपाचा टोला!

By Admin | Updated: July 1, 2016 02:40 IST2016-07-01T02:40:41+5:302016-07-01T02:40:41+5:30

मुंबईत सत्तेवर असतानाही मित्रपक्षाच्या खेळीमुळे शिवसेना युवराजांना आपले स्वप्न साकार करणे शक्य होत नव्हते़

Yuvraj's dream ... and BJP combine! | युवराजांचे स्वप्न... आणि भाजपाचा टोला!

युवराजांचे स्वप्न... आणि भाजपाचा टोला!


मुंबई : मुंबईत सत्तेवर असतानाही मित्रपक्षाच्या खेळीमुळे शिवसेना युवराजांना आपले स्वप्न साकार करणे शक्य होत नव्हते़ मात्र केंद्रीय मंत्रिमंडळानेच २४ तास दुकाने, मॉल्स, रेस्टॉरंट्स सुरू राहण्यास हिरवा कंदील मिळाला आहे़ केंद्रानेच या कायद्याला मंजुरी दिल्यामुळे या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या राज्यातील भाजपा नेत्यांचे धाबे दणाणले आहे़ मात्र रात्रीचा बाजार आणि रात्रीचा व्यापार यातील फरक केंद्राने मंजूर केलेल्या कायद्यात असल्याचा टोला हाणत भाजपाने शिवसेनेला डिवचले आहे़
शिवसेनेची सावध भूमिका
युवराजांचे स्वप्न पूर्ण होत असल्याने याबाबत आता शिवसेनेने तलवार म्यान करीत मित्रपक्षाबाबत काहीही बोलणे टाळले़ हा निर्णय स्वागतार्ह असून, युवासेनाप्रमुखांची ही संकल्पना होती, अशी प्रतिक्रिया सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी दिली़ भाजपा नेत्यांनी मात्र शिवसेनेला टोले लगावण्याची यानिमित्ताने आलेली संधी दवडलेली नाही.
रात्रीचा बाजार आणि रात्रीचा व्यापार यातील फरक या कायद्याने दाखविला असल्याचा टोला भाजपाचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी शिवसेनेला लगावला आहे़
दुष्परिणाम़़़
यामुळे नागरी सुविधांवर ताण पडेल़ पाणीपुरवठा, स्वच्छता, मलनिस्सारण, सुरक्षा अशा समस्या यामुळे निर्माण होणार आहेत़ त्यामुळे आधीच या सर्व समस्यांचा सामना करणाऱ्या पालिकेवर याचा अतिरिक्त ताण येणार आहे़ मात्र याबाबत कोणतेही नियोजन पालिकेकडे सध्या नाही़ यासंदर्भात पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले़ तर राजकीय पक्षांनी मात्र यामुळे ताण पडला तरी तो शहराच्या विकासासाठीच असेल़ यातून राज्य सरकार आणि पालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल, असा दावा शिवसेना आणि भाजपा नेत्यांनी केला आहे़

Web Title: Yuvraj's dream ... and BJP combine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.