शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

महागाईविरोधात युवासेनेचं ‘थाली बजाओ खुशियां मनाओ’ आनंदसोहळा; भाजपाला लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 15:55 IST

कोरोनाच्या काळात युवकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यात बेरोजगारीने नवा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे हेच का अच्छे दिन असा प्रश्न जनता विचारत आहे असा आरोप युवासेनेने केला आहे.

मुंबई – मागील अनेक दिवसांपासून देशभरात महागाईचा भडका उडाला आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडल्याने भाजीपाल्याचे दरही वाढले आहेत. त्यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडलं आहे. महागाईविरोधात निषेध करण्यासाठी विरोधी पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलनं करत आहेत. त्यात सत्ताधारी शिवसेनेच्या युवासेनेने महागाईविरुद्ध एल्गार पुकारला आहे.

उद्या म्हणजे ३ एप्रिलला युवासेनेचे कार्यकर्ते महागाईचा निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरत अनोखा आनंदसोहळा साजरा करणार आहेत. याबाबत युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई म्हणाले की, २०१४ आणि २०१९ मध्ये अबकी बार मोदी सरकार अशा घोषणा देत, महागाई कमी करू असं आश्वासन देऊन भाजपा सत्तेत आली. परंतु आज पेट्रोल-डिझेलनं शंभरी ओलांडली. गॅसचे दर वाढले. अत्यावश्यक वस्तूंचे दर वाढत चालले आहेत. कोरोनाच्या काळात युवकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यात बेरोजगारीने नवा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे हेच का अच्छे दिन असा प्रश्न जनता विचारत आहे असं ते म्हणाले.

तसेच याच अच्छे दिनासाठी भाजपाचं अभिनंदन करण्यासाठी युवासेनेच्या वतीने महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात ३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता थाली बजाओ निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. ज्या प्रमाणे २ वर्षापूर्वी भाजपाने थाळ्या वाजवून कोरोनाला पळवून लावलं होतं. तशाच रितीने थाळी वाजवून भाजपा महागाईला पळवून लावेल ही अपेक्षा आहे. त्यामुळे या थाळी बजाओ आंदोलनात सर्व कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घ्यावा असं आवाहन युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी केले आहे.

टॅग्स :Varun Sardesaiवरुण सरदेसाईInflationमहागाईShiv SenaशिवसेनाBJPभाजपा