शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Maharashtra Political Crisis: “अन्यथा तुम्हाला शिवसेना स्टाइलनेच उत्तर देऊ”; शहाजीबापू पाटलांना शरद कोळींचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 21:12 IST

Maharashtra Political Crisis: शहाजीबापू पाटील मातोश्रीसमोर जाऊन नाक घासत होते, याचा त्यांना आता विसर पडला आहे, या शब्दांत शरद कोळी यांनी सडकून टीका केली आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) राज्यभरातून वाढता पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेदेखील राज्यभर दौरे करत आहेत. यातच पडत्या काळात पक्षाची बाजू लावून धरणाऱ्या युवासेनेच्या एका नेत्याने शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांच्यावर टीका करत, तुम्हाला शिवसेना स्टाइलनेच उत्तर देऊ, असा इशारा दिला आहे. 

युवासेना नेते शरद कोळी यांची युवासेनेच्या राज्य विस्तारकपदी निवड झाल्यापासून, ते सातत्याने शिंदे गटातील मंत्री, आमदारांवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहेत. यातच शरद कोळी यांनी शहाजीबापू पाटील यांच्यावर बोचरी टीका केली. मात्र, ही टीका करताना शरद कोळी यांची जीभ घसरल्याचे सांगितले जात आहे. ते संत्रा पिऊन बोलताना की हातभट्टीवरील तांब्या मारून बोलतात, नेमके तेच कळत नाही, असे शरद कोळी यांनी म्हटले आहे. 

शहाजी बापू पाटील मातोश्रीसमोर जाऊन नाक घासत होते

शहाजीबापू हे त्यांच्याकडे बायकोला लुगडं घ्यायला पैसे नाहीत, असे सांगतात. एवढेच नव्हे तर हातभट्टीची दारु प्यायल्यानंतर शहाजी पाटील  त्याचं बिलही दुसऱ्याला भरायला लावतात. ते शहाजीबापू उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना काय घर बांधून देणार, असा टोला लगावत, आमदार होण्यासाठी शहाजीबापू पाटील मातोश्रीसमोर जाऊन नाक घासत होते, याचा आता त्यांना विसर पडला आहे. शहाजी पाटील यांनी वायफळ बडबड बंद करा, अन्यथा तुमच्या घरावर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा देत शरद कोळी यांनी शहाजीबापू पाटील यांच्यावर सडकून टीका केली. 

दरम्यान, पडायची प्रॅक्टिस महाराष्ट्रात माझ्याएवढी कुणाची आहे? सात आठवेळा धडाधडा पडलो होतो, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले होते. तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी सांगोल्यात येऊन लोकांची कामे करावी. त्यासाठी दोघांना बंगले भाड्याने घेऊन देतो, अशी टिप्पणी शहाजीबापू पाटील यांनी केली होती. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळSolapurसोलापूरEknath Shindeएकनाथ शिंदे