शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

"कोकणकरांच्या सहनशक्तीला सलाम"; मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे नरक यातना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 11:10 IST

गेल्या २० वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. २० वर्ष म्हणजे ४ टर्म तुम्ही निवडून देताय. बापरे, हा सहनशक्तीचा अंत आहे असं युट्यूबर जीवन कदमनं म्हटलं आहे.

मुंबई – पावसामुळे महामार्गावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असल्याचे दिसून येते. त्यात मुंबई-गोवा महामार्ग म्हणजे खड्ड्यांसाठी पर्वणी. गेल्या १७ वर्षाहून अधिक काळ या महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. परंतु अद्याप रस्ता पूर्ण झाला नाही. परंतु जो रस्ता आहे त्यावर खड्ड्यांची चाळण झाल्याचे दिसून येते. मराठी युट्यूबर जीवन कदमने या रस्त्यावरून जाताना आलेला अनुभव शेअर केला आहे.

जीवन कदम म्हणतो की, कोलाडहून मुंबईच्या दिशेने येताना रस्त्यावरील खड्यांमुळे माझी कार आपटली. त्यात टायर फुटला. रिंग बाहेर आली, व्हिल मोडली. माझ्यासह अन्य एका प्रवाशाच्या वाहनाचीही हीच अवस्था झाली. खड्ड्यांमुळे त्यांचाही टायर फुटला. मी लाईव्ह ही दृश्य दाखवतोय असं सांगत जीवनने खड्ड्यामध्ये उतरून तो किती मोठा आहे हे लोकांना दाखवले. त्यानंतर तुम्ही या लोकांना का मते देता? असा संतप्त सवालही त्याने विचारला.

त्याचसोबत गेल्या २० वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. २० वर्ष म्हणजे ४ टर्म तुम्ही निवडून देताय. बापरे, हा सहनशक्तीचा अंत आहे. कोकणकरांनो तुम्हाला हॅट्सऑफ आहेत असंही जीवन कदमनं सांगितले. जीवनचा हा व्हिडिओ मनसेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. मनसेने म्हटलंय की, आपलं कोकण स्वर्गाहून सुंदर आहे असं म्हणतो, पण कोकणात जाताना भ्रष्टासुरामुळे वाटसरुंना नरकयातना भोगाव्या लागत आहेत असं त्यांनी सांगितले. मनसेने खड्डे भ्रष्टाचाराचे अड्डे, पाहा आणि थंड बसा अशा आशयाची मोहिम सोशल मीडियावर सुरू केली आहे. त्यातून जनतेला होणाऱ्या खड्ड्यांच्या त्रासाबाबत विविध बातम्या, लेख, व्हिडिओ पोस्ट करण्यात येत आहेत.

राज ठाकरेंनी केली होती टीका

अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले होते. राज ठाकरे म्हणाले होते की, राज्यात अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेत, वाहतूक कोंडी होते. अनेक तास ताटकळत राहावे लागतात. तुम्ही कसले टोल वसूल करताय? ही मनमानी सुरू आहे त्यावर भाजपा काय बोलणार का? १७ वर्ष मुंबई-गोवा महामार्ग तयार होतोय. किती वर्ष चालणार? रस्ते बांधणीबाबत केंद्रातला मंत्री मराठी आहे आणि महाराष्ट्रातले रस्ते खराब आहेत यापेक्षा दुदैव नाही असा टोला राज यांनी लगावला होता.

 

 

टॅग्स :Potholeखड्डेMNSमनसे