शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

"कोकणकरांच्या सहनशक्तीला सलाम"; मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे नरक यातना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 11:10 IST

गेल्या २० वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. २० वर्ष म्हणजे ४ टर्म तुम्ही निवडून देताय. बापरे, हा सहनशक्तीचा अंत आहे असं युट्यूबर जीवन कदमनं म्हटलं आहे.

मुंबई – पावसामुळे महामार्गावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असल्याचे दिसून येते. त्यात मुंबई-गोवा महामार्ग म्हणजे खड्ड्यांसाठी पर्वणी. गेल्या १७ वर्षाहून अधिक काळ या महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. परंतु अद्याप रस्ता पूर्ण झाला नाही. परंतु जो रस्ता आहे त्यावर खड्ड्यांची चाळण झाल्याचे दिसून येते. मराठी युट्यूबर जीवन कदमने या रस्त्यावरून जाताना आलेला अनुभव शेअर केला आहे.

जीवन कदम म्हणतो की, कोलाडहून मुंबईच्या दिशेने येताना रस्त्यावरील खड्यांमुळे माझी कार आपटली. त्यात टायर फुटला. रिंग बाहेर आली, व्हिल मोडली. माझ्यासह अन्य एका प्रवाशाच्या वाहनाचीही हीच अवस्था झाली. खड्ड्यांमुळे त्यांचाही टायर फुटला. मी लाईव्ह ही दृश्य दाखवतोय असं सांगत जीवनने खड्ड्यामध्ये उतरून तो किती मोठा आहे हे लोकांना दाखवले. त्यानंतर तुम्ही या लोकांना का मते देता? असा संतप्त सवालही त्याने विचारला.

त्याचसोबत गेल्या २० वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. २० वर्ष म्हणजे ४ टर्म तुम्ही निवडून देताय. बापरे, हा सहनशक्तीचा अंत आहे. कोकणकरांनो तुम्हाला हॅट्सऑफ आहेत असंही जीवन कदमनं सांगितले. जीवनचा हा व्हिडिओ मनसेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. मनसेने म्हटलंय की, आपलं कोकण स्वर्गाहून सुंदर आहे असं म्हणतो, पण कोकणात जाताना भ्रष्टासुरामुळे वाटसरुंना नरकयातना भोगाव्या लागत आहेत असं त्यांनी सांगितले. मनसेने खड्डे भ्रष्टाचाराचे अड्डे, पाहा आणि थंड बसा अशा आशयाची मोहिम सोशल मीडियावर सुरू केली आहे. त्यातून जनतेला होणाऱ्या खड्ड्यांच्या त्रासाबाबत विविध बातम्या, लेख, व्हिडिओ पोस्ट करण्यात येत आहेत.

राज ठाकरेंनी केली होती टीका

अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले होते. राज ठाकरे म्हणाले होते की, राज्यात अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेत, वाहतूक कोंडी होते. अनेक तास ताटकळत राहावे लागतात. तुम्ही कसले टोल वसूल करताय? ही मनमानी सुरू आहे त्यावर भाजपा काय बोलणार का? १७ वर्ष मुंबई-गोवा महामार्ग तयार होतोय. किती वर्ष चालणार? रस्ते बांधणीबाबत केंद्रातला मंत्री मराठी आहे आणि महाराष्ट्रातले रस्ते खराब आहेत यापेक्षा दुदैव नाही असा टोला राज यांनी लगावला होता.

 

 

टॅग्स :Potholeखड्डेMNSमनसे