शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

"कोकणकरांच्या सहनशक्तीला सलाम"; मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे नरक यातना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 11:10 IST

गेल्या २० वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. २० वर्ष म्हणजे ४ टर्म तुम्ही निवडून देताय. बापरे, हा सहनशक्तीचा अंत आहे असं युट्यूबर जीवन कदमनं म्हटलं आहे.

मुंबई – पावसामुळे महामार्गावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असल्याचे दिसून येते. त्यात मुंबई-गोवा महामार्ग म्हणजे खड्ड्यांसाठी पर्वणी. गेल्या १७ वर्षाहून अधिक काळ या महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. परंतु अद्याप रस्ता पूर्ण झाला नाही. परंतु जो रस्ता आहे त्यावर खड्ड्यांची चाळण झाल्याचे दिसून येते. मराठी युट्यूबर जीवन कदमने या रस्त्यावरून जाताना आलेला अनुभव शेअर केला आहे.

जीवन कदम म्हणतो की, कोलाडहून मुंबईच्या दिशेने येताना रस्त्यावरील खड्यांमुळे माझी कार आपटली. त्यात टायर फुटला. रिंग बाहेर आली, व्हिल मोडली. माझ्यासह अन्य एका प्रवाशाच्या वाहनाचीही हीच अवस्था झाली. खड्ड्यांमुळे त्यांचाही टायर फुटला. मी लाईव्ह ही दृश्य दाखवतोय असं सांगत जीवनने खड्ड्यामध्ये उतरून तो किती मोठा आहे हे लोकांना दाखवले. त्यानंतर तुम्ही या लोकांना का मते देता? असा संतप्त सवालही त्याने विचारला.

त्याचसोबत गेल्या २० वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. २० वर्ष म्हणजे ४ टर्म तुम्ही निवडून देताय. बापरे, हा सहनशक्तीचा अंत आहे. कोकणकरांनो तुम्हाला हॅट्सऑफ आहेत असंही जीवन कदमनं सांगितले. जीवनचा हा व्हिडिओ मनसेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. मनसेने म्हटलंय की, आपलं कोकण स्वर्गाहून सुंदर आहे असं म्हणतो, पण कोकणात जाताना भ्रष्टासुरामुळे वाटसरुंना नरकयातना भोगाव्या लागत आहेत असं त्यांनी सांगितले. मनसेने खड्डे भ्रष्टाचाराचे अड्डे, पाहा आणि थंड बसा अशा आशयाची मोहिम सोशल मीडियावर सुरू केली आहे. त्यातून जनतेला होणाऱ्या खड्ड्यांच्या त्रासाबाबत विविध बातम्या, लेख, व्हिडिओ पोस्ट करण्यात येत आहेत.

राज ठाकरेंनी केली होती टीका

अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले होते. राज ठाकरे म्हणाले होते की, राज्यात अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेत, वाहतूक कोंडी होते. अनेक तास ताटकळत राहावे लागतात. तुम्ही कसले टोल वसूल करताय? ही मनमानी सुरू आहे त्यावर भाजपा काय बोलणार का? १७ वर्ष मुंबई-गोवा महामार्ग तयार होतोय. किती वर्ष चालणार? रस्ते बांधणीबाबत केंद्रातला मंत्री मराठी आहे आणि महाराष्ट्रातले रस्ते खराब आहेत यापेक्षा दुदैव नाही असा टोला राज यांनी लगावला होता.

 

 

टॅग्स :Potholeखड्डेMNSमनसे