शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याचा धाक नको तर आदर हवा; तरुणाई सांगते वाहतुकीच्या नियमांचं पालन करा

By सायली शिर्के | Updated: September 17, 2019 14:37 IST

दंड की लूट, फक्त पैसे मिळवण्यासाठी हे सुरू केलं अशी टीका सुरू झाली तर दुसरीकडे या निर्णयाचं स्वागतही झालं.

नियम हे मोडण्यासाठीच असतात असं ताठ मानेने बोलणाऱ्यांची गेल्या 15 दिवसांत हाताची घडी आणि तोंडावर बोट अशी परिस्थिती झालीय... ही किमया घडवली ती नवीन मोटार वाहन कायद्याने. नियम धाब्यावर बसून भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्यांवर आता चाप बसणार आहे. एखाद्या गोष्टीची भीती दाखल्याशिवाय लोक बदलत नाहीत यावेळीही तसंच झालं. वाहतुकीचा दंड वाढवला आणि सगळे सरळ होण्याच्या मार्गावर आले. पण चांगल्या गोष्टी म्हटल्या की विरोध ही आलाच, तसा या गोष्टीला ही तो झालाच. कायद्याबाबत धाक नाही तर आदर असणं गरजेचं आहे तरच त्याचा उद्देश खऱ्या अर्थाने साध्य होईल. 

दंड की लूट, फक्त पैसे मिळवण्यासाठी हे सुरू केलं अशी टीका सुरू झाली तर दुसरीकडे या निर्णयाचं स्वागतही झालं. नियम हवेत पण दंड नको असं अनेकांनी म्हटलं तर काही जण फक्त सर्वसामान्यांकडून पैसे उकळण्याचा नवा धंदा असं बोलून मोकळे झाले. दंडासोबत उत्तम रस्ते, पार्किंग यासारख्या सुविधाही दिल्या गेल्या पाहिजेत. पावसाळ्यात रस्त्याची झालेली चाळण याबद्दल काही वेगळं बोलायला नको कारण त्याची अवस्थाच सगळं सांगून जाते. मात्र खड्ड्यांमुळे अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण यांचं उत्तरही सरकारने दिलं पाहीजे. वाहतूक पोलिसांवर होणारे हल्ले या नव्या कायद्यामुळे थांबतील अशी आशा आहे. पण या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड हवी. अन्न, वस्त्र, निवारा, वायफाय आणि गाडी अशी गरज असणाऱ्या तरुणाईने नवीन मोटार वाहन कायद्याबाबत आपली मतं मांडली ती जाणून घेऊया.

 

नव्या कायद्यामुळे वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत 

नव्या मोटार वाहन कायद्यामुळे वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होईल. मात्र याची प्रभावी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. वाहन चालवताना हेल्मेट वापरणं, गाडीचा वेग, सिग्नल तोडू नये हे नियम सर्वांना माहीत असतात पण अनेकदा वेळ आणि काम यामुळे काही जण ते नियम पाळत नाहीत. मात्र प्रत्येकाने या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. आता दंडाची रक्कम वाढलेली असल्याने खिशाला कात्री लागू नये म्हणून तरी नियम नक्कीच पाळले जातील. 

- कुलदीप साळुंखे 

 

दंडाची रक्कम वाढवण्यापेक्षा चांगले रस्ते करा

दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांचा मुद्दा ऐरणीवर येतो आणि त्यावरून राजकारण तापतं. मात्र यामध्ये खड्ड्याची अवस्था ही तशीच राहते. नियम हवेत मात्र दंडाची रक्कम खूप जास्त आहे. वाहतुकीचे नियम लोकांनी पाळावेत यासाठी केवळ दंड वाढवून फायदा नाही तर चांगले रस्ते करा जेणेकरून त्यामुळे होणाऱ्या अपघातांची संख्या ही कमी होईल. खड्ड्यांमुळे जाणारे जीव वाचतील. 

- समृद्धी महाडीक 

 

वाहतुकीच्या नियमांचं पालन करा 

वाहतुकीचे नियम हे आधीपासूनच होते. मात्र आता त्यातील दंडाची रक्कम वाढवल्याने प्रकर्षाने त्याची जाणीव झाली. खरं तर दंड वाढवल्याने या कायद्याची लोकांमध्ये भीती राहील. मात्र सर्वसामान्यांना परवडेल असा दंड असणं गरजेचं आहे. त्यासोबतच लोकांनी देखील वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज आहे. 

- नितेश राऊत 

दंड वसुलीतही पारदर्शकता असायला हवी

वाहतुकीचे नियम मोडल्यावर पावती फाडण्याऐवजी चिरीमिरीच दिल्याचे प्रकार अनेकदा समोर येत असतात. 1 सप्टेंबरपासून दंडाच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. मात्र आता सर्वप्रथम दंड वसुलीत पारदर्शकता असायला हवी. रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी जेणेकरून नियम मोडणाऱ्यांच्या गाड्यांचे नंबर समजण्यास मदत होईल आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करता येईल. 

- अभिजीत सकपाळ

 

खड्डे मुक्त रस्ते आणि पार्किंगसारख्या सुविधाही द्या

वाहतुकीचे नियम मोडताना आता सर्वजण दहा वेळा तरी विचार करतील. बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्यांवर चाप बसविण्यासाठी नवीन मोटार वाहन कायदा लागू झाला. कायद्याचं स्वागत आहे पण यासोबतच खड्डे मुक्त रस्ते आणि पार्किंगसारख्या सुविधाही लोकांना देण्यात आल्या पाहीजे. तसेच दंड वसुलीतही पारदर्शकता असायला हवी. 

- समिक्षा मोरे

भारतात वाहतुकीचे नियम मोडल्यास 15 हजारापर्यंत दंड तर 2 वर्षाची शिक्षा   

सामान्य दंडाची रक्कम - पूर्वी 100 रुपयांवरून आता 500 रुपये 

हेल्मेट न घालता गाडी चालविणे - पूर्वी 100 रुपये दंड होता तर आता 1 हजार रुपये दंड आणि 3 महिने परवाना निलंबित 

विना परवाना गाडी चालविणे - पूर्वी 500 रुपये दंड होता तर आता 5 हजार रुपये 

दुचाकीवर तीन जणांनी प्रवास केला तर पूर्वी 100 रुपये दंड होता तर आता 2 हजार रुपये दंड आणि 3 महिने वाहन परवाना निलंबित करण्याची शिक्षा 

सीट बेल्ट न घालता गाडी चालविणे - पूर्वी 100 रुपये दंड होता तर आता 1 हजार रुपये 

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे - पूर्वी 1 हजार रुपये दंड होता तर आता 5 हजार रुपये 

भरधाव वेगाने वाहन चालविल्यास - पूर्वी 400 रुपये दंड होता तर आता पहिल्यांदा पकडल्यास हलक्या वाहनांवर 1 ते 2 हजार रुपये दंड तर जड वाहनांना 2 ते 4 हजार रुपये दंड आकारण्यात येईल, आणि दुसऱ्यांदा पकडल्यास परवाना जप्त करण्यात येणार आहे. 

रॅश ड्रायव्हिंग - पहिल्यांदा 6 महिने ते 1 वर्षांपर्यंत जेल आणि 1 हजार ते 5 हजार दंड तर दुसऱ्यांदा 2 वर्षापर्यंत जेल आणि 10 हजार रुपये दंड

 दारू पिऊन गाडी चालविल्यास - पहिल्यांदा 6 महिने जेल आणि 10 हजार रुपये दंड तर दुसऱ्यांदा 2 वर्ष जेल आणि 15 हजार रुपये दंड 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा