समाज एकसंध ठेवण्याची जबाबदारी आपली
By Admin | Updated: June 28, 2014 23:11 IST2014-06-28T23:11:06+5:302014-06-28T23:11:06+5:30
‘राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना आणि त्यांच्या विचारांवर देशाची वाटचाल सुरू आहे;

समाज एकसंध ठेवण्याची जबाबदारी आपली
>बंडगार्डन : ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना आणि त्यांच्या विचारांवर देशाची वाटचाल सुरू आहे; पण काही घटकांकडून समाजात दरी निर्माण करण्याचे प्रय} सुरू आहेत. समाज एकसंध ठेवण्याची जबाबदारी आपणा सर्वाची आहे. जनता हिंसेच्या विरोधात आहे. कायद्याचे राज्य असलेच पाहिजे,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय एकता मंचचे अध्यक्ष, खासदार हुसेन दलवाई यांनी
केले.
हिंसाचाराला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय एकता मंचच्या वतीने खर्डा-अहमदनगर येथून खासदार दलवाई यांच्या नेतृत्वाखाली हिंसाचारविरोधी निर्धार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे शनिवारी सायंकाळी पुण्यात आगमन झाले. रेल्वे स्टेशनसमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने रॅलीचे स्वागत करण्यात आले. त्या वेळी दलवाई बोलत होते.
आमदार मोहन जोशी, पुणो शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. अभय छाजेड, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, कै. बा. स. ढोले-पाटील, प्रभाग समिती अध्यक्ष लक्ष्मी घोडके, नगरसेविका लता राजगुरू, हाजी नदाफ, शंकर राठोड, सुनील मलके, सुरेश राठोड, विनय माळी, अनिल आहेर, नीलेश घाग, नरेंद्र व्यवहारे, सुनंदा घरडे, नाटय़ परिषदेच्या पुणो शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, खलील देशमुख, सुशीला मोराळे आदी उपस्थित होते. रॅलीचा समारोप हडपसर येथील साधना विद्यालयाच्या प्रांगणात झाला. (वार्ताहर)
देशघातक इरादे स्पष्ट
4स्वातंत्र्योत्तर काळात हिंदू-मुस्लिम ऐक्य कमजोर करून खेडय़ा-पाडय़ात विषमतेने गांजलेल्या लोकांवर अन्याय करणा:यांना पाठीशी घालण्याचे विघातक उद्योग धर्माध शक्तींनी सातत्याने चालू ठेवले आहेत. खर्डा येथे नितीन आगे आणि हडपसर पुणो येथे संगणक तज्ज्ञ मोहसीन शेख यांच्या प्रतिगामी शक्तींकडून झालेल्या हत्येमुळे संबंधित मंडळींचे शांतताविरोधी व देशघातक इरादे स्पष्ट झाले आहेत, असे दलवाई म्हणाले.