शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एक दिवसाचा पगार तुम्हाला कमी मिळणार! मुख्यमंत्री निधीत जमा होणार! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 12:57 IST

राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला राज्य सरकारी अधिकारी, कर्मचारी धावून आले आहेत.

सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये कार्यालयीन प्रमुखांकडून परिपत्रक फिरवून त्यावर कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्या आहेत. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला राज्य सरकारी अधिकारी, कर्मचारी धावून आले आहेत. त्यांनी सरकारी आवाहनाला प्रतिसाद देत स्वत:च्या पगारातून एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचे ठरविले आहे.

असे झाले नुकसान मार्च महिन्यात तीनवेळा पाऊस झाला. ४ ते  ९ मार्च दरम्यान गारपीट झाली. त्यामुळे १५ जिल्ह्यांत ३८ हजार ६०० हेक्टर पिकांचे नुकसान झाले. १५ ते २१ मार्च दरम्यान अवकाळी पाऊस झाला. त्याचा ३० जिल्ह्यांना फटका बसला. १ लाख ७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर झालेल्या पावसामुळे २८ हजार २८७ हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे हे प्रत्येकाचे  कर्तव्य आहे. सरकारी कर्मचारीही त्यात मागे नाहीत. मात्र, नुकसान एका विशिष्ट भागात झाले आहे. त्यामुळे मदत करणे हे कर्मचाऱ्याला ऐच्छिक असल्यामुळे संघटनेचा त्यांना कोणताही विरोध नाही.- विश्वास काटकर, सरचिटणीस, राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना 

कर्मचाऱ्यांच्या पगारावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. ज्यांना काही आर्थिक चणचण नाही त्यांना मदत करताना काही अडचण येणार नाही. अडचण असेल तर ते पत्र देतील. ऐच्छिक असल्याने आमचा त्याला काहीही विरोध नाही. - प्रवीण बने, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना  

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने भर शिवारात उभ्या शेतीचे नुकसान झाले. सरकारने घोषणा केली तरी हातात एक पैसा नाही. आता पावसाळ्यात करायचे काय? आमच्या मदतीसाठी कोण धावणार? - धोंडीराम फुलझरे, नुकसानग्रस्त शेतकरी

टॅग्स :Employeeकर्मचारीFarmerशेतकरी