शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

'काल पोलिसांच्या अंगात औरंगजेब संचारलेला'; संजय राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 12:10 IST

रविवारी वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा संजय राऊत यांनी निषेध केला आहे.

गोंधळ होऊ नये म्हणून रविवारी वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा संजय राऊत यांनी निषेध केला आहे. काल पोलिसांच्या अंगात औरंगजेब संचारला होता. काही बोगस आचार्य प्राचार्य काल तिथे बसले होते. त्यातून पोलिसांना वारकर्‍यांवर लाठीचार्ज करावा लागला, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

पंढरीची वारी महाराष्ट्राची संस्कृती आहे, त्या वारीवर आतापर्यंत कधी संकट आले नव्हते. आता हेच लोक विठोबाची पूजा करायला बसतील. काल वारकरी जखमी झाले, पळापळ झाली. ही सत्तेची मस्ती आहे, भाजप मस्ती दाखवायला जाते प्रत्येक ठिकाणी धार्मिक तणाव निर्माण करायचा, यासाठी काही टोळ्या आहेत, त्या काम करतात असा आरोप राऊत यांनी केला आहे. 

धर्माभिमानी मुख्यमंत्री कुठे आहेत? फडणवीस कुठे आहेत? हिंदू आक्रोश मोर्चा काढणारे कुठे आहेत? आता काढा मोर्चा असे आव्हान राऊत यांनी दिले. यामागे भाजपची टोळी आहे.  मागच्या वर्षीच बोलू नका, यावर्षीचे बोला, यावर्षी तुम्ही आहात ना गृहमंत्री मग का झाले असे? असा सवाल राऊतांनी फडणवीसांना केला आहे. 

भाजपाने या गोष्टीचा साधा धिक्कारही केला नाहीय. ते गुन्हा दाखल करणार नाहीत. आम्ही पोलिसांच्या बडतर्फिची मागणी केली आहे. निदान माफी तर मागा, नाही तर तुम्हाला आषाढीला पूजा करण्याचा अजिबात अधिकार नाही, असे राऊत म्हणाले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतPandharpur Wariपंढरपूर वारीPuneपुणे