शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

येस बँकेत पैसे अडकलेल्या बँकांच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आली तातडीने धावून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 06:35 IST

७२ बँकांना मदतीचा हात : आरटीजीएस, एनईएफटीसारखे व्यवहार होणार पूर्ण

पुणे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आर्थिक निर्बंध घातल्याने ७२ नागरी सहकारी बँकांचे कोट्यवधी रुपये येस बँकेत अडकले आहेत. त्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक धावून आली आहे. राज्य बँकेत कोणत्याही ठेवी न ठेवता या बँकांचे खाते उघडण्यात येणार असून, त्यांचे अडकलेले आरटीजीएस, एनईएफटी अशा विविध सेवा पूर्ववत होणार आहेत.

आरबीआयने येस बँकेवर ५ मार्च रोजी निर्बंध घातले आहेत. या बँकेत ७२ नागरी सहकारी बँकांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. या सहकारी बँकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस), नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी), यूपीआय, आयएमपीएस या सेवा घेणाऱ्या या नागरी बँकांचे व्यवहार पूर्ण न होण्याची भीती आहे. त्यासाठी राज्य सहकारी बँकेने पुढाकार घेतला असून, कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता, तसेच कोणत्याही अटीविना त्यांना या सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

राज्य बँकेमधे सेवा घेण्यासाठी या बँकांना आरबीआयच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. येस बँकेने यापूर्वीच या बँकांनाना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. बँकिंग सुविधा मिळविण्यासाठी या बँकांना राज्य बँकेत खाते सुरू करावे लागेल. त्यासाठी कोणत्याही अटी-शर्ती अथवा ठेवी ठेवाव्या लागणार नाहीत. तसेच, खाते सुरू झाल्याच्या दिवसापासूनच सर्व सुविधा या बँकांना दिल्या जातील, असे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.

राज्य सहकारी बँकेकडे पर्याप्त भांडवलमार्च २०१९ अखेरीस राज्य बँकेकडे भांडवल पर्याप्तता १५.६० टक्के असून, नक्तमूल्य (नेटवर्थ) २,६८२ कोटी रुपये आहे. तसेच, १२ मार्च २०२० पर्यंत बँकेची आर्थिक उलाढाल ४१,५२१ कोटी रुपये आहे. तर, येत्या ३१ मार्च अखेरीस बँकेचे नेटवर्थ ३२५० कोटी आणि नफा साडेचारशे कोटींवर जाईल, असे अनास्कर म्हणाले.

टॅग्स :Yes Bankयेस बँक