शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

यंदाचा पाऊस समाधानकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 06:10 IST

कंदर यंदाचा मान्सून देशासाठी सरासरीपेक्षा अधिक पाऊस घेऊन येईल.

- सचिन लुंगसे

मुंबई : मान्सून यंदा शेतीसाठी पूरक आहे. मान्सूनसाठी हानीकारक असलेला अल निनो न्युट्रल आहे. ला निना मान्सूनला अनुकूल ठरतो. मान्सूनच्या मध्यात ला निनो तयार होईल. हे आपल्यासाठी सुचिन्ह आहे. एकंदर यंदाचा मान्सून देशासाठी सरासरीपेक्षा अधिक पाऊस घेऊन येईल. तो देशासाठी, बळीराजासाठी समाधानकारक असल्याचा विश्वास मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केला. यंदाच्या पावसात मुंबईकरांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. यासंदर्भात त्यांच्याशी केलेली बातचीत.

मान्सूनचे पूर्वानुमान कसे आहे?देशासाठी हवामान खात्याने दीर्घकालीन पूर्वानुमान दिले आहे. जून ते सप्टेंबरदरम्यानचा पाऊस सरासरीएवढा असेल. म्हणजे सर्वसाधारण असेल. सर्वसाधारण पावसात ९६ टक्के ते १०४ टक्के एवढा पाऊस गृहीत धरला जातो. देशाचा सरासरी पाऊस हा ८८ सेंटीमीटर आहे. हेच जर आकडेवारीत सांगायचे झाल्यास संपूर्ण देशाचा पाऊस त्याच्या सरासरीच्या १०० टक्के पडेल.

दीर्घकालीन पावसाच्या दुसऱ्या टप्प्याचे पूर्वानुमान कधी जाहीर होईल?हे पूर्वानुमान लवकरच जाहीर केले जाईल. यात जुलै आणि आॅगस्टमध्ये किती पाऊस पडेल, आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस कसा असेल? देशाच्या चार भौगोलिक भागांत पाऊस कसा असेल? याचा अंदाज दिला जाईल. यात मध्य, ईशान्य, दक्षिण, उत्तर पश्चिम भारताचा समावेश आहे.

महाराष्ट्रात मान्सून कसा कोसळेल?मान्सून मिशन मॉड्युलनुसार पाऊस सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक असेल. दक्षिण आशियाचा विचार करता संपूर्ण देशात सर्वदूर सरासरीएवढा पाऊस पडेल. दक्षिण भारत, उत्तर पश्चिम भारतात पाऊस सरासरीपेक्षा जास्त असेल. महाराष्ट्रातही पाऊस सरासरीएवढा कोसळेल. कोकण, मध्य भारत, मराठवाडा, विदर्भात किती पाऊस पडेल, हेदेखील आपण सांगतो. मात्र या मॉड्युलमध्ये काही त्रुटी असतात. त्यामुळे हे आपण मार्गदर्शक म्हणून वापरता येईल, असेही सांगतो. जसजसा भूभाग कमी होतो तसतशा त्रुटी वाढतात.

मान्सूनबाबत व्हायरल होणाºया संदेशांबाबत काय सांगाल?चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नका. या दिवसांत अनेक तज्ज्ञ निर्माण होतात. त्यांचा काय अभ्यास आहे, किती अनुभव आहे? हे लोक पाहत नाहीत. मात्र याबाबतचे संदेश समाज माध्यमांवर पसरतात. अशावेळी शेतकरी, सामान्यांनी याकडे सावधपणे बघण्याची गरज आहे.

मुंबईकरांनी काय खबरदारी घ्यावी?मुंबईकर कधी थांबला नाही. कोरोनामुळे मुंबईकर थोडा खचला आहे. उन्हाळ्यात कोरोना मरेल का? असे प्रश्न लोकांनी विचारले. मात्र तसे काही झाले नाही. आता पावसात कोरोना धुऊन जाईल का? असे प्रश्न विचारले जात आहेत. प्रत्यक्षात असा कोणत्याही प्रकारचा अभ्यास, अहवाल कोणाकडेही उपलब्ध नाही. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांनी खबरदारी घ्यावी. या पावसात आपल्याला सावधपणे काम करावे लागेल. मुंबई आणि आसपासच्या परिसरात दर १५ मिनिटांनी पावसाचे मोजमाप दिले जाणार आहे. याचा मुंबईकरांना फायदा होईल. बोरीवली, पवई असे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या पावसाचे अपडेट मिळतील.

शेतकऱ्यांना काय सांगाल?हवामान विभाग दर मंगळवारी आणि शुक्रवारी कृषीविषयक पूर्वानुमान देते. शेतकºयांनी पाच दिवसांचे कृषीविषयक पूर्वानुमान बघावे. हवामान खात्याच्या संकेतस्थळावर हवामानातील वेगवान घडामोडींचे संदेश असतात ते पाहावेत. कृषी विद्यापीठ, मेघदूत, उमंगसारख्या अ‍ॅपची मदत घ्यावी. याची माहिती ग्रामपंचायतीत दिली जाते. काही शेतकरी खूप हुशार आहेत. त्यांचे मला फोन येतात. हवामानाविषयी ते माहिती घेतात. शेतकरी सजग आहे. शेतकरी हुशार आहे. त्याला कोणी चुकीची माहिती देऊ नये.

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशल