शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

पुरामुळे पुनर्वसन करण्यातच गेली यंदाची दिवाळी! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 07:11 IST

अतिवृष्टीने तालुक्यातील बोरी, हरणा, भीमा, सीना या चारही नद्यांना महापूर आला होता. यामुळे नदीकाठच्या शेतातील सर्वच पिकांबरोबर शेतातील वस्ती, त्यातील सर्व अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य, पशुधन सुद्धा वाहून गेले.

शिवानंद फुलारी    लाेकमत न्यूज नेटवर्कअक्कलकोट : यंदाच्या महापुरात शेती, पशुधन, अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य सर्वकाही पाण्यात वाहून गेले.  केवळ माणसं जिवंत राहिली. त्यामुळे यंदाची दिवाळी पुनर्वसन करण्यातच जात असल्याची व्यथा संगोगी (ब.) येथील पूरग्रस्त शेतकरी भवनराय बिराजदार हे सांगत होते.

अतिवृष्टीने तालुक्यातील बोरी, हरणा, भीमा, सीना या चारही नद्यांना महापूर आला होता. यामुळे नदीकाठच्या शेतातील सर्वच पिकांबरोबर शेतातील वस्ती, त्यातील सर्व अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य, पशुधन सुद्धा वाहून गेले.  केवळ माणसं जिवंत राहिली आहेत. जगण्यासाठी काहीच शिल्लक नाही. आता नव्याने संसार थाटण्याचे काम सुरू आहे. 

भवनराय बिराजदार यांच्या शेताजवळील  नदीकाठचा पाटबंधारा वाहून गेला. मध्यरात्री अचानकपणे वस्तीला पाण्याने वेढा दिल्याने धान्य, संसारोपयाेगी साहित्य पाण्यात वाहून गेले. जीवनासाठी मुख्य आधार असलेल्या ४ एकर क्षेत्रातील उभी पिके आणि पशुधनसुद्धा शिल्लक राहिले नाही. महापुराच्या तडाख्याने आमचा संसार रात्रीत होत्याचं नव्हतं झालं, अशी भावना त्यांनी व्यक्त    केली. त्यामुळे यंदा कसली दिवाळी आणि कसला फराळ काहीच केले नाही. हातउसने काढून पुनर्वसन करण्याच्या कामात कुटुंब गुंतले आहे. 

संसारच उरला नाही तर सण कसा साजरा करणारयंदाच्या महापुरानं जीवनभर कष्टानं उभा केलेला संसार वाहून गेला.  त्यामध्ये पाच पोती ज्वारी, सहा पोती गहू, तांदूळ, डाळ यासह कपडे, अंथरुण-पांघरुण हे सर्व वाहून गेले.  घरात काहीच शिल्लक राहिलं नाही.  आता शेतीचं आणि संसाराचं पुनर्वसन करणं अवघड आहे. त्यामुळे यंदा जिथं संसारच नाही तिथं सण कसा साजरा करणार, असा सवाल उपस्थित करीत दिवाळीला फराळाचं काहीच केलं नाही. शिवाय काही करण्याची इच्छाही नाही, असं शरणव्वाबाई बिराजदार यांनी सांगितलं.  

टॅग्स :floodपूर