शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

यंदाही मुलीच नंबर वन! बारावीचा निकाल 90.66%, कोकण विभाग अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 06:49 IST

राज्य मंडळातर्फे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत इयत्ता बारावीची लेखी परीक्षा घेतली.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९५.८९ टक्के, तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वांत कमी ८८.१८ टक्के लागला. गेल्या वर्षी ८५.८८ निकाल लागला होता. मात्र, यंदा निकालात ४.७८ टक्के वाढ झाली आहे.

राज्य मंडळातर्फे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत इयत्ता बारावीची लेखी परीक्षा घेतली. परीक्षेसाठी १४ लाख २० हजार ५७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या १४ लाख १३ हजार ६८७ विद्यार्थ्यांपैकी १२ लाख ८१ हजार ७१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोरोनामुळे निकाल जाहीर करण्यास विलंब झाला. परंतु, सर्व अडचणींवर मार्ग काढतात मंडळाने निकाल जाहीर केला.

निकालाची वैशिष्ट्ये मुलांपेक्षा मुलींची निकालाची टक्केवारी ५.८४ टक्क्यांनी अधिकदिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९३.५७ टक्केबोर्डातर्फे घेण्यात आलेल्या १५४ विषयांच्या परीक्षेपैकी २६ विषयांचा निकाल शंभर टक्केखासगीरित्या प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या निकाल ७२.०८ टक्के१६,७२० विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा लाभ ७५ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण १,४३,४४१ विद्यार्थ्यांनी मिळविले.

शाखानिहाय २ वर्षांचा निकालशाखा २०१९ २०२०विज्ञान ९२.६० ९६.९३कला ७६.४५ ८२.६३वाणिज्य ८८.२८ ९१.२७व्यवसाय अभ्यासक्रम ७८.९३ ८६.०७

यंदा कोरोनामुळे उत्तरपत्रिका संकलनाचा मोठा प्रश्न होता. ‘रेड झोन’ असल्यामुळे शिक्षकांच्या घरून संकलन करावे लागले. त्यासाठी कर्मचाऱ्यांसोबत विभागीय मंडळाचे अध्यक्षव सचिव स्वत: फिरतहोते.- शकुंतला काळे, अध्यक्ष,राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालMaharashtraमहाराष्ट्र