शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

यवतमाळमध्ये कर्जमाफीसाठी शेतक-याचे झाडावर चढून आंदोलन, प्रशासनाकडून मनधरणी सुरू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 12:40 IST

शेतक-यांचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी एका शेतक-याने झाडावर चढून रविवारी सकाळी ९ वाजतापासून यवतमाळ तालुक्यातील अर्जुना येथे आंदोलन सुरू केले आहे.

यवतमाळ : शेतक-यांचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी एका शेतक-याने झाडावर चढून रविवारी सकाळी ९ वाजतापासून यवतमाळ तालुक्यातील अर्जुना येथे आंदोलन सुरू केले आहे. त्याच्या सोबत विषाची बॉटल असून त्याच्या समर्थकांनी यवतमाळ-आर्णी मार्गावर वाहतूक रोखून धरली.  प्रशासनाने त्याला खाली उतरविण्याचे प्रयत्न चालविले असले तरी तो आपल्या आंदोलनावर ठाम आहे.

धनंजय राजेंद्र वानखेडे  (३८) असे आंदोलनकर्त्या शेतक-याचे नाव आहे. तो दारव्हा तालुक्यातील शेंद्री डोल्हारी येथील रहिवासी आहे. यावर्षी त्याने अर्जुना येथे मक्त्याने शेत घेतले आहे. रविवारी सकाळी तो पत्नी आणि काही महिलांसह शेतात पोहोचला. सोबत विषाची बॉटल होती. काही वेळात तो एका झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसला.  त्याचवेळी त्याच्या सोबतच्या महिलांनी यवतमाळ-आर्णी मार्गावरील वाहतूक रोखून धरली.  तत्पूर्वी त्याने झाडाला आमरण उपोषण असे फलक झाडाला बांधले होते.  

आपल्या मागण्यांची चिठ्ठी त्याने झाडावरून खाली फेकली. त्यात सर्व शेतक-यांना दिवाळीपूर्वी दहा हजार रुपये द्या, शेतक-यांचा सातबारा कोरा करा, असे लिहिलेले आहेत. या घटनेची माहिती दिनेश जयस्वाल यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिसांना दिली. ठाणेदार संजय डहाके आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. काही वेळात नायब तहसीलदार नरेंद्र थुटे, मंडळ अधिकारी गुल्हाने त्या ठिकाणी आले. रुग्णवाहिका, अग्नीशमन दलालाही पाचारण करण्यात आले. धनंजयला खाली उतरविण्याचे प्रयत्न सुरू झाले. परंतु तो कुणाचेही ऐकायच्या मन:स्थितीत दिसत नाही. कुणी वर चढल्यास मी झाडावरुन उडी मारील, असे तो सांगत आहे. तसेच त्याच्यासोबत विषाची बॉटल असल्यानेही प्रशासन हादरुन गेले आहे. 

विशेष म्हणजे धनंजयने गतवर्षी यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात खासगी फायनान्स कंपनीविरोधात आंदोलन करीत विषप्राशन केले होते. तर यापूर्वी एका मोबाईल टॉवरवर चढूनही आंदोलन केले होते. वृत्तलिहिस्तोवर तो झाडावरच चढून आहे. या ठिकाणी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली असून नागरिकही त्याला खाली येण्यासाठी विनवणी करीत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी