शहरं
Join us  
Trending Stories
1
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
2
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
3
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
4
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
5
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
6
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
7
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
8
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
9
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
10
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
11
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
12
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
13
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
14
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
15
प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला!
16
Travel : पुतिन यांच्या रशियात फिरायला जायचा विचार करताय? किती खर्च येईल आणि कुठे कुठे फिराल? जाणून घ्या..
17
“महायुती सरकार बौद्धिक, आर्थिक दिवाळखोरीत; शेतकरी, लाडक्या बहिणींना फसवले”: हर्षवर्धन सपकाळ
18
30 दिवस, 14000 उड्डाणे रद्द, Indigo अडचणीत येण्याचे काय कारण? परिस्थिती कधी सुधारेल?
19
भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट नाकारला? जैन, मारवाडी, ब्राह्मण असाल तरच घर; बिल्डर लॉबीचा मनमानी कारभार
20
२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या विकासात यशवंतराव चव्हाण यांचे मोठे योगदान - बी.पी.सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 23:05 IST

देशाच्या विकासात दि. यशवंतराव चव्हाण यांचे मोठे योगदान होते. असे प्रतिपादन माजी केंद्रिय गृह सचिव तथा सिक्कीमचे माजी राज्यपाल बी.पी.सिंह यांनी केले.

मुंबई : देशाच्या विकासात दि. यशवंतराव चव्हाण यांचे मोठे योगदान होते. असे प्रतिपादन माजी केंद्रिय गृह सचिव तथा सिक्कीमचे माजी राज्यपाल बी.पी.सिंह यांनी केले. ते आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भारतीय लोकप्रशासन संस्थेतर्फे आयोजित श्री.यशवंतराव चव्हाण स्मृति व्याख्यान कार्यक्रमात ‘इंडिया ॲण्ड इट्स ग्रामर ऑफ डेमोक्रेटीक गव्हनर्स’ याविषयावरील व्याख्यानात बोलत होते.

सिंह म्हणाले, दि. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत भरीव कामगिरी केली. शिक्षण,आरोग्य जलसंधारण, रस्ते आणि कृषी य क्षेत्रात भरीव काम केले. केंद्रिय मत्रिमंडळात अनेक विभागाचा कार्यभार सांभाळला. गृह मंत्री असताना चीन आणि पाकिस्तानशी चांगले राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.

सबका साथ सबका विकास-

देशातील विविध प्रश्नांवर बोलताना श्री.सिंह म्हणाले,सबका साथ सबका विकास ही घोषणा फार महत्वाची आहे. लोकशाही मानणाऱ्या राष्ट्रांनी याच वाटेवरुन गेले पाहिजे. समाजातील वंचित घटकांना चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा देण्याची जबाबदारी सरकारची आहे. कुपोषण मुक्त समाज,अल्पसंख्यांक, आदिवासी आणि दलितांचा विकास हे ध्येय समोर ठेवून राज्यकर्त्यांनी काम करण्याची गरज आहे. विविध जातीधर्मात विखुरलेल्या भारतीय समाजाला एका सुत्रात बांधून त्यांचा सर्वांगिण विकास करण्याची जबाबदारी शासनाची आहे. भारतात आजही अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित आहे. स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे. दहशदवाद, हिंसाचार हे विकासाचे शत्रू आहेत. देशात हिंसाचार फोफावतो आहे. तो वाढता कामा नये. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात शांतता हवी आहे. जम्मू काश्मीर मधील हिंसाचाराचे लोण संपूर्ण देशात पसरत आहे. अनेक राज्यात नक्षलवादी सक्रिय आहेत. त्यांचे प्रश्न सोडविणे मोठे आव्हान आहे.

लोकशाहीचे बळकटीकरण-

भारतीय लोकशाहीबद्दल बोलताना श्री.सिंह म्हणाले, गेल्या सत्तर वर्षात भारतीय लोकशाही अधिक बळकट आणि सामर्थ्यवान झाली आहे. भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झेप घेतली आहे. भारतीय निवडणूक पद्धतीत अमूलाग्र बदल झाला. नागरिकांना माहितीचा अधिकार मिळाला आहे. विविध क्षेत्रात सर्व जाती धर्माच्या लोकांना आरक्षण देण्यात आले आहे. त्याचा फायदा समाजातील नाहीरे वर्गाला होत आहे. भारतात 18 ते 35 वयोगटातील युवकांची संख्या 800 मिलीयन आहे. जगात सर्वात जास्त तरुण हे भारतात आहेत. त्यामुळे विविध क्षेत्रात युवक कार्यरत असल्याने भारताची ताकद आशिया खंडातच नव्हे तर जगभर वाढली आहे. भारताची राज्यघटना जगात श्रेष्ठ दर्जाची आहे. सर्व घटकांना एका सुत्रात बांधून  राष्ट्रीय एकात्मतेला बळ देण्याची शक्ती घटनेने दिली आहे. प्रत्येक समाज धर्मातील लोकांनी आपली परंपरा, आपली भाषा, आपले सण-उत्सव जपले आहेत. म्हणूनच विविधतेने नटलेला हा सुंदर भारत देश जगाच्या पाठीवर एक सामार्थ्यवान राष्ट्र म्हणून उभा आहे. घटनेची ताकद आणि लोकशाही मार्गाने पार पाडणाऱ्या निवडणूकांमुळे भारतीय लोकशाही ही अधिक प्रबळ झाली आहे. भारताला उज्ज्वल भवितव्य आहे. या देशातून लवकरच निरक्षरता, कुपोषण,बेरोजगारी हे प्रश्न सूटून पुन्हा एकदा विकासाची पहाट होईल आणि सबका साथ आणि सबका विकास हे ध्येय साध्य होईल, असेही श्री. सिंह यांनी सांगितले.

प्रारंभी भारतीय लोकप्रशासन संस्थेचे मानद अध्यक्ष तथा राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी कार्यक्रमाची प्रस्ताविक केले. यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरचे शरद काळे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणी सांगितल्या. या कार्यक्रमाला निवृत्त आयएएस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.