शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

उसदराची कोंडी फुटली, मात्र कोल्हापूर वगळता उर्वरित महाराष्ट्रात चक्का जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 15:45 IST

उसाला एकरकमी एफआरपी देण्याचे साखर कारखानदारानी मान्य केल्याने ऊसदराची कोंडी शनिवारी दुपारी फुटली. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखाने सोमवारपासून सुरू होत आहेत. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापूर वगळता उर्वरित महाराष्ट्रात चक्का जाम करण्यावर ठाम आहे.

ठळक मुद्देउसदराची कोंडी फुटलीकोल्हापूर वगळता उर्वरित महाराष्ट्रात चक्का जाम

कोल्हापूर : उसाला एकरकमी एफआरपी देण्याचे साखर कारखानदारानी मान्य केल्याने ऊसदराची कोंडी शनिवारी दुपारी फुटली. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखाने सोमवारपासून सुरू होत आहेत. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापूर वगळता उर्वरित महाराष्ट्रात चक्का जाम करण्यावर ठाम आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यात शनिवारी दुपारी कोल्हापूरात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आता एकरकमी एफआरपी आणि साखरेचा बाजारातील दर ३४00 रुपये क्विंटल झाल्यावर १00 व दर ३५00 झाला तर आणखी १00 द्यायचे मान्य झाले. यामुळे सर्वच साखर कारखाने सोमवारपासून सुरु राहतील.

कोल्हापूर येथे विश्रामगृहात झालेल्या बैठकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत संंबंधित निर्णय घेण्यात आला.कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारानी हा निर्णय मान्य करण्यात केला आहे. मात्र, कोल्हापूर जिल्हा वगळता संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम होणारच, असा निर्णय स्वाभिमानीचे भगवान काटे यांनी दिली.दरम्यान, साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये झालेल्या चर्चेमध्ये साखरेचा दर वाढले तर पुन्हा पैसे देउ असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.साखर पट्ट्यातील सर्व साखर कारखानदार परस्पर हंगाम सुरु करण्याच्या पवित्र्यात असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली होती. स्वाभिमानीच्या भूमिकेमुळे ऊस दर आंदोलन चिघळणार असल्याचे संकेत मिळत होते. मात्र, कोल्हापूरची कोंडी फोडण्यात यश मिळाले आहे. इतर जिल्ह्याचे निर्णय होताच आंदोलन मागे घेण्यात येईल, मात्र ११ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्हा वगळता इतरत्र चक्का जाम आंदोलन होणारच असा पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने