शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

वाय -चार्ज : चार्जिंग ची परिभाषा बदलणारे तंत्रज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 21:52 IST

दिवसेंदिवस मोबाईल टेक्नॉलॉजी ने माणसाचे जीवन व्यापून टाकले आहे.मोबाईल शिवाय माणसाचा दिवस सुरू होत नाही आणि दिवसाचा शेवटही मोबाईल शिवाय होत नाही

अनिल भापकर/ऑनलाइन लोकमत
दिवसेंदिवस मोबाईल टेक्नॉलॉजी ने माणसाचे जीवन व्यापून टाकले आहे.मोबाईल शिवाय माणसाचा दिवस सुरू होत नाही आणि दिवसाचा शेवटही मोबाईल शिवाय होत नाही .त्यामुळे आता मोबाईल वापरताना काही गोष्टी फार महत्वाच्या झाल्या आहेत त्या म्हणजे इंटरनेट चा स्पीड आणि मोबाइल चा बॅटरी बॅकअप. मात्र पूर्वी म्हणजे फार फार ततर दहा-बारा वर्षांपूर्वी मोबाईल म्हणजे फक्त वायरलेस टेलिफोन अर्थात लँडलाईन ला पर्याय असाच होता . फार फार तर कॉल करण्यासोबतच एसएमएस चा वापर मोबाईल मध्ये होऊ लागला होता . त्यामुळे त्यावेळी बॅटरी बॅकअप हा काही महत्वाचा विषय त्यावेळी नव्हता . एकदा मोबाईल चार्ज केला कि दोन दिवस परत मोबाईल चार्ज करायची गरज पडत नसे. 
मात्र जेव्हा पासून मोबाईल स्मार्टफोन झाला तेव्हा पासून स्मार्टफोन म्हणजे पीसी अर्थात कॉम्पुटर ला पर्याय म्हणून वापरले जाऊ लागला . त्यामुळे इंटरनेट स्पीड आणि बॅटरी बॅकअप या दोन गोष्टीला या स्मार्टफोन च्या जमान्यात फारच महत्व आले. इंटरनेट स्पीड ची समस्या काही प्रमाणात फोरजी च्या जमान्यात बऱ्यापैकी सुधारली आहे मात्र बॅटरी बॅकअप ही समस्या मात्र अजूनही स्मार्टफोन युझर्सला बऱ्यापैकी सतावते आहे. त्यासाठी मग पर्याय म्हणून अनेक कंपन्यांनी आपल्या स्मार्टफोन ची बॅटरी कॅपॅसिटी वाढवायला सुरुवात केली तर काही स्मार्टफोन युझर्स बॅटरी बँक चा पर्याय वापरू लागले . तरी सुद्धा स्मार्टफोन चार्जिंग ही समस्या काही प्रमाणात आहेच . 
मात्र आता वाय -चार्ज नावाचे असे एक तंत्रज्ञान येऊ घातले आहे ज्यामुळे स्मार्टफोन अर्थात स्मार्टफोन फॅमिली म्हणजेच स्मार्टफोन सह टॅब ,डिजिटल वॉच ,विअरेबल डिव्हाइसेस आदींचाही चार्जिंगची समस्या दूर होणार आहे.
काय आहे वाय-चार्ज तंत्रज्ञान ?
वाय -चार्ज तंत्रज्ञान हे दोन भागात विभागले गेले आहे एक म्हणजे ट्रान्समीटर युनिट आणि दुसरे म्हणजे रिसिव्हर युनिट. यामध्ये पॉवर ही इन्फ्रारेड बीम च्या साहाय्याने ट्रान्सफर केली जाते. म्हणजे ट्रान्समीटर युनिट हे आपल्या घरात किंवा ऑफिस मध्ये ए सी किंवा डीसी किंवा यूएसबी पॉवर पॉईंट ला जोडलेले असते . तर दुसरे म्हणजे रिसिव्हर युनिट हे स्मार्टफोन किंवा जे डिव्हाईस चार्ज करायचे आहे त्याच्या चार्जिंग पोर्ट मध्ये लावलेले असते किंवा काही स्मार्टफोनमध्येच हे असते.यामध्ये ट्रान्समीटर युनिट हे फार स्मार्ट असते ते आपल्या परिसरातील स्मार्टफोन किंवा इतर डिव्हाईस आपोआप हुडकून काढून लगेच त्याला चार्जिंग करायला सुरुवात करते. म्हणजे तुम्हाला तुमचा स्मार्टफोन चार्ज करायचा आहे हे लक्षात ठेवायची सुद्धा गरज नाही.