शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

वाय -चार्ज : चार्जिंग ची परिभाषा बदलणारे तंत्रज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 21:52 IST

दिवसेंदिवस मोबाईल टेक्नॉलॉजी ने माणसाचे जीवन व्यापून टाकले आहे.मोबाईल शिवाय माणसाचा दिवस सुरू होत नाही आणि दिवसाचा शेवटही मोबाईल शिवाय होत नाही

अनिल भापकर/ऑनलाइन लोकमत
दिवसेंदिवस मोबाईल टेक्नॉलॉजी ने माणसाचे जीवन व्यापून टाकले आहे.मोबाईल शिवाय माणसाचा दिवस सुरू होत नाही आणि दिवसाचा शेवटही मोबाईल शिवाय होत नाही .त्यामुळे आता मोबाईल वापरताना काही गोष्टी फार महत्वाच्या झाल्या आहेत त्या म्हणजे इंटरनेट चा स्पीड आणि मोबाइल चा बॅटरी बॅकअप. मात्र पूर्वी म्हणजे फार फार ततर दहा-बारा वर्षांपूर्वी मोबाईल म्हणजे फक्त वायरलेस टेलिफोन अर्थात लँडलाईन ला पर्याय असाच होता . फार फार तर कॉल करण्यासोबतच एसएमएस चा वापर मोबाईल मध्ये होऊ लागला होता . त्यामुळे त्यावेळी बॅटरी बॅकअप हा काही महत्वाचा विषय त्यावेळी नव्हता . एकदा मोबाईल चार्ज केला कि दोन दिवस परत मोबाईल चार्ज करायची गरज पडत नसे. 
मात्र जेव्हा पासून मोबाईल स्मार्टफोन झाला तेव्हा पासून स्मार्टफोन म्हणजे पीसी अर्थात कॉम्पुटर ला पर्याय म्हणून वापरले जाऊ लागला . त्यामुळे इंटरनेट स्पीड आणि बॅटरी बॅकअप या दोन गोष्टीला या स्मार्टफोन च्या जमान्यात फारच महत्व आले. इंटरनेट स्पीड ची समस्या काही प्रमाणात फोरजी च्या जमान्यात बऱ्यापैकी सुधारली आहे मात्र बॅटरी बॅकअप ही समस्या मात्र अजूनही स्मार्टफोन युझर्सला बऱ्यापैकी सतावते आहे. त्यासाठी मग पर्याय म्हणून अनेक कंपन्यांनी आपल्या स्मार्टफोन ची बॅटरी कॅपॅसिटी वाढवायला सुरुवात केली तर काही स्मार्टफोन युझर्स बॅटरी बँक चा पर्याय वापरू लागले . तरी सुद्धा स्मार्टफोन चार्जिंग ही समस्या काही प्रमाणात आहेच . 
मात्र आता वाय -चार्ज नावाचे असे एक तंत्रज्ञान येऊ घातले आहे ज्यामुळे स्मार्टफोन अर्थात स्मार्टफोन फॅमिली म्हणजेच स्मार्टफोन सह टॅब ,डिजिटल वॉच ,विअरेबल डिव्हाइसेस आदींचाही चार्जिंगची समस्या दूर होणार आहे.
काय आहे वाय-चार्ज तंत्रज्ञान ?
वाय -चार्ज तंत्रज्ञान हे दोन भागात विभागले गेले आहे एक म्हणजे ट्रान्समीटर युनिट आणि दुसरे म्हणजे रिसिव्हर युनिट. यामध्ये पॉवर ही इन्फ्रारेड बीम च्या साहाय्याने ट्रान्सफर केली जाते. म्हणजे ट्रान्समीटर युनिट हे आपल्या घरात किंवा ऑफिस मध्ये ए सी किंवा डीसी किंवा यूएसबी पॉवर पॉईंट ला जोडलेले असते . तर दुसरे म्हणजे रिसिव्हर युनिट हे स्मार्टफोन किंवा जे डिव्हाईस चार्ज करायचे आहे त्याच्या चार्जिंग पोर्ट मध्ये लावलेले असते किंवा काही स्मार्टफोनमध्येच हे असते.यामध्ये ट्रान्समीटर युनिट हे फार स्मार्ट असते ते आपल्या परिसरातील स्मार्टफोन किंवा इतर डिव्हाईस आपोआप हुडकून काढून लगेच त्याला चार्जिंग करायला सुरुवात करते. म्हणजे तुम्हाला तुमचा स्मार्टफोन चार्ज करायचा आहे हे लक्षात ठेवायची सुद्धा गरज नाही.