शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चिंताजनक! चार वर्षांत १२ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 06:45 IST

राज्यात २०१५ ते २०१८ या चार वर्षांच्या काळात १२ हजार २१ शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांची प्रकरणे निदर्शनाला आली

मुंबई : राज्यात २०१५ ते २०१८ या चार वर्षांच्या काळात १२ हजार २१ शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांची प्रकरणे निदर्शनाला आली. यातली ६८८८ प्रकरणे जिल्हास्तरीय समित्यांमध्ये पात्र ठरली असून त्यातल्या ६८४५ प्रकरणात आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या वारसांना एक लाख रूपयांची मदत देण्यात आली आहे, असे मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी एका लेखी उत्तरात सांगितले.केंद्र सरकारच्या कीडबाधित क्षेत्र अहवालात महाराष्ट्राचा समावेश असल्याची माहिती कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी एका लेखी उत्तरात दिली. महाराष्ट्रात ऊस, मका व ज्वारी कीडींची बाधा झाली आहे. मक्यावरील नवीन लष्करी अळींचा प्रादुर्भाव आढळून आल्याचेहीत्यांनी सांगितले. धनंजय मुंडे, अनिल तटकरे आदींनी याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.कोकणात मत्स्य विज्ञान विद्यापीठ नाहीकोकणासाठी स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भातला तारांकित प्रश्न विलास पोतनीस, रवींद्र फाटक आदींनी विचारला होता. मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी त्याला उत्तर दिले. दापोली तालुक्यातल्या शिरगाव येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालय डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न करण्याचा निर्णय झाला आहे. कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करावयाचे झाल्यास डॉ. मुणगेकर समितीच्या अहवालानुसार शंभर एकर जागा, २१५ कोटींचा आवर्ती तर २९५ कोटींचा अनावर्ती खर्च येईल. या पार्श्वभूमीवर कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याची आवश्यकता वाटत नाही, असे ते आपल्या लेखी उत्तरात म्हणाले.कोतवालांचा कोटा वाढवलाराज्यातल्या कोतवालांना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा तारांकित प्रश्न सतेज पाटील, शरद रणपिसे आदींनी उपस्थित केला होता. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्याला उत्तर दिले. कोतवालांच्या कामाचे एकत्रित स्वरूप पाहता त्यांना विविध योजनांचा लाभ देणे, चतुर्थश्रेणीच्या सरळसेवेच्या पदांमध्ये शिपाई म्हणून प्रथम नियुक्तीचा कोटा २५ टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याFarmerशेतकरी